शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
2
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
3
युद्धबंदीनंतर पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
4
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
5
'युद्धबंदीचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
6
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
7
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
8
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
9
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
10
पाकिस्तानकडून युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
11
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
12
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धबंदीनंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
13
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
14
"काश्मीर समस्याही...!"; भारत-पाकिस्तान युद्धबंदीनंतर ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
15
'आम्हाला तिसऱ्या पक्षाची...', ट्रम्प यांनी काश्मीर मुद्दा उपस्थित केल्यावर प्रियंका चतुर्वेदींनी दिले उत्तर
16
पाकिस्तानचे अपयश उघड! बिकानेरमध्ये ब्रह्मोस क्षेपणास्त्र बूस्टर, नोज कॅप सापडले
17
तुमच्या मुलीच्या लग्नासाठी लाखो रुपये जमवायचेत? गुंतवणुकीसाठी 'हे' आहेत ३ बेस्ट पर्याय
18
बोरीवलीच्या नँसी व सुकरवाडी एसटी डेपोसाठी ३ महिन्यांत निविदा काढणार; परिवहन मंत्री सरनाईकांची घोषणा
19
चौकारांच्या हॅटट्रिकसह स्मृती मानधनाने साजरी केली विक्रमी सेंच्युरी!
20
Ceasefire Violation: 'PM मोदींना हे माहिती होतं, त्यामुळे त्यांनी शस्त्रसंधीचं...'; एकनाथ शिंदे पाकिस्तानवर भडकले

भूजलपातळी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 00:29 IST

जिल्हा प्रशासनाने पर्जन्यमान कमी असल्याने भूजल उपशावर तात्पुरती बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता, परंतु त्यानंतर दोनच दिवसांनी जिल्ह्यातील ११ तालुक्यांत अतिवृष्टी झाल्याने भूजलपातळी वाढली आहे़ त्यामुळे पाणीटंचाईवर नियोजन करणाºया प्रशासनाला दिलासा मिळाला आहे़ यावर्षी समाधानकारक पावसाचे संकेत दिल्यामुळे शेतकरी आनंदी होता़,

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : जिल्हा प्रशासनाने पर्जन्यमान कमी असल्याने भूजल उपशावर तात्पुरती बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता, परंतु त्यानंतर दोनच दिवसांनी जिल्ह्यातील ११ तालुक्यांत अतिवृष्टी झाल्याने भूजलपातळी वाढली आहे़ त्यामुळे पाणीटंचाईवर नियोजन करणाºया प्रशासनाला दिलासा मिळाला आहे़यावर्षी समाधानकारक पावसाचे संकेत दिल्यामुळे शेतकरी आनंदी होता़, परंतु सलग दोन महिने कोरडे गेल्यानंतर सर्वांच्याच तोंडचे पाणी पळाले़ जिल्ह्यात पावसाच्या अत्यल्प प्रमाणामुळे प्रकल्पांची स्थिती चिंताजनक झाली होती़ नांदेड शहराला पाणीपुरवठा करणाºया विष्णूपुरी प्रकल्पातही केवळ ८ दलघमी साठा शिल्लक राहिला होता़ पिण्याच्या पाण्याची भीषण परिस्थिती उद्भवली होती़ ग्रामीण भागात वाडी, वस्ती, तांड्यावर भर पावसाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची भटकंती सुरू होती़ भूगर्भाची पाणीपातळी खालावल्यामुळे अनेकांचे बोअर व विहिरी कोरड्या झाल्या होत्या़ त्यामुळे जिल्ह्यात आॅगस्टमध्येच टँकर सुरू करण्याची वेळ आली़ संभाव्य दुष्काळाची चाहूल लक्षात घेऊन व पुढील कालावधीत पिण्याचे पाणी कमी पडू नये म्हणून भूजल उपशावर तात्पुरती बंदी घालण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला होता़जिल्हाधिकाºयांनी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या परिपत्रकान्वये नांदेड जिल्ह्यातील महाराष्ट्र भूजल (विकास व व्यवस्थापन) अधिनियम २००९ नुसार सार्वजनिक पिण्याचे पाण्याच्या स्त्रोतापासून १ किलोमीटर अंतरावरील धरण, विहिरी व अन्य स्त्रोताद्वारे भूजल उपशावर तात्पुरती बंदी घातली होती, परंतु या बंदीनंतर दोनच दिवसांनी १९ व २० आॅगस्ट रोजी जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला़ त्यामुळे विष्णूपुरी जलाशय १०० टक्के भरले़ तसेच नद्या, नाल्यांनाही पाणी आले़या पावसाने भूगर्भाची पाणीपातळी वाढण्यास मदत झाली़ दरम्यान, विष्णूपुरी जलाशयात ४० दिवस पुरेल एवढाच साठा उरल्याने शहराला दोन दिवसआड पाणीपुरवठा करण्यात येत होता़ त्यामुळे नांदेडकरांची चिंता वाढली होती़ मात्र आता ही चिंता दूर झाली आहे़ काही नागरिकांनी आमच्या बोअरचे पाणी वर आल्याचे सांगितले़