शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
2
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
3
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
4
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
5
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
6
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
7
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
8
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
9
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
10
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
11
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
12
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
13
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
14
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
15
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
16
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
17
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
18
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
19
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
20
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती

जंगलातील वाढलेले गवत ठरणार कर्मचाऱ्यांची डोकेदुखी !

By | Updated: December 5, 2020 04:08 IST

अभयारण्यात दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात जाळपट्टे घेतले जातात व त्यासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करून दिला जातो. तथापि, अद्यापपर्यंत निधी उपलब्ध ...

अभयारण्यात दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात जाळपट्टे घेतले जातात व त्यासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करून दिला जातो. तथापि, अद्यापपर्यंत निधी उपलब्ध झालेला नाही. यावर्षीची परिस्थिती वेगळी असून, जंगलात जास्त गवत आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कडेला उद्यापासून जाळपट्टे घेण्याचे काम हाती घेण्यात येत आहे. अर्थात, त्यासाठी लागणाऱ्या मजुरांना निधी उपलब्ध झाल्यानंतरच मजुरी देण्यात येणार आहे, असे नागद परिक्षेत्राचे आधिकारी व कन्नड विभागाचा अतिरिक्त कारभार सांभाळणारे सागर ढोले यांनी सांगितले.

चौकट

विघ्नसंतोषींची कर्मचाऱ्यांना धास्ती

गौताळा अभयारण्य हे पानगळीचे जंगल आहे. अगोदरच यंदा मोठ्या प्रमाणात गवत वाढले आहे. त्यात पुढील महिन्यापासून पानगळीला सुरुवात होणार आहे. त्यामुळे आग लागल्यास विझविण्याची डोकेदुखी वाढणार आहे. आगीमुळे खुरट्या झुडपांचे आस्तित्व धोक्यात येऊ शकते, तसेच सरपटणाऱ्या प्राण्यांच्या जीवितालाही आगीमुळे धोका पोहोचू शकतो. आगीचा धोका कमी करण्यासाठी रस्त्याच्या कडेला जाळपट्टे घेणे आवश्यक आहे. जनावरांना चराईबंदी व गवत कापून नेण्यास बंदी घातल्याने मने दुखावलेले विघ्नसंतोषी लोक जंगलाला आग लावण्याचा प्रकार करू शकतात, अशी भीती वनकर्मचाऱ्यांना वाटत आहे.

फोटो : गौताळा अभयारण्यातील वाळत असलेले गवत.