शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
3
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
5
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
6
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?
7
आयडियाची कल्पना! "मला १०० रुपये द्या ना...", गाडी खरेदी करण्यासाठी महिलेचा 'कारनामा'
8
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
9
सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता
10
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले
11
Navratri 2025: नवरात्रीला घटस्थापना कशी करावी? जाणून घ्या साहित्य, मुहूर्त आणि शास्त्रोक्त विधी!
12
निलेश साबळेनेच मला बाईचं कॅरेक्टर करायला सांगितलं होतं, भाऊ कदमचा खुलासा
13
भूपतीचा शस्त्रसंधीचा प्रस्ताव, जगन म्हणतो शस्त्र ठेवणार नाही ! माओवादी संघटनेतील वाद चव्हाट्यावर
14
अमेरिकेत करिअरचे दार उघडणारा H-1B व्हिसा काय आहे? कोणाला मिळतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती...
15
पुढच्या आठवड्यात येणार IPO चा पाऊस, २२ आयपीओंमध्ये मिळणार गुंतवणूकीची संधी; कोणत्या आहेत कंपन्या?
16
हृदयस्पर्शी! "आई-वडिलांना सोडून मुलगी गेली लंडनला"; ८० वर्षांचे आजोबा ट्रेनमध्ये विकतात पदार्थ
17
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
18
GST Rate Cut: ५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
19
Hanuman Temple: 'या' मंदिरात हनुमान निद्रावस्थेत, तरीही केवळ दर्शनाने पूर्ण होते भक्तांची प्रत्येक इच्छा 
20
Vivo Y50i: झटक्यात चार्ज होणार आणि दिर्घकाळ चालणार; विवोचा बजेट स्मार्टफोन बाजारात!

परळी शहरातील अतिक्रमणावर हातोडा

By admin | Updated: September 17, 2014 01:13 IST

परळी: मागील पाच वर्षांपेक्षा जास्त दिवसांपासून येथील गजबजलेल्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले होते. हे अतिक्रमण झाल्यामुळे वाहतूक कोंडीसह अपघात होत होते.

परळी: मागील पाच वर्षांपेक्षा जास्त दिवसांपासून येथील गजबजलेल्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले होते. हे अतिक्रमण झाल्यामुळे वाहतूक कोंडीसह अपघात होत होते. तसेच पादचारी व सर्वसामान्यांनाही याचा त्रास होत होता. मंगळवारी पोलीस प्रशासनाच्या मदतीने शहरातील हनुमान मंदिर परिसर, मोंढा भागातील अतिक्रमणावर हातोडा फिरविण्यात आला. यावेळी पानटपऱ्या, पत्र्याचे शेड, अनधिकृत दुकाने हटविण्यात आली. कारवाईनंतर रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला.मागील काही वर्षांपासून हनुमान मंदिर परिसरातील रस्त्यावर वाहने उभी करण्यात येत होती. तसेच मंदिराच्या भिंतीला चिटकूनच चहाची दुकाने, पानटपऱ्या थाटण्यात आल्या होत्या. विविध हॉटेल, दुकाने थाटल्यामुळे अतिक्रमण वाढले होते. ग्रामीण भागातील नागरिक विविध कामांसाठी मोंढ्यात असले असता त्यांची या हॉटेलमध्ये भूक भागत होती. मात्र हे हॉटेल अनाधिकृत जागेत असल्याने मंगळवारी या अतिक्रमणावर हातोडा फिरविण्यात आला. कामांसाठी येणाऱ्या नागरिकांमुळे या मोंढा भागात मोठ्या प्रमाणात गर्दी असायची. तसेच हनुमान मंदिर परिसरातही मोठ्या प्रमाणात अतिक्रमण थाटल्यामुळे वाहनधारकांना व भाविक भक्तांची मोठे हाल व्हायचे. दर्शनासाठी दूरवरून येणाऱ्या भाविक भक्तांची गैरसोय होत असल्याने अनेक वेळा ही अतिक्रमणे हटवावीत, अशा मागण्या करण्यात येत होत्या. अखेर सर्वसामान्यांनी केलेल्या मागणीला मंगळवारी यश आले. मंगळवारी परळीचे पोलीस निरीक्षक धरमसिंग चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्तात या भागातील अतिक्रमणे हटविण्यात आली. हॉटेल, दुकाने, पानटपऱ्या हटविल्यामुळे या भागातील रस्ते मोकळे झाले आहेत. त्यामुळे समाधान व्यक्त होत आहे. वाहतूक कोंडीचा प्रश्नही मार्गी लागला आहे. पाच वर्षानंतर ही अतिक्रमणे हटल्याने मोंढ्यात जी गैरसोय होत होती ती आता होणार नाही, असे बोलले जात आहे.काही वर्षांपूर्वी तत्कालिन मुख्याधिकारी चेतना केरूरे यांनी मोंढा भागातील अतिक्रमणावर हातोडा फिरविला होता. मात्र पुन्हा ही अतिक्रमणे थाटली आणि पहिले पाढेपंचावन्न अशी परिस्थिती निर्माण झाली. मंगळवारी पोलीसांनी हटविलेले अतिक्रमण पुन्हा बसू देऊ नये, अशी मागणी केली जात असून जे अतिक्रमणे करतील, त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, असा सूर सर्वसामान्यांतून निघत आहेत. (वार्ताहर)मोंढा भागातील अतिक्रमणे हटविण्यामुळे येथे येणाऱ्या ग्रामीण भागातील शेतकरी, व्यापारी यांच्यामधून समाधान व्यक्त होत आहे. मागील पाच वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न मार्गी लागल्याने व्यापारी, नागरिकांमधून काही प्रमाणात आनंद व्यक्त होत आहे. तसेच हनुमान मंदिर परिसरातील अतिक्रमणावर हातोडा फिरविल्याने दर्शनासाठी येणाऱ्या भाविक, भक्तांची गैरसोय टळणार आहे. आता ही अतिक्रमणे पुन्हा थाटू देऊ नयेत, अशी मागणी सर्वसामान्यांमधून होत आहे.