शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

जीटीएलचे कर्मचारी आले ‘रस्त्यावर’ !

By admin | Updated: November 14, 2014 00:57 IST

औरंगाबाद : महावितरण आणि जीटीएल या दोन वीज वितरण करणाऱ्या कंपन्यांच्या अर्थकारणाच्या वादात १ हजार कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात आली आहे.

औरंगाबाद : महावितरण आणि जीटीएल या दोन वीज वितरण करणाऱ्या कंपन्यांच्या अर्थकारणाच्या वादात १ हजार कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात आली आहे. कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन जीटीएलच्या पन्नालालनगर येथील कार्यालयावर निदर्शने करून कंपनी, महावितरणच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले.जीटीएलने ग्राहकांकडून पैसे वसूल केले आहेत; पण ते महावितरणला भरले नाहीत. त्यात आमचा दोष काय? असा प्रश्न जीटीएलचे कर्मचारी करीत आहेत. महावितरणने कारवाई करताना कर्मचाऱ्यांना आपल्या सेवेत सामावून घ्यावे, अशी मागणी कर्मचारी करीत आहेत. महावितरणचे जीटीएलने वीज बिलापोटी ३९३.७ कोटी रुपये थकविले आहेत. त्यासाठी जीटीएलला कंत्राट रद्द करण्याची अंतिम नोटीस महावितरणने दिली आहे. या दोन कंपन्यांच्या पैशांच्या वादात एक हजार कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर संकट आले आहे. महावितरण १६ नोव्हेंबर रोजी रात्री १२ वाजेपासून शहरातील वीजपुरवठ्याचा ताबा घेणार आहे. महावितरणने शहरातील वीजपुरवठा २०११ मध्ये जीटीएल ऊर्जा कंपनीकडे हस्तांतरित केला होता. या कराराची मुदत १५ वर्षांची होती; पण जीटीएलने गेल्या काही महिन्यांत महावितरणचे बिल थकविले आहे. त्यामुळे कंत्राट रद्द करण्याची अंतिम नोटीस जीटीएलला दिली आहे. या नोटिसीमुळे १,०३२ कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात आली आहे. अचानक नोकरी गेल्यास कुटुंबावर उपासमारीची वेळ येणार आहे. दोन कंपन्यांच्या अर्थकारणात १ हजार ३२ कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय भरडत आहेत. एका चुकीच्या निर्णयामुळे आमच्यावर कुटुंबासह उपासमारीची वेळ येणार आहे. सरकारने कारवाई करताना आमचा विचार करावा, अशा विविध प्रतिक्रिया कर्मचाऱ्यांनी व्यक्त केल्या.