शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीनवर ‘हळद्या’चा हल्ला

By admin | Updated: September 28, 2014 00:41 IST

औसा : मागील वर्षभरापासून शेतकऱ्यांची अवस्था चक्रव्युहात अडकलेल्या अभिमन्यूसारखी झाली़ कारण संकटाचा सामना करीत भाकरीचा चंद्र शोधणाऱ्या

औसा : मागील वर्षभरापासून शेतकऱ्यांची अवस्था चक्रव्युहात अडकलेल्या अभिमन्यूसारखी झाली़ कारण संकटाचा सामना करीत भाकरीचा चंद्र शोधणाऱ्या शेतकऱ्यांसमोर संकटे मात्र फेर धरून आहेत़ मागील वर्षी रबी हंगामात गारपीट, खरीप हंगामातही पावसाची उघडीप, उशिराने झालेल्या पेरण्या व पुन्हा पाऊस गायब झाल्याने पाणीटंचाई कायम व हातातोंडाशी आलेल्या सोयाबीनवरही हळद्या रोगाचा प्रादूर्भाव झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे़ औसा तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी झाले़ मागील चार-पाच वर्षातील पावसाची वर्गवारी पाहता पाऊस कमी कमी होत गेल्याचे दिसून येत आहे़ परिणामी पाण्याचा दुष्काळ जाणवत आहे़ मागील वर्षी सबंध तालुक्यात रबी हंगामातील पिके जोमदार होती़ पण ही पिकेहाता-तोंडाशी आल्यानंतर मार्च महिन्यात दहा ते बारा दिवस मोठ्या प्रमाणात गारपीठ झाली़ आणि शेतकऱ्यांचे कोट्यवधी रूपयांचे नुकसान झाले़ त्यामधून कसातरी सावरलेला शेतकरी खरीप हंगामाची वाट पाहू लागला़ पण खरीप हंगामातील पेरण्यासाठी पाऊस वेळेवर झाला नाही़ तब्बल एक महिना उशिराने पडलेल्या पावसानंतर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या़ अन् ६० टक्के शेतकऱ्यांचे सोयाबीन उगवलेच नाही़ अनेकांना दुबार, तिबार पेरण्या कराव्या लागल्या़ अन् पुन्हा पाऊस गायब झाला़ कमीअधिक पावसावर सोयाबीनचे पीक हातातोंडाशी आले होते़ पण आता हळद्याचा फटका बसणार आहे़ औसा तालुक्यात यावर्षी ९८ हजार ७०८ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन आहे़ पेरण्या उशिरा झाल्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात या क्षेत्रावर पेरण्या केलेल्या सोयाबीनला कधी कमी व कधी रिमझिम पावसामुळे रोगराईचे प्रमाण अधिक वाढले आहे़ यामुळे अधिक फवारण्या करून मेटाकुटीला आलेला शेतकरी आता हळद्या रोगाच्या हल्ल्यामुळे हवालदिल झाला आहे़ यामुळे सोयाबीनच्या उत्पादनात घट होणार आहेच़ पण परिपक्व न होताच सोयाबीन काढणीला येणार असल्याचे शेतकरी सांगत आहेत़ एक झाले की दुसरे संकट येत असल्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना शेती धरताही येईना आणि सोडताही येईना अशी अवस्था झाली आहे़(वार्ताहर)