शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

मनपावर पालकमंत्र्यांची टीका

By admin | Updated: January 4, 2016 00:24 IST

औरंगाबाद : महापालिकेत सेनेचाच महापौर असताना पालकमंत्री रामदास कदम यांनी रविवारी पालिकेच्या कारभारावर सडकून टीका केली.

औरंगाबाद : महापालिकेत सेनेचाच महापौर असताना पालकमंत्री रामदास कदम यांनी रविवारी पालिकेच्या कारभारावर सडकून टीका केली. पालिकेचा कारभार म्हणजे काखेत कळसा आणि गावाला वळसा अशा पद्धतीने सुरू आहे. उत्पन्न वाढीला भरपूर वाव आहे, पण त्याकडे पालिकेचे लक्ष नाही, असे कदम म्हणाले. मनपाने यापुढे स्वत:च निधी उभा करून समांतर जलवाहिनी आणि भूमिगत गटार योजनेचे काम पूर्ण करावे, असा सल्लाही त्यांनी दिला. विधानपरिषद निवडणुकीत विजयी झाल्यानंतर पालकमंत्री कदम आज पहिल्यांदाच औरंगाबादेत आले. सुभेदारी विश्रामगृहावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. केंद्राकडून पुढील टप्प्यातील निधी मिळणार नसल्यामुळे मनपाच्या समांतर जलवाहिनी आणि भूमिगत गटार योजना अडचणीत आल्या आहेत. त्यांना राज्य सरकार मदत करणार का, या प्रश्नावर पालकमंत्री कदम म्हणाले, मनपाच्या कारभाराचे मला नवल वाटते. खरे तर मनपाला पैशांची अजिबात कमी भासण्याचे कारण नाही,पण नियोजनाअभावी इथे उलट परिस्थिती आहे. मालमत्ता कराच्या वसुलीचे प्रमाण अवघे १८ टक्के आहे. शिवाय शहरातील ५० ते ६० टक्केइमारतींना अजूनही मालमत्ताकर लागलेला नाही. सर्व गोष्टींचे योग्य नियोजन केले तर आणखी चार- पाचशे कोटी रुपये सहज जमतील. त्यामुळे कुणाकडेही हात पसरायची गरज भासणार नाही. म्हणून आता मनपानेच योग्य नियोजन करून निधी उभारावा आणि त्यातून दोन्ही योजनांची कामे करावी, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी आ. संदीपान भुमरे, जिल्हाधिकारी निधी पांडे, पोलीस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी, मनपातील सभागृह नेता राजेंद्र जंजाळ, शिवसेना शहरप्रमुख रेणुकादास वैद्य, बाळासाहेब थोरात आदींची उपस्थिती होती. एमआयएमकडूनही स्वागतपालकमंत्री कदम यांचे शहरात जोरदार स्वागत झाले. विमानतळावर आणि सुभेदारी विश्रामगृहावर त्यांच्या स्वागतासाठी सेनेचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. एमआयएमकडूनही पालकमंत्र्यांचे स्वागत केले गेले. एमआयएमतर्फे कदम यांनी यापुढे समांतर जलवाहिनीच्या कामावर आपले लक्ष असेल, असे स्पष्ट केले. समांतरमधील दोन कलाकार मला ठाऊक आहेत. त्यातील एक कलाकार नुकताच गेला, अजून एक राहिला आहे. ४त्याच्यावरही माझे लक्ष आहे, असे कुणाचाही नामोल्लेख न करता म्हणाले. मुळात समांतरचे करारच चुकीचे झाले, त्यामुळेच आज अडचणी उभ्या राहत आहेत, असा आरोपही पालकमंत्र्यांनी यावेळी केला. पालकमंत्री कदम यांनी कचरा पेट्यांच्या अखर्चिक निधीवरूनही मनपावर टीकेची झोड उठविली. कचरा पेट्यांच्या खरेदीसाठी मनपाला आम्ही जिल्हा नियोजन समितीतून निधी मंजूर केला, पण चार पाच महिने झाले तरी तो निधी मनपाने खर्च केलेला नाही, असे त्यांनी पत्रकारांना सांगितले. तसेच बाजूला बसलेल्या जिल्हाधिकारी निधी पांडे यांना उद्देशून त्यांनी उद्याच मनपा आयुक्तांना बोलावून घ्या आणि विचारणा करा, अशी सूचनाही केली.