माधवी वाकोडकर, औरंगाबाददेशातील माता मृत्यूंमध्ये प्रगतिशील म्हणवून घेणाऱ्या महाराष्ट्राचे नाव आघाडीवर आहे. आज देशात लाखामागे माता मृत्यूचे प्रमाण १७८ असून यातील निम्मे मृत्यू (सरासरी ८७) एकट्या महाराष्ट्रात होतात. केंद्र सरकार गेल्या अनेक वर्षांपासून देशात राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान राबवीत आहे. या माध्यमातून मातांच्या आरोग्याकडे लक्ष दिले जात आहे. माता, अर्भक व नवजात शिशूंचा मृत्यू रोखणे हे या मोहिमेचे लक्ष्य आहे. एसआरएस (सॅम्पल रजिस्ट्रेशन स्कीम- नमुना नोंदणी पद्धती) या केंद्र सरकारच्या सर्वेक्षण टीमच्या पाहणी अहवालानुसार आरोग्य यंत्रणा व व्यवस्थापनामध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. या टीमद्वारे मातामृत्यू दरासंदर्भातील पाहणी दर तीन वर्षांनी केली जाते. ही पाहणी जिल्ह्यांतर्गत केली जाते. मात्र, अहवाल सादर करताना संपूर्ण राज्याची सद्य:स्थिती काय आहे याचा अहवाल तयार केला जातो.गरोदर मातांना सर्व शासकीय आरोग्य संस्थांमध्ये खालील सुविधा मोफत मिळतात.1 प्रसूती, मोफत सिझेरियन (शस्त्रक्रिया)2 प्रसूतीसंदर्भातील औषधे व अन्य साहित्य3 प्रयोगशाळेतील आवश्यक तपासण्या4 प्रसूतीपश्चात मातेला आहार5 प्रसूतीसाठी लागणारा आवश्यक रक्तपुरवठा6 प्रसूतीसाठी घरापासून रुग्णालयापर्यंत वाहनव्यवस्था.7 एका आरोग्य संस्थेतून पुढील संदर्भ सेवा देण्यासाठी दुसऱ्या आरोग्य संस्थेत पोहोचविण्यासाठी वाहनव्यवस्था. 8 प्रसूतीपश्चात आरोग्य संस्थेतून घरी पोहोचविण्यासाठी वाहनव्यवस्था.9 शासकीय आरोग्य संस्थेमध्ये गरोदर मातेस विनाशुल्क उपचार देण्यात यावेत. वरील सारणीवरून असे लक्षात येते की, महाराष्ट्रातील मातामृत्यूचे प्रमाण जास्त आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने जननी शिशू सुरक्षा कार्यक्रम जाहीर केला आहे. महाराष्ट्र राज्यातील सध्याचे मातामृत्यूचे प्रमाण देशाच्या तुलनेत कमी आहे. केंद्र सरकारतर्फे जननी शिशू सुरक्षा कार्यक्रम राबविला जातो आहे, अशी माहिती एनआरएचएमकडून (नॅशनल रुरल हेल्थ मिशन- राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान) मिळाली.नवजात अर्भकांसाठीच्या मोफत सुविधा०-३० दिवसांपर्यंत अर्भकांना सर्व शासकीय आरोग्य संस्थांमध्ये आरोग्यसेवा.औषधे व साहित्य पुरवठा.जिल्हा व उपजिल्हा रुग्णालयांमध्ये रुग्णांसाठी नाममात्र दरावर आहार उपलब्ध आहे. रक्तपुरवठा- गरोदरपण प्रसूतीअंतर्गत व प्रसूतीपश्चात मातेला तीव्र रक्ताक्षय प्रसूतीपश्चात रक्तस्राव, सिझेरियन शस्त्रक्रियेच्या मातेस रक्तपुरवठा करण्याची आवश्यकता भासल्यास मोफत रक्तपुरवठा. शिशू जननी सुरक्षा कार्यक्रम अतिशय उपयुक्त ठरत आहे. विशेषत: ग्रामीण भागात याचा प्रभाव बघायला मिळतो. त्यामुळे मातामृत्यूचे प्रमाणदेखील घटले आहे. त्यासाठी शासन स्तरावर मोठे प्रयत्न केले जातात. हा उपक्रम वर्षभर राबविला जातो. -डॉ. आर.टी. चव्हाण,विभागीय उपसंचालक,आरोग्य सेवारुग्ण फी न आकारणेगरोदर मातांना प्रसूतीसाठी व प्रसूतीपश्चात येणाऱ्या मातांना तसेच ३० दिवसांपर्यंत नवजात अर्भकांना बाह्यरुग्ण, आंतररुग्ण फी, प्रयोगशाळा तपासणी फी असे कोणतेही शुल्क आकारू नये.नवजात शिशूंना मोफतसंदर्भ सेवा देणे.मृत्यूचे प्रमाण वाढण्याची कारणेजनजागृतीची कमतरता, सुविधांचा लाभ पोहोचण्यात अडचणी, सुरक्षिततेचा अभाव , अज्ञान , अंधश्रद्धा व आततायीपणा
देशातील निम्मे मातामृत्यू महाराष्ट्रात
By admin | Updated: July 10, 2014 01:15 IST