शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच जिंकत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
5
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
6
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
7
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
8
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
9
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
10
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
11
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
12
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
13
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
14
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
15
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
16
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
17
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
18
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
19
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
20
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर

पालकमंत्री घेणार बैठक

By admin | Updated: June 17, 2014 01:15 IST

जालना : राष्ट्रीयकृत व सहकारी बँकांनी पीक कर्ज वितरणात कासवगतीने सुरू केलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी बैठक बोलविण्याचा निर्णय घेतला आहे.

जालना : राष्ट्रीयकृत व सहकारी बँकांनी पीक कर्ज वितरणात कासवगतीने सुरू केलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी सर्व बँकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह शाखाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक बोलविण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ३० जूनपूर्वी शंभर टक्के पीककर्ज वितरित करावे, असे आदेश जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी बजावले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या बँक अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत व सहकारी बँकाच्या अडवणुकीच्या धोरणामुळे पीककर्ज वाटपाचे काम अतिशय कासवगतीने सुरु आहे. शुक्रवारपर्यंत केवळ २० टक्केच कर्ज वाटप झाले असल्याची धक्कादायक आकडेवारी लोकमतने सविस्तर वृत्ताद्वारे निदर्शनास आणून दिली. या वृत्ताने बँकिंग क्षेत्रासह प्रशासनात मोठी खळबळ उडाली. विशेषत: जिल्हाधिकारी नायक यांनी तातडीने जिल्हा उपनिबंधक अशोक खरात व अग्रणी बँकेचे प्रभारी व्यवस्थापक महेश बोरडे यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांना आपल्या कक्षात पाचारण केले. त्यात कर्ज वितरणाचे काम ढिम्न गतीने सुरू असल्याबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. गेल्या वर्षी या जिल्ह्याने पीक कर्जाचे उद्दिष्ट पूर्ण केले होते. त्यापेक्षा अधिक पीक कर्ज वितरित केले; परंतु यावर्षी बँकांनी सुरू केलेल्या दिरंगाईने २० टक्केही कर्ज वितरित न झाल्याबद्दल खंत व्यक्त केली. ३० जूनपर्यंत शंभर टक्के पीक कर्जाचे वितरण झाले पाहिजे, असे आदेश बजावले. या जिल्ह्यास गेल्या खरीप हंगामात ६२४. ५१ लाख एवढे पीक कर्जाचे उद्दिष्ट होते; परंतु महसूल प्रशासनाने बँकांच्या मागे मोठा तगादा लावल्यानेच ७१३ कोटी रुपयांचे पीक कर्ज वितरित झाले. म्हणजेच उद्दिष्टापेक्षा जास्त पीक कर्ज वितरित झाले. गतवर्षी समाधानकारक पावसामुळे पीक परिस्थिती समाधानकारक होती.फेब्रवारी व मार्च महिन्यात झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला गेला. गेल्या दोन वर्षापूर्वीचा दुष्काळ पाठोपाठ गारपिटीच्या संकटाने ग्रामीण अर्थव्यवस्था पूर्णत: कोलमडली. या संकटातून सावरत शेतकरी पुन्हा नव्या उमेदीने कामाला लागल्याचे चित्र सर्वदूर दिसत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)३० जूनपर्यंत पीक कर्ज वितरणाचे प्रशासनाचे आदेशगेल्या वर्षी या जिल्ह्यात पीक कर्ज वितरणाचे काम उत्कृष्ट झाले होते. त्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला होता; परंतु यावर्षी पीक कर्ज वितरणात बँकांनी दाखविलेल्या दिरंगाईबद्दल आपण बैठकीद्वारे जाब विचारू, अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. याही वर्षी शेतकऱ्यांना जूनअखेरपर्यंत कर्ज मिळावे, म्हणून आदेश बजावले आहेत, असे ते म्हणाले. महसूल व बँक पातळीवरील काही अडचणी तात्काळ दूर केल्या जातील, असे स्पष्ट करीत कर्ज वितरणात कोणतेही अडथळे असू नयेत, म्हणून आपण जातीने लक्ष घालू, असे म्हटले.२० टक्केच झाले कर्ज वितरणयावर्षी खरीप हंगामाचे ७९७ कोटींचे पीक कर्जाचे उद्दिष्ट आहे. परंतु ७ जूनपर्यंत १५३ कोटी ७३ लाख एवढे म्हणजे सरासरी २० टक्केच कर्ज वाटप झाले आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने २२ कोटी ९९ लाख पीक कर्ज वाटप केले, ग्रामीण बँकेने ४४ कोटी २१ लाख, सहकारी बँकने ८६ कोटी ५१ लाख, खाजगी बँकेने ६ कोटी २ लाख पीक कर्ज वाटप केले आहे.