शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
5
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
6
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
7
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
8
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
9
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
10
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
11
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
12
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
13
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
14
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
15
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
16
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
17
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
18
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
19
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
20
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ

गारपिटीचा तडाखा!

By admin | Updated: March 1, 2016 00:37 IST

जालना : भोकरदन, मंठा, परतूर व बदनापूर, घनसावंगी तालुक्यांतील अनेक गावांना रविवारी मध्यरात्री व सोमवारी वादळी पावसासह गारपिटीचा तडाखा बसला.

जालना : भोकरदन, मंठा, परतूर व बदनापूर, घनसावंगी तालुक्यांतील अनेक गावांना रविवारी मध्यरात्री व सोमवारी वादळी पावसासह गारपिटीचा तडाखा बसला. अगोदरच दुष्काळाने शेतकरी संकटात सापडला आहे. त्यातच गारांमुळे जेमतेम आलेल्या रबी पिकांचे अतोनात नुकसान झाले. गारपिटीत गहू, हरभरा, ज्वारी तसेच फळबागांना जबर फटका बसला. रबी हंगामातील हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकरी चिंतातूर झाले.भोकरदन तालुक्यातील लेहा, शेलूद परिसरात रविवारी रात्री जोरदार गारपीट व वादळी पाऊस झाला. अर्ध्यातास झालेल्या पावसामुळे गहू व हरभऱ्याचे पीक जमीनदोस्त झाले. सायंकाळी अवकाळी पावसाला सुरूवात झाली. पिंपळगाव रेणुकाई, हसनाबाद, केदारखेडा, राजूर, पारध, हिसोडा, आदी भागात जोरदार पाऊस झाला. मात्र लेहा व शेलूद गावाच्या परिसरामध्ये बोराच्या अकाराची गारपीट झाली. अचानक झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांची पळापळ झाली. काही ठिकाणी साठवून ठेवलेला चाराही भिजला. गहू, हरभरा, कांदा सीडस्, मका या रबी पिकांचे लाखो रूपयांचे नुकसान झाल. शेलूद धरणाच्या परिसरातील शेतकऱ्यांनी रबी पिकाची लागवड केली होती. मात्र रात्रीचा अवकाळी पाऊस, गारपीट व वादळामुळे या परिसरातील अनेक छतावरील पत्रे उडून गेली. झाडे उन्मळून पडली. भोकरदन - जालना रस्त्याच्या कामासाठी काढण्यात आलेल्या वळण रस्त्यावर पावसामुळे चिखल झाला. ट्रक फसल्यामुळे चार तास वाहतूक ठप्प होती. आष्टी- परिसरात सोमवारी दुपारी गारांचा पाऊस झाला. यात रबी पिकांचे मोठे नुकसान झाले.मंठा: तालुक्यात तळणीसह परिसरात वादळी वाऱ्यासह गारपिटीच्या पावसामुळे रबी पिकांसह शेडनेट जमीनदोस्त होऊ न फ ळबागांनाही फ टक ा बसल्याने मोठे नुक सान झाले. यात घरावरील पत्रे उडाली, झाडे उन्मळून पडली. लोणार-मंठा रस्त्यावर वडगाव व तळणी येथे रस्त्यावर झाड पडल्याने वाहतूक ठप्प झाली होती. साडेचार ते साडेपाच या वेळेत झालेल्या वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने वीजपुरवठा खंडित झाला. सायंकाळी ७ वाजता वडगाव सरहद येथील झाडे ग्रामस्थांच्या मदतीने तोडून वाहतूक सुरळीत करण्यात आली. लोणार रस्त्यावर गजानन महाराज मंदिर येथे अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता होऊ न महाप्रसादाचे वितरण होणार होते. अचानक सुरु झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपिटीच्या पावसाने भाविकांची तारांबळ उडाली. मंडप उडून गेला. प्रसाद वाटपाअधीच पत्रे उडाल्याने तसेच गारांमुळे मोठी नासाडी झाली. अनेक जणांना गारांत झोडपून निघाले.