शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
2
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
3
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
4
जगदीप धनखड बेपत्ता? उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यापासून संपर्कात नाहीत; विरोधकांनी सरकारला घेरले
5
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
6
मायेची सावली! भावासाठी बहीण झाली ढाल; किडनी डोनेट करुन दिलं जीवदान, रक्षाबंधन झालं खास
7
मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीचा लग्नानंतर ६ महिन्यातच मृत्यू; प्रकरणात आला नवा ट्विस्ट
8
ऑपरेशन सिंदूरवेळी एकट्या S-400 ने पाकिस्तानची एवढी विमाने पाडली, हवाईदलप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट
9
Salim Pistol: बेकायदेशीर शस्त्रांचा पुरवठा करणाऱ्या 'सलीम पिस्तूल'ला नेपाळमधून अटक!
10
PIB Fact Check: रजिस्टर्ड पोस्ट सेवा बंद करण्यात आलीये का? पाहा व्हायरल दाव्यामागील सत्य
11
टीम इंडियाचा कॅप्टन गिल इथंही टॉपला! क्रिकेटच्या पंढरीत घातलेली जर्सी लिलावात ठरली लाख मोलाची
12
Video - २ रुपयांची राखी १०० रुपयांना; दुकानदाराने सांगितला व्यवसायामागच्या 'चालूगिरी'चा खेळ
13
Monsoon Travel : कुर्ग की मुन्नार; पावसाळी पिकनिकसाठी कोणतं ठिकाण ठरेल बेस्ट?
14
अमेरिका १, सिंगापुर २, नॉर्वे ३... ही यादी पाहून डोनाल्ड ट्रम्प डोकं पकडतील, कोणती आहे यादी? जाणून घ्या
15
मध्यमवर्गीयांना गरिबीच्या खाईत लोटतात या पाच सवयी, त्वरित न बदलल्यास होईल पश्चाताप
16
शरणूसोबत 'मस्साजोग' करायचं होतं; सोबत ट्रिमर, साडी, ब्लाऊज अन् कंडोम होतं, सत्य समजताच पोलीस चक्रावले
17
काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानचं पुन्हा रडगाणं; आता म्हणतायत "अमेरिका किंवा इतर कोणत्याही देशाची मध्यस्थी चालेल पण..."  
18
रेल्वेची राऊंड ट्रिप योजना...! तिकिटांवर २० टक्के डिस्काऊंट देणार, अटी एवढ्या की...; एवढे करून मिळाले जरी...
19
ICC नं टीम इंडियाला दिली होती वॉर्निंग; तरीही कोच गंभीर राहिला 'खंबीर', अन्... पडद्यामागची गोष्ट
20
अतूट नातं! १७ वर्षांपासून 'या' अभिनेत्याला राखी बांधतेय ऐश्वर्या राय; प्रेमाने मारते 'अशी' हाक

भूजलपातळी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 00:29 IST

जिल्हा प्रशासनाने पर्जन्यमान कमी असल्याने भूजल उपशावर तात्पुरती बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता, परंतु त्यानंतर दोनच दिवसांनी जिल्ह्यातील ११ तालुक्यांत अतिवृष्टी झाल्याने भूजलपातळी वाढली आहे़ त्यामुळे पाणीटंचाईवर नियोजन करणाºया प्रशासनाला दिलासा मिळाला आहे़ यावर्षी समाधानकारक पावसाचे संकेत दिल्यामुळे शेतकरी आनंदी होता़,

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : जिल्हा प्रशासनाने पर्जन्यमान कमी असल्याने भूजल उपशावर तात्पुरती बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता, परंतु त्यानंतर दोनच दिवसांनी जिल्ह्यातील ११ तालुक्यांत अतिवृष्टी झाल्याने भूजलपातळी वाढली आहे़ त्यामुळे पाणीटंचाईवर नियोजन करणाºया प्रशासनाला दिलासा मिळाला आहे़यावर्षी समाधानकारक पावसाचे संकेत दिल्यामुळे शेतकरी आनंदी होता़, परंतु सलग दोन महिने कोरडे गेल्यानंतर सर्वांच्याच तोंडचे पाणी पळाले़ जिल्ह्यात पावसाच्या अत्यल्प प्रमाणामुळे प्रकल्पांची स्थिती चिंताजनक झाली होती़ नांदेड शहराला पाणीपुरवठा करणाºया विष्णूपुरी प्रकल्पातही केवळ ८ दलघमी साठा शिल्लक राहिला होता़ पिण्याच्या पाण्याची भीषण परिस्थिती उद्भवली होती़ ग्रामीण भागात वाडी, वस्ती, तांड्यावर भर पावसाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची भटकंती सुरू होती़ भूगर्भाची पाणीपातळी खालावल्यामुळे अनेकांचे बोअर व विहिरी कोरड्या झाल्या होत्या़ त्यामुळे जिल्ह्यात आॅगस्टमध्येच टँकर सुरू करण्याची वेळ आली़ संभाव्य दुष्काळाची चाहूल लक्षात घेऊन व पुढील कालावधीत पिण्याचे पाणी कमी पडू नये म्हणून भूजल उपशावर तात्पुरती बंदी घालण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला होता़जिल्हाधिकाºयांनी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या परिपत्रकान्वये नांदेड जिल्ह्यातील महाराष्ट्र भूजल (विकास व व्यवस्थापन) अधिनियम २००९ नुसार सार्वजनिक पिण्याचे पाण्याच्या स्त्रोतापासून १ किलोमीटर अंतरावरील धरण, विहिरी व अन्य स्त्रोताद्वारे भूजल उपशावर तात्पुरती बंदी घातली होती, परंतु या बंदीनंतर दोनच दिवसांनी १९ व २० आॅगस्ट रोजी जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला़ त्यामुळे विष्णूपुरी जलाशय १०० टक्के भरले़ तसेच नद्या, नाल्यांनाही पाणी आले़या पावसाने भूगर्भाची पाणीपातळी वाढण्यास मदत झाली़ दरम्यान, विष्णूपुरी जलाशयात ४० दिवस पुरेल एवढाच साठा उरल्याने शहराला दोन दिवसआड पाणीपुरवठा करण्यात येत होता़ त्यामुळे नांदेडकरांची चिंता वाढली होती़ मात्र आता ही चिंता दूर झाली आहे़ काही नागरिकांनी आमच्या बोअरचे पाणी वर आल्याचे सांगितले़