शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
6
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
7
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
8
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
9
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
10
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
11
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
12
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
13
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
14
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
15
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
16
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
17
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
18
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
19
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
20
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 

वडिलांना फोनवर ‘बाय बाय’ म्हणत त्याने घेतली आयुष्यातून ‘एक्झिट’

By admin | Updated: July 27, 2016 00:53 IST

औरंगाबाद : मुलगा बऱ्याच वेळाने घरी आला नाही म्हणून चिंताग्रस्त झालेल्या वडिलांनी फोन केला अन् अरे जेवायला ये ना, असे म्हटले.

औरंगाबाद : मुलगा बऱ्याच वेळाने घरी आला नाही म्हणून चिंताग्रस्त झालेल्या वडिलांनी फोन केला अन् अरे जेवायला ये ना, असे म्हटले. त्यावर मुलाने आता मी येणार नाही... बाय बाय... असे म्हणत स्वत:ला धावत्या रेल्वेसमोर झोकून देत आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी दुपारी संग्रामनगर परिसरातील रेल्वे रुळावर घडली.फिरोज अमीर मुल्ला (३०, रा. नेहरूनगर) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. फिरोज हा आई, वडील, भाऊ, पत्नी व दोन मुलींसोबत नेहरूनगरात राहत होता. तो इलेक्ट्रिशियन होता. घरातच छोटे इलेक्ट्रिक सामान विक्री व दुरुस्तीचे त्याचे दुकान होते. काही तरी कारणावरून रागाच्या भरात मंगळवारी त्याने आत्महत्येचा निर्णय घेतला. आत्महत्येसाठी दुपारी तो घरातून बाहेर पडला. फिरत फिरत तो अखेर संग्रामनगरातील रेल्वेरुळावर पोहोचला. त्याचवेळी त्याच्या वडिलांचा फोन आला. वडिलांना आत्महत्या करत असल्याचे सांगतच त्याने रेल्वेसमोर उडी मारली. हादरलेल्या वडिलांनी जवाहरनगर ठाण्यातील आपल्या पोलीस मित्राला फिरोजच्या आलेल्या फोनविषयी सांगितले असता त्याला शोधण्यासाठी पोलीस मित्र निघणार तोच एका तरुणाने संग्रामनगरजवळ रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केल्याची खबर ठाण्यात येऊन धडकली. लगेच पोलिसांनी तिकडे धाव घेतली. तेथे फिरोजचे प्रेत आढळून आले. फिरोजच्या आत्महत्येप्रकरणी जवाहरनगर ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.