शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

धोकादायक खोल्यांवर हातोडा

By admin | Updated: December 9, 2015 23:50 IST

जालना : जिल्ह्यातील १०५ गावांतील जिल्हा परिषद शाळांच्या तब्बल २२४ धोकादायक बनलेल्या वर्गखोल्या जमीनदोस्त करण्यात येणार आहेत.

जालना : जिल्ह्यातील १०५ गावांतील जिल्हा परिषद शाळांच्या तब्बल २२४ धोकादायक बनलेल्या वर्गखोल्या जमीनदोस्त करण्यात येणार आहेत. यार् खोल्यांमध्ये विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करणे जिकिरीचे बनले होते. अनेकदा किरकोळ अपघातही झाले आहेत. या खोल्या जमीनदोस्त करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे.जिल्हा परिषद शाळांमध्ये असलेल्या मूलभूत सुविधा व ज्ञानार्जन नेहमीच चर्चेचा विषय राहिले आहे. धोकदायक वर्गखोल्या, संरक्षक भिंतीची दुरवस्था, बसण्यासाठी जागा नाही, पिण्याचे पाणी नाही यामुळे विद्यार्थी त्रस्त आहेत. धोकादायक वर्गखोल्या पाडाव्यात यासाठी ग्रामस्थांची अनेक दिवसांची मागणी होती. पावसाळ्यात तर या खोल्यांमध्ये जाण्याचीही भीती वाटते. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने भिंतीला तडे जाणे, पत्रे फुटणे आदी तांत्रिक मुद्यांचा अभ्यास करत २२४ वर्गखोल्या पाडण्यायोग्य असल्याचा अहवाल सादर केला. अंबड तालुक्यातील आठ गावांमधील १५ वर्गखोल्या पाडण्यात येणार आहेत.मंठा तालुक्यातील १६,परतूर तालुक्यातील ६, घनसावंगी तालुक्यातील २४, भोकरदन तालुक्यातील ८३,जाफराबाद तालुक्यातील ३२, जालना तालुक्यातील २८ तर बदनापूर तालुक्यातील २० वर्गखोल्या जमीनदोस्त करण्यात येणार आहेत. यासंदर्भात जि.प.चे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी गजानन सूसर म्हणाले, धोकादायक वर्गखोल्या पाडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या खोल्या पाडल्यानंतर निधी उपलब्ध करून नवीन खोल्यांचे बांधकाम करण्यात येणार आहे. या वर्ग खोल्या पाडण्यात येणार असल्या तरी विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेतली जाणार आहे. विद्यार्थ्यांना बसण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात येईल, असे सुसर यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)भोकरदन तालुक्यातील ३० गावांतील ८३ वर्गखोल्या धोकादायक बनल्या आहेत. वालसावंगीसह अनेक गावातील ग्रामस्थांनी वर्गखोल्यांचे नूतनीकरण अथवा नव्याने बांधकाम करण्यासाठी शिक्षण विभागाकडे वारंवार पाठपुरावा केला आहे. अखेर जि.प. प्रशासनाने दखल घेत हा निर्णय घेतला आहे.भिंतीला तडे जाणे,पत्रे फुटणे तसेच इतर मूलभूत सुविधांचा अभाव लक्षात घेऊन जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागने तांत्रिक अहवाल शिक्षण विभागास सादर केला आहे. वर्ग खोल्या पाडल्यानंतर साहित्याची नोंद ग्रामपंचात रजिस्टरला घ्यावी,उपयोगी साहित्याचा पूर्ण वापर करावा तसेच निरूपयोगी साहित्याची शासन नियमानुसार विल्हेवाट लावण्यात येणार आहे.