शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

गुलमंडी सेनेला; राजाबाजार भाजप

By admin | Updated: April 1, 2015 01:07 IST

औरंगाबाद : महापालिका निवडणुकीत जागा वाटपासाठी शिवसेना- भाजप युतीची दोन दिवसांपासून मुंबईत सुरू असलेली बैठक अद्याप कोणत्याही निर्णयाप्रत पोहोचलेली नाही.

औरंगाबाद : महापालिका निवडणुकीत जागा वाटपासाठी शिवसेना- भाजप युतीची दोन दिवसांपासून मुंबईत सुरू असलेली बैठक अद्याप कोणत्याही निर्णयाप्रत पोहोचलेली नाही. उद्या बुधवारी दुपारपर्यंत युतीतील जागा वाटपाचा निर्णय होईल, असे सेनेच्या गोटातून सांगण्यात आले. वॉर्डांच्या अदला-बदलीसाठी शिवसेनेची तयारी असून गुलमंडी सेनेकडे, तर राजाबाजार भाजपकडे जाणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. गुलमंडीच्या मोबदल्यात नक्षत्रवाडी, राजाबाजार, एन-६, मयूरपार्क भाजपकडे जाऊ शकेल. जागावाटपाचा मुख्य मुद्दा गुलमंडी, राजाबाजार हे वॉर्डच होते; परंतु त्या दोन्ही वॉर्डांबाबत तोडगा निघाला असून, आणखी दोन वॉर्डांवरून उद्या बुधवारी चर्चा होणार आहे. युतीमध्ये समान जागावाटप झाले नाही तर स्वतंत्र लढण्याचा निर्णय दोन्ही पक्ष घेऊ शकतात, अशीही चर्चा कानावर आली आहे. बैठकीत भाजप पदाधिकाऱ्यांची ‘बॉडी लँग्वेज’ युती करण्यासारखी नव्हती, असेही सूत्रांकडून समजले आहे. भाजपकडून वॉर्ड अदलाबदल करण्यासाठी काही मागण्या पुढे आल्या आहेत. सेना लढणार असलेले ‘अ’ श्रेणीतील वॉर्ड भाजप मागत आहे. त्यावर भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे हे निर्णय घेणार आहेत. कारण भाजपच्या प्रचार कार्यालयात इच्छुकांच्या मुलाखती मंगळवारी सुरू झाल्या. बुधवारी रात्री युतीच्या जागा वाटपाचा निर्णय होईल. त्यानंतर युती होण्याचा मार्ग मोकळा होईल. भाजपला ११३ वॉर्डांतून मुलाखतींना चांगला प्रतिसाद मिळाला, तर युती होणार नाही, असे भाजपच्या गोटातून सांगण्यात आले. पूर्व मतदारसंघातील काही वॉर्डांची मागणी भाजपने केली आहे. त्यावर बुधवारी निर्णय होईल, असे समजते. जैस्वाल संतापून परतल्याची चर्चा महानगरप्रमुख माजी आ. प्रदीप जैस्वाल हे शिवाजीनगर, राजाबाजार हे वॉर्ड भाजपला सोडण्यात आल्यामुळे संतापून मुंबईतून परतल्याची अफवा सेनेच्या गोटात पसरली. राजाबाजार हा वॉर्ड सेनेकडून भाजपच्या गोटात गेला आहे. त्यापाठोपाठ शिवाजीनगरही दिला गेल्यामुळे जैस्वाल संतापल्याची चर्चा होती. दरम्यान, जैस्वाल शहरात आल्यावर त्यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले की, तसे काहीही घडले नाही. शिवाजीनगर सेनेचा विद्यमान वॉर्ड आहे. त्यावर तर साधी चर्चाही झालेली नाही. कुणीतरी मुद्दामहून गैरसमज निर्माण होण्याच्या अनुषंगाने माहिती पेरली आहे. युतीची बोलणी अंतिम टप्प्यात आहे. जागा वाटपाचा निर्णय दोन्ही पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करूनच होणार आहे.