शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
2
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
3
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
4
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
5
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
6
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
7
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
8
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
11
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
12
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
13
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
14
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
19
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
20
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या

वडिलांना फोनवर ‘बाय बाय’ म्हणत त्याने घेतली आयुष्यातून ‘एक्झिट’

By admin | Updated: July 27, 2016 00:53 IST

औरंगाबाद : मुलगा बऱ्याच वेळाने घरी आला नाही म्हणून चिंताग्रस्त झालेल्या वडिलांनी फोन केला अन् अरे जेवायला ये ना, असे म्हटले.

औरंगाबाद : मुलगा बऱ्याच वेळाने घरी आला नाही म्हणून चिंताग्रस्त झालेल्या वडिलांनी फोन केला अन् अरे जेवायला ये ना, असे म्हटले. त्यावर मुलाने आता मी येणार नाही... बाय बाय... असे म्हणत स्वत:ला धावत्या रेल्वेसमोर झोकून देत आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी दुपारी संग्रामनगर परिसरातील रेल्वे रुळावर घडली.फिरोज अमीर मुल्ला (३०, रा. नेहरूनगर) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. फिरोज हा आई, वडील, भाऊ, पत्नी व दोन मुलींसोबत नेहरूनगरात राहत होता. तो इलेक्ट्रिशियन होता. घरातच छोटे इलेक्ट्रिक सामान विक्री व दुरुस्तीचे त्याचे दुकान होते. काही तरी कारणावरून रागाच्या भरात मंगळवारी त्याने आत्महत्येचा निर्णय घेतला. आत्महत्येसाठी दुपारी तो घरातून बाहेर पडला. फिरत फिरत तो अखेर संग्रामनगरातील रेल्वेरुळावर पोहोचला. त्याचवेळी त्याच्या वडिलांचा फोन आला. वडिलांना आत्महत्या करत असल्याचे सांगतच त्याने रेल्वेसमोर उडी मारली. हादरलेल्या वडिलांनी जवाहरनगर ठाण्यातील आपल्या पोलीस मित्राला फिरोजच्या आलेल्या फोनविषयी सांगितले असता त्याला शोधण्यासाठी पोलीस मित्र निघणार तोच एका तरुणाने संग्रामनगरजवळ रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केल्याची खबर ठाण्यात येऊन धडकली. लगेच पोलिसांनी तिकडे धाव घेतली. तेथे फिरोजचे प्रेत आढळून आले. फिरोजच्या आत्महत्येप्रकरणी जवाहरनगर ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.