शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत आणि चीन रशिया-युक्रेन युद्धाला निधी देत ​​आहेत"; तेल खरेदीवरून ट्रम्प यांचा UNGA मध्ये आरोप
2
"भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे संपवली, पण कोणत्याही पंतप्रधानांनी मदत केली नाही," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
3
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
4
रशिया कसं थांबवेल युक्रेन युद्ध? ट्रम्प यांनी UNGA मध्ये सांगितला अमेरिकेचा प्लॅन; पुतिन यांचं टेन्शन वाढणार!
5
PAK vs SL War of Celebration :पाक गोलंदाजाने कळ काढली; हसरंगानं त्याचा बदला घेतला, पण... (VIDEO)
6
पाक गोलंदाजानं केली हसरंगाची कॉपी! मग IND vs PAK मॅचचा दाखला देत इरफाननं काढली 'लायकी' (VIDEO)
7
वैभव खेडेकरांच्या BJP प्रवेशाचा मुहूर्त मिळेना; कार्यकर्त्यांसह मुंबई गाठली पण पक्षप्रवेश नाही
8
पाकिस्तानच्या जाफर एक्सप्रेसमध्ये स्फोट; ट्रेन रुळावरून घसरुन उलटली, काही तासांपूर्वीच लष्कराला करण्यात आलं होतं लक्ष्य
9
बिग सरप्राइज! थेट टीम इंडियाची कॅप्टन्सी मिळाली अन् दिनेश कार्तिक पुन्हा मैदानात उतरण्यास झाला तयार
10
लग्नानंतर वैवाहिक संबध ठेऊ शकला नाही पती, पत्नीनं नपुंसक असल्याचा आरोप करत केली 2 कोटींची मागणी अन् मग...
11
IND vs PAK: पाकिस्तानच्या 'चिल्लर पार्टी'ला हरभजनचा इशारा, म्हणाला- थोडे मोठे व्हा नि मग...
12
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
13
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
14
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
15
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
16
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
17
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
18
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
19
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
20
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...

भूजलपातळी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 00:29 IST

जिल्हा प्रशासनाने पर्जन्यमान कमी असल्याने भूजल उपशावर तात्पुरती बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता, परंतु त्यानंतर दोनच दिवसांनी जिल्ह्यातील ११ तालुक्यांत अतिवृष्टी झाल्याने भूजलपातळी वाढली आहे़ त्यामुळे पाणीटंचाईवर नियोजन करणाºया प्रशासनाला दिलासा मिळाला आहे़ यावर्षी समाधानकारक पावसाचे संकेत दिल्यामुळे शेतकरी आनंदी होता़,

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : जिल्हा प्रशासनाने पर्जन्यमान कमी असल्याने भूजल उपशावर तात्पुरती बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता, परंतु त्यानंतर दोनच दिवसांनी जिल्ह्यातील ११ तालुक्यांत अतिवृष्टी झाल्याने भूजलपातळी वाढली आहे़ त्यामुळे पाणीटंचाईवर नियोजन करणाºया प्रशासनाला दिलासा मिळाला आहे़यावर्षी समाधानकारक पावसाचे संकेत दिल्यामुळे शेतकरी आनंदी होता़, परंतु सलग दोन महिने कोरडे गेल्यानंतर सर्वांच्याच तोंडचे पाणी पळाले़ जिल्ह्यात पावसाच्या अत्यल्प प्रमाणामुळे प्रकल्पांची स्थिती चिंताजनक झाली होती़ नांदेड शहराला पाणीपुरवठा करणाºया विष्णूपुरी प्रकल्पातही केवळ ८ दलघमी साठा शिल्लक राहिला होता़ पिण्याच्या पाण्याची भीषण परिस्थिती उद्भवली होती़ ग्रामीण भागात वाडी, वस्ती, तांड्यावर भर पावसाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची भटकंती सुरू होती़ भूगर्भाची पाणीपातळी खालावल्यामुळे अनेकांचे बोअर व विहिरी कोरड्या झाल्या होत्या़ त्यामुळे जिल्ह्यात आॅगस्टमध्येच टँकर सुरू करण्याची वेळ आली़ संभाव्य दुष्काळाची चाहूल लक्षात घेऊन व पुढील कालावधीत पिण्याचे पाणी कमी पडू नये म्हणून भूजल उपशावर तात्पुरती बंदी घालण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला होता़जिल्हाधिकाºयांनी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या परिपत्रकान्वये नांदेड जिल्ह्यातील महाराष्ट्र भूजल (विकास व व्यवस्थापन) अधिनियम २००९ नुसार सार्वजनिक पिण्याचे पाण्याच्या स्त्रोतापासून १ किलोमीटर अंतरावरील धरण, विहिरी व अन्य स्त्रोताद्वारे भूजल उपशावर तात्पुरती बंदी घातली होती, परंतु या बंदीनंतर दोनच दिवसांनी १९ व २० आॅगस्ट रोजी जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला़ त्यामुळे विष्णूपुरी जलाशय १०० टक्के भरले़ तसेच नद्या, नाल्यांनाही पाणी आले़या पावसाने भूगर्भाची पाणीपातळी वाढण्यास मदत झाली़ दरम्यान, विष्णूपुरी जलाशयात ४० दिवस पुरेल एवढाच साठा उरल्याने शहराला दोन दिवसआड पाणीपुरवठा करण्यात येत होता़ त्यामुळे नांदेडकरांची चिंता वाढली होती़ मात्र आता ही चिंता दूर झाली आहे़ काही नागरिकांनी आमच्या बोअरचे पाणी वर आल्याचे सांगितले़