शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
3
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
4
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
5
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
6
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
7
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
8
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
9
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
10
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
11
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
12
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
13
सर्वपित्री अमावास्या २०२५: पूर्वज स्मरणासह ‘ही’ कामे अवश्य कराच; पुण्य-वरदान-कृपा लाभेल!
14
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
15
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
16
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?
17
आयडियाची कल्पना! "मला १०० रुपये द्या ना...", गाडी खरेदी करण्यासाठी महिलेचा 'कारनामा'
18
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
19
सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता
20
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले

धोकादायक खोल्यांवर हातोडा

By admin | Updated: December 9, 2015 23:50 IST

जालना : जिल्ह्यातील १०५ गावांतील जिल्हा परिषद शाळांच्या तब्बल २२४ धोकादायक बनलेल्या वर्गखोल्या जमीनदोस्त करण्यात येणार आहेत.

जालना : जिल्ह्यातील १०५ गावांतील जिल्हा परिषद शाळांच्या तब्बल २२४ धोकादायक बनलेल्या वर्गखोल्या जमीनदोस्त करण्यात येणार आहेत. यार् खोल्यांमध्ये विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करणे जिकिरीचे बनले होते. अनेकदा किरकोळ अपघातही झाले आहेत. या खोल्या जमीनदोस्त करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे.जिल्हा परिषद शाळांमध्ये असलेल्या मूलभूत सुविधा व ज्ञानार्जन नेहमीच चर्चेचा विषय राहिले आहे. धोकदायक वर्गखोल्या, संरक्षक भिंतीची दुरवस्था, बसण्यासाठी जागा नाही, पिण्याचे पाणी नाही यामुळे विद्यार्थी त्रस्त आहेत. धोकादायक वर्गखोल्या पाडाव्यात यासाठी ग्रामस्थांची अनेक दिवसांची मागणी होती. पावसाळ्यात तर या खोल्यांमध्ये जाण्याचीही भीती वाटते. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने भिंतीला तडे जाणे, पत्रे फुटणे आदी तांत्रिक मुद्यांचा अभ्यास करत २२४ वर्गखोल्या पाडण्यायोग्य असल्याचा अहवाल सादर केला. अंबड तालुक्यातील आठ गावांमधील १५ वर्गखोल्या पाडण्यात येणार आहेत.मंठा तालुक्यातील १६,परतूर तालुक्यातील ६, घनसावंगी तालुक्यातील २४, भोकरदन तालुक्यातील ८३,जाफराबाद तालुक्यातील ३२, जालना तालुक्यातील २८ तर बदनापूर तालुक्यातील २० वर्गखोल्या जमीनदोस्त करण्यात येणार आहेत. यासंदर्भात जि.प.चे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी गजानन सूसर म्हणाले, धोकादायक वर्गखोल्या पाडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या खोल्या पाडल्यानंतर निधी उपलब्ध करून नवीन खोल्यांचे बांधकाम करण्यात येणार आहे. या वर्ग खोल्या पाडण्यात येणार असल्या तरी विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेतली जाणार आहे. विद्यार्थ्यांना बसण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात येईल, असे सुसर यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)भोकरदन तालुक्यातील ३० गावांतील ८३ वर्गखोल्या धोकादायक बनल्या आहेत. वालसावंगीसह अनेक गावातील ग्रामस्थांनी वर्गखोल्यांचे नूतनीकरण अथवा नव्याने बांधकाम करण्यासाठी शिक्षण विभागाकडे वारंवार पाठपुरावा केला आहे. अखेर जि.प. प्रशासनाने दखल घेत हा निर्णय घेतला आहे.भिंतीला तडे जाणे,पत्रे फुटणे तसेच इतर मूलभूत सुविधांचा अभाव लक्षात घेऊन जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागने तांत्रिक अहवाल शिक्षण विभागास सादर केला आहे. वर्ग खोल्या पाडल्यानंतर साहित्याची नोंद ग्रामपंचात रजिस्टरला घ्यावी,उपयोगी साहित्याचा पूर्ण वापर करावा तसेच निरूपयोगी साहित्याची शासन नियमानुसार विल्हेवाट लावण्यात येणार आहे.