शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
2
Operation Sindoor: पाकिस्तानच्या आण्विक सुविधा केंद्रामधून किरणोत्सर्ग झालाय का, IAEA ने काय सांगितले?
3
Boycott Turkey: एकनाथ शिंदेंनी भारतीय व्यापारी आणि पर्यटकांची थोपाटली पाठ, तुर्की-अझरबैजानला फटका!
4
पहलगामचा बदला; आता स्थानिक दहशतवादी भारतीय सैन्याच्या निशाण्यावर, आतापर्यंत 6 ठार
5
Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल
6
निफ्टीने ७ महिन्यांनंतर ओलांडला २५,००० चा टप्पा; डिफेन्समधील तेजी कायम, हे शेअर्स घसरले
7
IND vs ENG: तब्बल ५०५५ दिवसांनंतर टीम इंडियाच्या बाबतीत घडून येणार 'असा' योगायोग
8
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
9
'तो' वाद पिझ्झाच्या क्वालिटीवरून, मराठी न बोलण्यावरून नाही; महिलेने सांगितली खरी स्टोरी
10
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
11
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
12
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
13
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
14
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
15
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
16
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
17
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
18
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
19
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
20
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...

मुबलक पाणी असूनही सहा दिवसांआड पुरवठा

By admin | Updated: April 18, 2017 00:06 IST

नळदुर्ग : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बोरी धरणात मुबलक पाणीसाठा उपलब्ध असतानाही पालिकेकडून मात्र शहरवासियांना सहा दिवसाआड तासभर पाणीपुरवठा होत आहे

नळदुर्ग : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बोरी धरणात मुबलक पाणीसाठा उपलब्ध असतानाही पालिकेकडून मात्र शहरवासियांना सहा दिवसाआड तासभर पाणीपुरवठा होत आहे. शिवाय मागील आठ दिवसांपासून तर नळाद्वारे पाणीच आले नसल्यामुळे शहरवासियांत संताप व्यक्त होत आहे. नळदुर्ग शहराची लोकसंख्या २० हजारच्या आसपास आहे. शहराला बोरी धरणातून पाणीपुरवठा केला जातो. बोरीधरणावर जॅकवेल असून, तेथे ४० एचपीचा व्हर्टीकल टर्बाईन पंप बसविलेला आहे. जॅकवेलपासून अडीच तीन किमी अंतरावर जलशुद्धीकरण केंद्र व तेथून एक किलोमिटर अंतरावर जलकुंभ बांधण्यात आले आहे. शहरात जवळपास ३४५० घरे असून, फक्त २१०० घरात नळकनेक्शन आहे. प्रत्येक नागरिकांची दैनंदीन पाण्याची गरज ६० लिटर इतकी आहे. शहराची लोकसंख्या व पाण्याची गरज विचारात घेता शहराला दररोज १२ लाख लिटर पाण्याचा पुरवठा होणे अपेक्षित आहे. बोरी धरणावरील व्ही.टी.पंप दर मिनीटाला ८०० लिटर पाणी उपसा करते. धरणावरील पंप दिवसभरात जवळपास २० तासापेक्षा जास्त काळ चालू राहतो. या काळात १० लाख ८ हजार लिटर पाण्याचा उपसा दररोज होतो. असे असतानाही पालिका ५ ते ६ दिवसाआड एक तास पाणी पुरवठा करीत आहे. दररोज १० लाख लिटर पाणी उपसा होवूनसुद्धा नागरिकांना ६ दिवसाआड पाणी मिळू लागल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.आ. मधुकरराव चव्हाण यांनी शहराची पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेवून शहरात नवीन शुद्धीकरण केंद्र, जलकुंभ व जलवाहिन्या निर्माण करण्यासाठी ४ कोटी १९ लाख रुपयाची योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत राबविली. तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी मात्र नकाशाप्रमाणे शहरात पाईपलाईन न टाकता अन्य ठिकाणी टाकल्याने शहरातील जवळपास ९०० नळधारकांना जुन्या पाईप लाईनवरुन पाणी पुरवठा होत आहे. मागच्या टंचाईकाळात सत्ताधारी काँग्रेस पक्ष नळाला पाणी वेळेवर सोडत नाही म्हणून विरोधी बाकावरील राष्ट्रवादीने पालिकेवर गाढव मोर्चा आणून निषेध व्यक्त केला होता. पाणी प्रश्नामुळे काँग्रेसच्या हातून पालिकेची सत्ता गेली व राष्ट्रवादीने निर्विवाद सत्ता मिळविली. आता राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष असून, त्यांनी २६ डिसेंबर रोजी पालिकेची सुत्रे हाती घेतली. आज ४ महिन्यापेक्षा जास्त कालावधी लोटला तरी पालिकेच्या कामकाजात तसुभरही फरक दिसत नसल्याने नागरिकांत संताप व्यक्त होत आहे. (वार्ताहर)