शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

अर्धवट रस्ते पावसाळ्यात ठरणार डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:05 IST

खुलताबाद : तालुक्यातील नागरिकांसाठी औरंगाबाद शहर जवळ करणारा काटशेवरी ते जटवाडा व म्हैसमाळ रस्ता, यंदाच्या पावसाळ्यात डोकेदुखी ठरणार आहे. ...

खुलताबाद : तालुक्यातील नागरिकांसाठी औरंगाबाद शहर जवळ करणारा काटशेवरी ते जटवाडा व म्हैसमाळ रस्ता, यंदाच्या पावसाळ्यात डोकेदुखी ठरणार आहे. ठिकठिकाणी अर्धवट अवस्थेत कामांमुळे आधीच हा रस्ता धोकादायक बनला असून, पावसाळ्यात होणार हाल तर न विचारलेलेच बरे.

औरंगाबाद शहराला जोडणारा महामार्ग रखडल्याने खुलताबाद तालुक्याचा विकासाचा मार्ग रखडल्याची भावना सर्वसामान्य नागरिकांची झाली आहे.

तालुक्यातील शेतकरी, कर्मचारी अशा सर्वांना सोयीचा असलेला आणि बहुतांशी गावांना शहराशी जोडणारा जवळचा मार्ग म्हणजे काटशिवरी-जटवाडा- औरंगाबाद हा रस्ता होय. या रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण होण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांनी अनेक वेळा रास्ता रोको, धरणे आंदोलन केली आहेत. परिणामी, राज्य शासनाने या रस्त्याचे काम हाती घेतले, परंतु गेल्या दोन वर्षांपासून काम चालू असून, डांबरीकरणाचे काही अर्धवट अवस्थेत पडलेले आहे. या रस्त्यातील अनेक ठिकाणी पुलाचे काम आणि डांबरीकरणाचे काम बाकी आहे. खराब रस्त्यांमुळे रात्री-अपरात्री येथून जाणे जीवघेणे ठरू लागले आहे. त्यामुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वी रस्त्याची कामे करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.

दोन वर्षांपासून कामे रखडली

पावसाळा सुरू होण्यापूर्वी तालुक्यातील प्रमुख रस्त्यांची डागडुजी करण्याची मागणी केली जात आहे. तालुक्यातील खुलताबाद-म्हैसमाळ, काटशिवरीफाटा ते जटवाडा या मार्गाचे काम दोन वर्षांपासून जाणूनबुजून पूर्ण केल्या जात नाही. धामणगाव-लोणी-बोडखा, खुलताबाद-खिर्डी, वेरुळधून गेलेला धुळे राष्ट्रीय महामार्ग आदी रस्त्यांची कामे रखडली आहेत. पावसाळ्यात तर या रस्त्यांची अवस्था दयनीय झालेली आहे. मृत्यूचा सापळा बनला आहे.

फोटो : म्हैसमाळ व काटशिवरी फाटा ते जटवाडा रस्ता पावसाळ्यात असा चिखलयुक्त होतो. फोटो संग्रहीत