शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
2
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
3
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
4
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
5
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
7
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
8
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
9
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
10
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
11
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
12
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
13
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
14
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
15
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
16
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
17
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
18
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

कृषीपंप जोडणीला मिळणार गती

By admin | Updated: March 23, 2016 01:09 IST

राजेश खराडे , बीड जिल्ह्यात विदर्भ आणि मराठवाड्यातील कृषीपंप जोडणीचा अनुशेष भरून काढण्यासाठी महावितरणच्या विशेष मोहिमेतील कृषीपंपाच्या जोडणीची कामे रखडली आहेत

राजेश खराडे , बीडजिल्ह्यात विदर्भ आणि मराठवाड्यातील कृषीपंप जोडणीचा अनुशेष भरून काढण्यासाठी महावितरणच्या विशेष मोहिमेतील कृषीपंपाच्या जोडणीची कामे रखडली आहेत. त्याअनुषंगाने मंगळवारी राज्याचे कार्यकारी संचालक सी.एच. येरमे यांनी आढावा बैठक घेऊन कंत्राटदारांबरोबर अधिकाऱ्यांचीही झाडाझडती घेतली. ‘लोकमत’ने हे प्रकरण लावून धरले होते. कृषीपंपधारकांना वीज प्रवाहात आणण्याकरिता साठ कोटी रुपयांच्या निधीची मंजुरी बीड विभागाला मिळाली होती. यामधून ८ हजार पाचशे कृषीपंपाची जोडणी करण्याचे विभागाला उद्दीष्ट पैकी अद्यापपर्यंत केवळ ४ हजार कृषीपंप जोडण्यात आले आहेत. मार्च अखेरपर्यंतच योजनेचा कालावधी असून उर्वरीत १५ दिवसांत कामे कशी पूर्ण होणार असा प्रश्न उपस्थित झाला होता. यासंबंधी लोकमत ने वृत्तमालिका प्रकाशित केली होती. त्याची दखल घेत खुद्द राज्याचे कार्यकारी संचालकांनी या कामांचा आढावा विभागीय कार्यालयात घेतला. यावेळी मुख्य अभियंता अनिल भोसले, अधीक्षक अभियंता रतन सोनुले उपस्थित होते. योजना पूर्णत्वाला कालावधी लागला तरी चालेल मात्र शेतकऱ्यांच्या हेतूने कृषीपंप जोडणीची योजना सुरूच राहणार असल्याचे येरमे यांनी येथील आढावा बैठकीत सांगितले. तर अद्यापपर्यंत कामेच सुरू केलेली नाहीत अशा कंत्राटदारांना त्यांनी तंबी दिलेली आहे. कृषीपंप जोडणीची कामे दर्जात्मक होण्याच्या दृष्टीने अधिकाऱ्यांनाही सूचना दिल्या.वायरमनचेही ऐकले गाऱ्हाणे स्थानिक पातळीवर काम करीत असताना संरक्षणात्मक साहित्याची पुर्तता केली जात नाही. उपविभागीय कार्यालयात सोई-सुविधा नसल्याने तारांबळ होत आहे. शिवाय आर्थिंगकरिताही पाणी उपलब्ध नसल्याच्या तक्रारी वायरमन यांनी कार्यकारी संचालक येरमे यांच्या कडे केल्या. साहित्य पुरविण्याविषयी अधीक्षक अभियंता रतन सोनुले यांना सूचना केल्या.