शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
2
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
3
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
4
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
5
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
6
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
7
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
8
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी
9
IPL 2025: "धोनीचे फॅन्स खरे आहेत, बाकीच्यांचे..."; हरभजन सिंगने विराट कोहलीवर केला शाब्दिक हल्ला?
10
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
11
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
12
"आजाराबद्दल ऐकून काळजी वाटली, आम्ही तुमच्या सोबत..."; PM मोदींनी जो बायडेनना दिला धीर
13
एसीची सर्व्हिसिंग करण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का? अन्यथा बसेल मोठा फटका
14
मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन
15
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
16
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!
17
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
18
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
19
मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट
20
ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?

गारपीटग्रस्त शेतकऱ्यांचा विश्वासघात

By admin | Updated: July 7, 2014 00:42 IST

संजय जाधव , पैठण पैठण तालुक्यात मार्च व फेब्रुवारीदरम्यान झालेला अवकाळी पाऊस व गारपिटीने शेकडो गावांतील हजारो शेतकऱ्यांच्या पिकांचे, फळबागांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.

संजय जाधव , पैठणपैठण तालुक्यात मार्च व फेब्रुवारीदरम्यान झालेला अवकाळी पाऊस व गारपिटीने शेकडो गावांतील हजारो शेतकऱ्यांच्या पिकांचे, फळबागांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. महसूल, कृषी व पं.स. प्रशासनाच्या संयुक्त समितीने यासंदर्भात चुकीचे पंचनामे करून गावेच्या गावे शासनाच्या मदतीपासून वंचित ठेवली आहेत. यासंदर्भात शेतकऱ्यांनी २ जून रोजी पैठण येथे उपोषण केले होते. यावेळी ८ दिवसांच्या आत पंचनामे करण्याचे आश्वासन तहसीलदार संजय पवार यांनी शेतकऱ्यांना देऊन वेळ निभावून नेली; मात्र ३० दिवसांचा कालावधी लोटल्यानंतर पुढे काहीच न झाल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत.गारपीट व अतिवृष्टीने उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्यासंदर्भात राज्य शासनाने २० मार्च रोजी आदेश जारी केले होते. यात शेती किंवा बहुवार्षिक फळ पिकांच्या ५० टक्के किंवा त्याहून अधिक नुकसान झालेल्या क्षेत्रांना, तसेच जास्तीत जास्त २ हेक्टर क्षेत्रापर्यंत मदत देण्यात येणार असल्याचे शासनाने घोषित करून मदत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे आदेश राज्य शासनाने पारित केले होते.कोऱ्या पंचनाम्यावर घेतल्या सह्या पैठण तालुक्यात चुकीचे पंचनामे झाल्याने हजारो शेतकरी मदतीपासून वंचित राहिले आहेत. पंचनामे करताना गावागावातून शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन कोऱ्या पंचनाम्यावर शेतकरी व साक्षीदाराच्या सह्या घेण्यात आल्या व नंतर त्यावर नुकसानीची टक्केवारी टाकण्यात आली. अशा पद्धतीने विश्वासघात करण्यात आल्याचा आरोप अनेक शेतकऱ्यांनी केला आहे. विशेष म्हणजे तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायक यांनी प्रत्यक्ष क्षेत्रावर जाऊन पंचनामे करावेत, असे आदेश असताना या तिघांनी मिळून कोठेही पंचनामे केले नाहीत. यातील एक जणाने एकूण गावात एक बैठक घेऊन पंचनामे केले. गावातील प्रमुख शेतकरी, राजकीय वजन असलेले शेतकरी यांचेच नुकसान ५० टक्क्यांच्या वर दाखविण्यात आले, तर सर्वसामान्यांचे नुकसान ५० टक्क्यांच्या आत दाखवून त्यांना वगळण्यात आले; परंतु शेतकऱ्यांकडे २ हेक्टर क्षेत्र असतानाही १ हेक्टर क्षेत्राची नोंद घेण्यात आली. काही ठिकाणी ४८ टक्के, तर ४६ टक्के अशी नोंद घेऊन वगळण्यात आले.५० टक्क्यांच्या आत नुकसान दाखविलेपैठण तालुक्यातील शेकडो गावांतील प्रशासनाच्या तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायकांनी पंचनामे केले; मात्र त्यात शेतकऱ्यांचे नुकसान हे ५० टक्क्यांच्या आत दाखवून त्यांना शासकीय मदतीपासून वंचित ठेवण्यात आले. शेतकऱ्यांना समिती सदस्यांचे धक्कादायक उत्तर याबाबत अनेक शेतकऱ्यांनी या समितीच्या सदस्यांना विचारणा केली असता ‘नुकसान ५० टक्क्यांच्या आत दाखवावे, असा वरिष्ठ स्तरावरून आमच्यावर दबाव आहे, असे धक्कादायक उत्तर देण्यात आले. आम्ही हे सांगितले म्हणून वरिष्ठांना सांगू नका; नाही तर आमची नोकरी धोक्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. या सर्व प्रकाराने पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांना जाणूनबुजून मदतीपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप शेतकऱ्यांतून होत आहे.फळबागांचे पंचनामेच नाहीततालुक्यात प्रशसनाच्या वतीने फक्त शेती पिकांचे पंचनामे करण्यात आले. यातून फळबागा सरसकट वगळण्यात आल्या. वास्तविक पैठण तालुक्यात मोसंबी, डाळिंब, केळी आदींसह अनेक फळपिकांचे नुकसान झाले आहे.पंचनाम्याच्या अजब तऱ्हाहार्षी येथील शेतकरी आबासाहेब आगळे यांच्या ६०० मोसंबीच्या झाडांचे फळासह नुकसान झाले. तलाठी व ग्रामसेवकांनी कोऱ्या पंचनाम्यावर सह्या घेतल्या. नंतर त्याचे नाव यादीत आलेच नाही.ब्रह्मगाव येथील फळबागांच्या चारही बाजूने गारपिटीचा पंचनामा केला व मधोमध असलेले फळबागांचे क्षेत्र गारपीट झाली म्हणून वगळले. यासंदर्भात गावातील शेतकऱ्यांनी ७ एप्रिल रोजी तहसीलदार संजय पवार यांच्याकडे लेखी तक्रार केली; मात्र या तक्रारीची अद्याप दखल घेतली नाही, असे या गावकऱ्यांचे म्हणणे आहे.शेतकऱ्यांच्या भावना तीव्रअवकाळी पाऊस, सोबत गारपीट व नंतर वादळाने पैठण तालुक्यातील शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडले आहे. त्यातच पावसाचे आगमन न झाल्याने संपूर्ण खरीप हंगाम धोक्यात आला आहे. या परिस्थितीत प्रशासनाच्या बेफिकीर वृत्तीने शेतकरी संतप्त झाला आहे. या शेतकऱ्यांच्या भावना तीव्र झाल्या आहेत. प्रशासनाने वेळीच भानावर येऊन कामास लागावे, उद्रेकाची वाट पाहू नये, अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांचे नेते जयाजीराव सूर्यवंशी यांनी दिली.