शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

गुलमंडी सेनेला; राजाबाजार भाजप

By admin | Updated: April 1, 2015 01:07 IST

औरंगाबाद : महापालिका निवडणुकीत जागा वाटपासाठी शिवसेना- भाजप युतीची दोन दिवसांपासून मुंबईत सुरू असलेली बैठक अद्याप कोणत्याही निर्णयाप्रत पोहोचलेली नाही.

औरंगाबाद : महापालिका निवडणुकीत जागा वाटपासाठी शिवसेना- भाजप युतीची दोन दिवसांपासून मुंबईत सुरू असलेली बैठक अद्याप कोणत्याही निर्णयाप्रत पोहोचलेली नाही. उद्या बुधवारी दुपारपर्यंत युतीतील जागा वाटपाचा निर्णय होईल, असे सेनेच्या गोटातून सांगण्यात आले. वॉर्डांच्या अदला-बदलीसाठी शिवसेनेची तयारी असून गुलमंडी सेनेकडे, तर राजाबाजार भाजपकडे जाणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. गुलमंडीच्या मोबदल्यात नक्षत्रवाडी, राजाबाजार, एन-६, मयूरपार्क भाजपकडे जाऊ शकेल. जागावाटपाचा मुख्य मुद्दा गुलमंडी, राजाबाजार हे वॉर्डच होते; परंतु त्या दोन्ही वॉर्डांबाबत तोडगा निघाला असून, आणखी दोन वॉर्डांवरून उद्या बुधवारी चर्चा होणार आहे. युतीमध्ये समान जागावाटप झाले नाही तर स्वतंत्र लढण्याचा निर्णय दोन्ही पक्ष घेऊ शकतात, अशीही चर्चा कानावर आली आहे. बैठकीत भाजप पदाधिकाऱ्यांची ‘बॉडी लँग्वेज’ युती करण्यासारखी नव्हती, असेही सूत्रांकडून समजले आहे. भाजपकडून वॉर्ड अदलाबदल करण्यासाठी काही मागण्या पुढे आल्या आहेत. सेना लढणार असलेले ‘अ’ श्रेणीतील वॉर्ड भाजप मागत आहे. त्यावर भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे हे निर्णय घेणार आहेत. कारण भाजपच्या प्रचार कार्यालयात इच्छुकांच्या मुलाखती मंगळवारी सुरू झाल्या. बुधवारी रात्री युतीच्या जागा वाटपाचा निर्णय होईल. त्यानंतर युती होण्याचा मार्ग मोकळा होईल. भाजपला ११३ वॉर्डांतून मुलाखतींना चांगला प्रतिसाद मिळाला, तर युती होणार नाही, असे भाजपच्या गोटातून सांगण्यात आले. पूर्व मतदारसंघातील काही वॉर्डांची मागणी भाजपने केली आहे. त्यावर बुधवारी निर्णय होईल, असे समजते. जैस्वाल संतापून परतल्याची चर्चा महानगरप्रमुख माजी आ. प्रदीप जैस्वाल हे शिवाजीनगर, राजाबाजार हे वॉर्ड भाजपला सोडण्यात आल्यामुळे संतापून मुंबईतून परतल्याची अफवा सेनेच्या गोटात पसरली. राजाबाजार हा वॉर्ड सेनेकडून भाजपच्या गोटात गेला आहे. त्यापाठोपाठ शिवाजीनगरही दिला गेल्यामुळे जैस्वाल संतापल्याची चर्चा होती. दरम्यान, जैस्वाल शहरात आल्यावर त्यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले की, तसे काहीही घडले नाही. शिवाजीनगर सेनेचा विद्यमान वॉर्ड आहे. त्यावर तर साधी चर्चाही झालेली नाही. कुणीतरी मुद्दामहून गैरसमज निर्माण होण्याच्या अनुषंगाने माहिती पेरली आहे. युतीची बोलणी अंतिम टप्प्यात आहे. जागा वाटपाचा निर्णय दोन्ही पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करूनच होणार आहे.