शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
4
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
5
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
6
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
7
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
8
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
9
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
10
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
11
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?
12
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
13
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
14
Viral Video: वा क्या कारीगरी है; विजेच्या खांबातून रस्ता, बंगळुरूतील व्हिडीओ व्हायरल, तुम्ही बघितला का?
15
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
16
Yogini Ekadashi 2025: योगिनी ते आषाढी एकादशी, १५ दिवस ऐका 'हे' स्तोत्र; मिटेल चिंता, होईल अपार लाभ!
17
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
18
गरिबांच्या खिशावर ‘दरोडा’ टाकणाऱ्या लाचखोरांच्या मालमत्तेवर ‘हातोडा’ कधी?
19
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
20
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली

शेततळे निर्मितीच्या चळवळीला जिल्ह्यात गती

By admin | Updated: December 23, 2015 23:37 IST

परभणी : जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी शेततळे निर्माण करण्याची मोहीम सुरू करण्यात आली

परभणी : जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी शेततळे निर्माण करण्याची मोहीम सुरू करण्यात आली असून, आगामी एक वर्षांत ४ हजार शेततळे उभारण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी दिली़ परभणी जिल्ह्यात तीन वर्षांपासून दुष्काळाची स्थिती आहे़ पावसाचे प्रमाण कमी झाल्याने पाणीटंचाई तीव्र होत चालली आहे़ तसेच सिंचनाचे प्रश्नही निर्माण होत आहेत़ यावर मात करण्यासाठी शेततळे निर्माण करण्याची मोहीम राबविण्यात येत आहे़ जिल्हाधिकारी राहुल महिवाल यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत शेततळे निर्माण केले जाणार आहेत़ प्रत्येक गावामध्ये किमान पाच शेततळे तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत़ जिल्ह्यात २५० कृषी सहाय्यक असून, प्रत्येक कृषी सहाय्यकाला एक गाव दत्तक दिले आहे़ कृषी सहाय्यकाने दत्तक घेतलेल्या गावात पाचपेक्षा अधिक शेततळे आणि इतर गावांमध्ये किमान पाच शेततळे तयार करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे़ या मोहिमेला शेतकऱ्यांचाही आता चांगला प्रतिसाद मिळत आहे़ आतापर्यंत २५० शेततळ्यांचे काम पूर्ण झाले असून, ७८ शेततळ्यांचे काम सध्या सुरू आहे़ एकंदर शेततळ्यांच्या मोहिमेसाठी महसूल, कृषी, पंचायत समिती आणि नरेगा आदी विभागातील अधिकारी, कर्मचारी कामाला लागले आहेत़