शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
2
न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
3
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
4
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
5
‘मला उमेदवारी द्या, अन्यथा माझ्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास पक्ष जबाबदार राहील’, भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची धमकी
6
चांदीची 'पांढरी' लाट! सोन्याला मागे टाकत गाठला २ लाखांचा ऐतिहासिक टप्पा; काय आहेत भाववाढीची कारणे?
7
डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक का वापरलं 'भारत मॉडेल'?; मिड टर्म निवडणुकीपूर्वी अमेरिकेत मोफत खैरात
8
'पुढे दरोडा पडलाय, दागिने काढून ठेवा'; पोलिसांच्या वेशातील टोळीचा पर्दाफाश, लोकांना घाबरवून लुटायचे
9
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
10
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे २९ महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
11
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
12
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
13
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
14
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
15
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
16
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
17
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
18
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
19
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
20
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
Daily Top 2Weekly Top 5

मुबलक पाणी असूनही सहा दिवसांआड पुरवठा

By admin | Updated: April 18, 2017 00:06 IST

नळदुर्ग : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बोरी धरणात मुबलक पाणीसाठा उपलब्ध असतानाही पालिकेकडून मात्र शहरवासियांना सहा दिवसाआड तासभर पाणीपुरवठा होत आहे

नळदुर्ग : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बोरी धरणात मुबलक पाणीसाठा उपलब्ध असतानाही पालिकेकडून मात्र शहरवासियांना सहा दिवसाआड तासभर पाणीपुरवठा होत आहे. शिवाय मागील आठ दिवसांपासून तर नळाद्वारे पाणीच आले नसल्यामुळे शहरवासियांत संताप व्यक्त होत आहे. नळदुर्ग शहराची लोकसंख्या २० हजारच्या आसपास आहे. शहराला बोरी धरणातून पाणीपुरवठा केला जातो. बोरीधरणावर जॅकवेल असून, तेथे ४० एचपीचा व्हर्टीकल टर्बाईन पंप बसविलेला आहे. जॅकवेलपासून अडीच तीन किमी अंतरावर जलशुद्धीकरण केंद्र व तेथून एक किलोमिटर अंतरावर जलकुंभ बांधण्यात आले आहे. शहरात जवळपास ३४५० घरे असून, फक्त २१०० घरात नळकनेक्शन आहे. प्रत्येक नागरिकांची दैनंदीन पाण्याची गरज ६० लिटर इतकी आहे. शहराची लोकसंख्या व पाण्याची गरज विचारात घेता शहराला दररोज १२ लाख लिटर पाण्याचा पुरवठा होणे अपेक्षित आहे. बोरी धरणावरील व्ही.टी.पंप दर मिनीटाला ८०० लिटर पाणी उपसा करते. धरणावरील पंप दिवसभरात जवळपास २० तासापेक्षा जास्त काळ चालू राहतो. या काळात १० लाख ८ हजार लिटर पाण्याचा उपसा दररोज होतो. असे असतानाही पालिका ५ ते ६ दिवसाआड एक तास पाणी पुरवठा करीत आहे. दररोज १० लाख लिटर पाणी उपसा होवूनसुद्धा नागरिकांना ६ दिवसाआड पाणी मिळू लागल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.आ. मधुकरराव चव्हाण यांनी शहराची पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेवून शहरात नवीन शुद्धीकरण केंद्र, जलकुंभ व जलवाहिन्या निर्माण करण्यासाठी ४ कोटी १९ लाख रुपयाची योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत राबविली. तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी मात्र नकाशाप्रमाणे शहरात पाईपलाईन न टाकता अन्य ठिकाणी टाकल्याने शहरातील जवळपास ९०० नळधारकांना जुन्या पाईप लाईनवरुन पाणी पुरवठा होत आहे. मागच्या टंचाईकाळात सत्ताधारी काँग्रेस पक्ष नळाला पाणी वेळेवर सोडत नाही म्हणून विरोधी बाकावरील राष्ट्रवादीने पालिकेवर गाढव मोर्चा आणून निषेध व्यक्त केला होता. पाणी प्रश्नामुळे काँग्रेसच्या हातून पालिकेची सत्ता गेली व राष्ट्रवादीने निर्विवाद सत्ता मिळविली. आता राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष असून, त्यांनी २६ डिसेंबर रोजी पालिकेची सुत्रे हाती घेतली. आज ४ महिन्यापेक्षा जास्त कालावधी लोटला तरी पालिकेच्या कामकाजात तसुभरही फरक दिसत नसल्याने नागरिकांत संताप व्यक्त होत आहे. (वार्ताहर)