शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
2
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
3
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
4
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
5
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
6
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
7
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
8
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
9
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
10
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
11
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
12
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
13
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
14
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
15
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
16
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
17
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
18
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
19
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
20
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास

जीटीएलचे कर्मचारी आले ‘रस्त्यावर’ !

By admin | Updated: November 14, 2014 00:57 IST

औरंगाबाद : महावितरण आणि जीटीएल या दोन वीज वितरण करणाऱ्या कंपन्यांच्या अर्थकारणाच्या वादात १ हजार कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात आली आहे.

औरंगाबाद : महावितरण आणि जीटीएल या दोन वीज वितरण करणाऱ्या कंपन्यांच्या अर्थकारणाच्या वादात १ हजार कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात आली आहे. कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन जीटीएलच्या पन्नालालनगर येथील कार्यालयावर निदर्शने करून कंपनी, महावितरणच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले.जीटीएलने ग्राहकांकडून पैसे वसूल केले आहेत; पण ते महावितरणला भरले नाहीत. त्यात आमचा दोष काय? असा प्रश्न जीटीएलचे कर्मचारी करीत आहेत. महावितरणने कारवाई करताना कर्मचाऱ्यांना आपल्या सेवेत सामावून घ्यावे, अशी मागणी कर्मचारी करीत आहेत. महावितरणचे जीटीएलने वीज बिलापोटी ३९३.७ कोटी रुपये थकविले आहेत. त्यासाठी जीटीएलला कंत्राट रद्द करण्याची अंतिम नोटीस महावितरणने दिली आहे. या दोन कंपन्यांच्या पैशांच्या वादात एक हजार कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर संकट आले आहे. महावितरण १६ नोव्हेंबर रोजी रात्री १२ वाजेपासून शहरातील वीजपुरवठ्याचा ताबा घेणार आहे. महावितरणने शहरातील वीजपुरवठा २०११ मध्ये जीटीएल ऊर्जा कंपनीकडे हस्तांतरित केला होता. या कराराची मुदत १५ वर्षांची होती; पण जीटीएलने गेल्या काही महिन्यांत महावितरणचे बिल थकविले आहे. त्यामुळे कंत्राट रद्द करण्याची अंतिम नोटीस जीटीएलला दिली आहे. या नोटिसीमुळे १,०३२ कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात आली आहे. अचानक नोकरी गेल्यास कुटुंबावर उपासमारीची वेळ येणार आहे. दोन कंपन्यांच्या अर्थकारणात १ हजार ३२ कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय भरडत आहेत. एका चुकीच्या निर्णयामुळे आमच्यावर कुटुंबासह उपासमारीची वेळ येणार आहे. सरकारने कारवाई करताना आमचा विचार करावा, अशा विविध प्रतिक्रिया कर्मचाऱ्यांनी व्यक्त केल्या.