शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
3
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
4
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
5
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
6
जातगणना : मॅजिक की मंडल?
7
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
8
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
9
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
10
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
11
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
12
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
13
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
14
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
15
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
16
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
17
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
18
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
19
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
20
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा

घोटाळेबाजांना पालकमंत्र्यांनी पाठिशी घातले - विजयसिंह पंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2017 23:45 IST

बीड : घोटाळ्यात दोषी आढळलेल्या अधिकाऱ्यांवर पालकमंत्र्यांनी कारवाई केली नाही, असा आरोप जि.प. अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी केला.

बीड : जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची सत्ता असतानाही लेखापरीक्षणाची मागणी केली. पारदर्शक कारभारावर भर दिला; पण घोटाळ्यात दोषी आढळलेल्या अधिकाऱ्यांवर पालकमंत्र्यांनी कारवाई केली नाही, असा आरोप जि.प. अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी येथे शनिवारी पत्रकार परिषदेत केला.यावेळी अप्पासाहेब गव्हाणे, दिगांबर येवले, डॉ. विजयकुमार घाडगे, विष्णू देवकते, जालिंदर पिसाळ यांची उपस्थिती होती. पंडित यांनी पत्रकार परिषदेत अडीच वर्षाच्या जि.प. अध्यक्षपदाच्या कारकीर्दीत केलेल्या विविध विकासकामांविषयी माहिती दिली. ते म्हणाले, अध्यक्षपदाची धुरा आली तेव्हा जि.प. अनियमितता व बेकायदेशीर बदल्या व घोटाळ्यांमुळे गाजत होती. विकासकामे राबवितानाच जि.प. ची प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न केला. पक्षाने टाकलेला विश्वास सार्थ ठरविताना जि.प. चा कारभार पारदर्शक ठेवण्यावर भर दिला. मात्र, अनेक विकास योजनांत शासनाने जि.प. ला निधी दिला नाही. याउलट योजना रखडत कशा राहतील असेच धोरण ठेवले. स्मशानभूमी व दफनभूमीच्या कामांची संचिका जि.प. ने सर्व पूर्तता करुन नियोजन समितीकडे पाठविली होती; परंतु पालकमंत्र्यांनी त्यास मंजुरी दिली नाही. त्यामुळे ही कामे होऊ शकली नाहीत. भाजपच्या कुटील राजकारणामुळे बरीच कामे करता आली नाहीत अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली.जि.प. च्या नूतन इमारत बांधकामास सुरुवात, बळीराजा चेतना अभियान, शिक्षकांची वाढीव ७९३ पदे, दुष्काळ निवारणासाठी विविध उपाययोजना, आरोग्य विभागाला आकृतीबंधानुसार मिळालेल्या वाढीव जागा, जि.प. ची वेबसाईड, आयएसओ, ई- लर्निंग, डिजिटल स्कूल ही संकल्पना ही चांगली कामे करता आल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. (प्रतिनिधी)