शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

तोफा आज थंडावणार

By admin | Updated: October 13, 2014 00:35 IST

औरंगाबाद : जिल्ह्यात बारा दिवसांपासून सुरू असलेली निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी उद्या सोमवारी सायंकाळी थांबणार आहे.

औरंगाबाद : जिल्ह्यात बारा दिवसांपासून सुरू असलेली निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी उद्या सोमवारी सायंकाळी थांबणार आहे. प्रचाराची मुदत संपत असल्यामुळे सायंकाळनंतर उमेदवारांना जाहीर प्रचार करता येणार नाही. विधानसभेच्या जिल्ह्यातील सर्व नऊ मतदारसंघांत १५ आॅक्टोबर रोजी मतदान होत आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत १ आॅक्टोबर रोजी संपली. त्याच्या दुसऱ्या दिवशीपासूनच जिल्ह्यात प्रचाराचा धडाका सुरू झाला आहे. यावेळी जिल्ह्यात तब्बल १५६ उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे प्रचाराचा धुरळा उडाला आहे. सर्वच उमेदवार मतदारांना आकर्षित करण्यासाठी जोरदार प्रचार करीत आहेत. मात्र, आता उद्या सोमवारी सायं. ५ वा. प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. जाहीर प्रचाराची मुदत मतदान संपण्याच्या वेळेआधी ४८ तास म्हणजे १३ आॅक्टोबर रोजी सायं. ५ वा. संपत आहे. त्यामुळे या मुदतीनंतर उमेदवारांना लाऊडस्पीकर लावून प्रचार करता येणार नाही. तसेच पदयात्रा, प्रचारसभा, बैठका आदीही घेता येणार नाहीत. दूरचित्रवाणी वाहिन्या, नभोवाणी वाहिन्या आणि केबल नेटवर्कवरून सोमवारी सायंकाळी ५ वाजेपासून १५ आॅक्टोबर सायं. ५ वाजेपर्यंत मतदारांवर प्रभाव टाकून निवडणूक निकालांवर प्रभाव टाकू शकेल अशा स्वरूपाचे कोणतेही कार्यक्रम प्रक्षेपित, प्रसारित करण्यास आयोगाने मनाई केली आहे. १९५१ च्या लोकप्रतिनिधित्व कायद्याच्या १२६ व्या कलमानुसार असे कार्यक्रम प्रक्षेपित करण्यास बंदी आहे. या कायद्याच्या कलम १२६ अ नुसार मतदानोत्तर चाचण्या आणि इतर निवडणूक सर्वेक्षणांचे निकालही या कालावधीत प्रसिद्ध करण्याची परवानगी नाही.