शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

गारपिटीतील नुकसानीचे पंचनामे रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2017 23:52 IST

लातूर :कृषिमंत्र्यांनी नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. मात्र १० दिवस उलटले तरी अद्याप कुठल्याही गावाच्या नुकसानीचा अहवाल प्राप्त झालेला नाही.

लातूर : १५ मार्च रोजी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे लातूर, औसा तालुक्यात मोठ्या प्रमाणात रबी पिकांचे नुकसान झाले. द्राक्ष बागा व आंब्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पालकमंत्र्यांसह कृषिमंत्र्यांनी महसूल व कृषी यंत्रणेला नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. मात्र १० दिवस उलटले तरी अद्याप कुठल्याही गावाच्या नुकसानीचा अहवाल प्राप्त झालेला नाही. १५ व १६ मार्च असे दोन दिवस लातूर जिल्ह्यात अवकाळीने कहर केला होता. औसा तालुक्यात जवळपास २२ हजार हेक्टर तर लातूर तालुक्यात साडेआठ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला होता. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवकांची गावस्तरावर समिती स्थापन करून या समितीकडून नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. आता १० दिवस उलटले तरी अद्याप एकाही गावाच्या नुकसानीचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध झालेला नाही. पंचनामे चालू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. आणखीन पाच ते सहा दिवस पंचनाम्याला वेळ लागणार आहे. दोन दिवस झालेल्या गारपिटीमुळे नुकसानीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता यंत्रणेला आहे. त्यामुळे पंचनाम्याला वेळ लागू शकतो, असे जिल्हा कृषी कार्यालयातून सांगण्यात आले. जिल्ह्यात सगळीकडे अवकाळी पाऊस झाला असला, तरी केवळ औसा, लातूर आणि अहमदपूर या तालुक्यांतच गारपिटीमुळे नुकसान झाले असल्याचे म्हणणे सरकारी यंत्रणेचे आहे. (प्रतिनिधी)