शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

वडिलांना फोनवर ‘बाय बाय’ म्हणत त्याने घेतली आयुष्यातून ‘एक्झिट’

By admin | Updated: July 27, 2016 00:53 IST

औरंगाबाद : मुलगा बऱ्याच वेळाने घरी आला नाही म्हणून चिंताग्रस्त झालेल्या वडिलांनी फोन केला अन् अरे जेवायला ये ना, असे म्हटले.

औरंगाबाद : मुलगा बऱ्याच वेळाने घरी आला नाही म्हणून चिंताग्रस्त झालेल्या वडिलांनी फोन केला अन् अरे जेवायला ये ना, असे म्हटले. त्यावर मुलाने आता मी येणार नाही... बाय बाय... असे म्हणत स्वत:ला धावत्या रेल्वेसमोर झोकून देत आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी दुपारी संग्रामनगर परिसरातील रेल्वे रुळावर घडली.फिरोज अमीर मुल्ला (३०, रा. नेहरूनगर) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. फिरोज हा आई, वडील, भाऊ, पत्नी व दोन मुलींसोबत नेहरूनगरात राहत होता. तो इलेक्ट्रिशियन होता. घरातच छोटे इलेक्ट्रिक सामान विक्री व दुरुस्तीचे त्याचे दुकान होते. काही तरी कारणावरून रागाच्या भरात मंगळवारी त्याने आत्महत्येचा निर्णय घेतला. आत्महत्येसाठी दुपारी तो घरातून बाहेर पडला. फिरत फिरत तो अखेर संग्रामनगरातील रेल्वेरुळावर पोहोचला. त्याचवेळी त्याच्या वडिलांचा फोन आला. वडिलांना आत्महत्या करत असल्याचे सांगतच त्याने रेल्वेसमोर उडी मारली. हादरलेल्या वडिलांनी जवाहरनगर ठाण्यातील आपल्या पोलीस मित्राला फिरोजच्या आलेल्या फोनविषयी सांगितले असता त्याला शोधण्यासाठी पोलीस मित्र निघणार तोच एका तरुणाने संग्रामनगरजवळ रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केल्याची खबर ठाण्यात येऊन धडकली. लगेच पोलिसांनी तिकडे धाव घेतली. तेथे फिरोजचे प्रेत आढळून आले. फिरोजच्या आत्महत्येप्रकरणी जवाहरनगर ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.