शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
3
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
4
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
5
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
6
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
7
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
8
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
9
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
10
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
11
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
12
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
13
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
14
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
15
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
16
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
17
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
18
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
19
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
20
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...

जंगलातील वाढलेले गवत ठरणार कर्मचाऱ्यांची डोकेदुखी !

By | Updated: December 5, 2020 04:08 IST

अभयारण्यात दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात जाळपट्टे घेतले जातात व त्यासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करून दिला जातो. तथापि, अद्यापपर्यंत निधी उपलब्ध ...

अभयारण्यात दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात जाळपट्टे घेतले जातात व त्यासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करून दिला जातो. तथापि, अद्यापपर्यंत निधी उपलब्ध झालेला नाही. यावर्षीची परिस्थिती वेगळी असून, जंगलात जास्त गवत आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कडेला उद्यापासून जाळपट्टे घेण्याचे काम हाती घेण्यात येत आहे. अर्थात, त्यासाठी लागणाऱ्या मजुरांना निधी उपलब्ध झाल्यानंतरच मजुरी देण्यात येणार आहे, असे नागद परिक्षेत्राचे आधिकारी व कन्नड विभागाचा अतिरिक्त कारभार सांभाळणारे सागर ढोले यांनी सांगितले.

चौकट

विघ्नसंतोषींची कर्मचाऱ्यांना धास्ती

गौताळा अभयारण्य हे पानगळीचे जंगल आहे. अगोदरच यंदा मोठ्या प्रमाणात गवत वाढले आहे. त्यात पुढील महिन्यापासून पानगळीला सुरुवात होणार आहे. त्यामुळे आग लागल्यास विझविण्याची डोकेदुखी वाढणार आहे. आगीमुळे खुरट्या झुडपांचे आस्तित्व धोक्यात येऊ शकते, तसेच सरपटणाऱ्या प्राण्यांच्या जीवितालाही आगीमुळे धोका पोहोचू शकतो. आगीचा धोका कमी करण्यासाठी रस्त्याच्या कडेला जाळपट्टे घेणे आवश्यक आहे. जनावरांना चराईबंदी व गवत कापून नेण्यास बंदी घातल्याने मने दुखावलेले विघ्नसंतोषी लोक जंगलाला आग लावण्याचा प्रकार करू शकतात, अशी भीती वनकर्मचाऱ्यांना वाटत आहे.

फोटो : गौताळा अभयारण्यातील वाळत असलेले गवत.