शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
4
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
5
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
6
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
7
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
8
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
9
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
10
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
11
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
12
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
13
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
14
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
15
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
16
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
17
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
18
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
19
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
20
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्री घेणार बैठक

By admin | Updated: June 17, 2014 01:15 IST

जालना : राष्ट्रीयकृत व सहकारी बँकांनी पीक कर्ज वितरणात कासवगतीने सुरू केलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी बैठक बोलविण्याचा निर्णय घेतला आहे.

जालना : राष्ट्रीयकृत व सहकारी बँकांनी पीक कर्ज वितरणात कासवगतीने सुरू केलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी सर्व बँकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह शाखाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक बोलविण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ३० जूनपूर्वी शंभर टक्के पीककर्ज वितरित करावे, असे आदेश जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी बजावले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या बँक अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत व सहकारी बँकाच्या अडवणुकीच्या धोरणामुळे पीककर्ज वाटपाचे काम अतिशय कासवगतीने सुरु आहे. शुक्रवारपर्यंत केवळ २० टक्केच कर्ज वाटप झाले असल्याची धक्कादायक आकडेवारी लोकमतने सविस्तर वृत्ताद्वारे निदर्शनास आणून दिली. या वृत्ताने बँकिंग क्षेत्रासह प्रशासनात मोठी खळबळ उडाली. विशेषत: जिल्हाधिकारी नायक यांनी तातडीने जिल्हा उपनिबंधक अशोक खरात व अग्रणी बँकेचे प्रभारी व्यवस्थापक महेश बोरडे यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांना आपल्या कक्षात पाचारण केले. त्यात कर्ज वितरणाचे काम ढिम्न गतीने सुरू असल्याबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. गेल्या वर्षी या जिल्ह्याने पीक कर्जाचे उद्दिष्ट पूर्ण केले होते. त्यापेक्षा अधिक पीक कर्ज वितरित केले; परंतु यावर्षी बँकांनी सुरू केलेल्या दिरंगाईने २० टक्केही कर्ज वितरित न झाल्याबद्दल खंत व्यक्त केली. ३० जूनपर्यंत शंभर टक्के पीक कर्जाचे वितरण झाले पाहिजे, असे आदेश बजावले. या जिल्ह्यास गेल्या खरीप हंगामात ६२४. ५१ लाख एवढे पीक कर्जाचे उद्दिष्ट होते; परंतु महसूल प्रशासनाने बँकांच्या मागे मोठा तगादा लावल्यानेच ७१३ कोटी रुपयांचे पीक कर्ज वितरित झाले. म्हणजेच उद्दिष्टापेक्षा जास्त पीक कर्ज वितरित झाले. गतवर्षी समाधानकारक पावसामुळे पीक परिस्थिती समाधानकारक होती.फेब्रवारी व मार्च महिन्यात झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला गेला. गेल्या दोन वर्षापूर्वीचा दुष्काळ पाठोपाठ गारपिटीच्या संकटाने ग्रामीण अर्थव्यवस्था पूर्णत: कोलमडली. या संकटातून सावरत शेतकरी पुन्हा नव्या उमेदीने कामाला लागल्याचे चित्र सर्वदूर दिसत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)३० जूनपर्यंत पीक कर्ज वितरणाचे प्रशासनाचे आदेशगेल्या वर्षी या जिल्ह्यात पीक कर्ज वितरणाचे काम उत्कृष्ट झाले होते. त्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला होता; परंतु यावर्षी पीक कर्ज वितरणात बँकांनी दाखविलेल्या दिरंगाईबद्दल आपण बैठकीद्वारे जाब विचारू, अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. याही वर्षी शेतकऱ्यांना जूनअखेरपर्यंत कर्ज मिळावे, म्हणून आदेश बजावले आहेत, असे ते म्हणाले. महसूल व बँक पातळीवरील काही अडचणी तात्काळ दूर केल्या जातील, असे स्पष्ट करीत कर्ज वितरणात कोणतेही अडथळे असू नयेत, म्हणून आपण जातीने लक्ष घालू, असे म्हटले.२० टक्केच झाले कर्ज वितरणयावर्षी खरीप हंगामाचे ७९७ कोटींचे पीक कर्जाचे उद्दिष्ट आहे. परंतु ७ जूनपर्यंत १५३ कोटी ७३ लाख एवढे म्हणजे सरासरी २० टक्केच कर्ज वाटप झाले आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने २२ कोटी ९९ लाख पीक कर्ज वाटप केले, ग्रामीण बँकेने ४४ कोटी २१ लाख, सहकारी बँकने ८६ कोटी ५१ लाख, खाजगी बँकेने ६ कोटी २ लाख पीक कर्ज वाटप केले आहे.