शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
3
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
4
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
5
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
6
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
7
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
8
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
9
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
10
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
11
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
12
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
13
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
14
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
15
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
16
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
17
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
18
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
19
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
20
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!

गारपीट अनुदान वाटप रोखले

By admin | Updated: June 9, 2014 01:14 IST

सेनगाव : हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तहसील कार्यालयाच्या गलथान कारभाराचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे.

सेनगाव : हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तहसील कार्यालयाच्या गलथान कारभाराचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. गारपीट अनुदान याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ झाल्याने तहसीलदारांनी पाच गावांमधील अनुदान वाटपाची प्रक्रियाच थांबविली आहे. गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने आर्थिक मदतीचे वाटप होत आहे. याकरिता सेगनाव येथील तहसील कार्यालयाला १२ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून, हे अनुदान नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आले आहे. तालुक्यात बँक पातळीवर अनुदान वाटप प्रक्रिया सुरू झाल्यानंतर गारपीट सर्वेक्षणाचे पितळ उघडे पडत आहे. येथील तहसील, जिल्हाधिकारी कार्यालयाकडे विविध गावातील शेतकऱ्यांनी तक्रार करून अनुदान वाटपातील गोंधळ समोर आणला आहे. बहुतांश गावातील अनुदान वाटप यादीत एका शेतकऱ्याला दोन वेळेस अनुदान देण्याचा प्रकार घडल्याचा आरोप होत आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवण्यात आले आहे. तलाठी, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक यांनी गांभीर्याने नुकसानीचे पंचनामे केले नसल्याचा आरोपही सर्वसामान्य शेतकऱ्यांकडून होत आहे. या गोंधळाची जिल्हाधिकारी कार्यालयाने दखल घेतल्यानंतर तहसीलदार आर. के. मेंडके यांनी मोठ्या प्रमाणात तक्रारी असलेल्या चोंढी बु., चोंढी खुर्द, ब्राम्हणवाडा, मन्नास पिंपरी, वलाना या पाच गावाचे अनुदान वाटप थांबविले आहे. चौकशी होईपर्यंत सदर अनुदान वाटप होणार नाही. चौकशीसाठी नायब तहसीलदारासह, मंडळ अधिकारी, तलाठी यांचे पथक गठीत करण्यात आले आहे. अनुदान वाटप यादीतील चुका दुरूस्त करून संबंधित गावात चावडीवाचनानंतर अनुदान वाटप करण्यात येणार आहे. या प्रकरणात तहसील कार्यालयाने कामचुकारपणा करणाऱ्या कोणत्याच तलाठी, कर्मचाऱ्यावर कारवाई केली नाही. त्यामुळे हा प्रकार घडला. (वार्ताहर)पाच गावांमध्ये नाराजीसेनगाव तालुक्यातील गारपीट अनुदान याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ झाल्याने तहसीलदारांनी पाच गावांमधील अनुदान वाटपाची प्रक्रियाच थांबविली आहे.तहसील कार्यालयाला १२ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून, हे अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आले.हिंगोली जिल्ह्यात पाचही तालुक्यांमध्ये गारपिटीचे अनुदान वाटप जिल्हा बँकांमार्फत सुरू करण्यात आले आहे.सेनगाव तालुक्यात बँक पातळीवर अनुदान वाटप प्रक्रिया सुरू झाल्यानंतर गारपीट सर्वेक्षणाचे पितळ उघडे पडत आहे. तहसील, जिल्हाधिकारी कार्यालयाकडे विविध गावांतील शेतकऱ्यांनी तक्रार करून अनुदान वाटपातील गोंधळ समोर आणला. बहुतांश गावांतील अनुदान वाटप यादीत एका शेतकऱ्याला दोन वेळेस अनुदान देण्याचा प्रकार घडल्याचा आरोप होत आहे.तहसीलच्या गोंंधळाचा पाच गावांतील शेतकऱ्यांना त्रास झाला आहे.