शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

भू-जल पातळी १२ मीटरने खालावली !

By admin | Updated: August 10, 2015 00:57 IST

उस्मानाबाद : जिल्ह्यात मागील तीन वर्षेपासून सरासरीपेक्षा कमी पाऊस पडत आहे. परिणामी भू-जल पातळी कमालीची खालावली आहे. भूजलसर्वेक्षण विभागाच्या वतीने

उस्मानाबाद : जिल्ह्यात मागील तीन वर्षेपासून सरासरीपेक्षा कमी पाऊस पडत आहे. परिणामी भू-जल पातळी कमालीची खालावली आहे. भूजलसर्वेक्षण विभागाच्या वतीने आॅगस्ट महिन्यांच्या पहिल्या आठवडयात आठ तालुक्यात विविध विहिरींचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यानुसार भू-जलपातळी तब्बल १२.३४ मिटरपर्यंत खोल गेली आहे. जिल्ह्यात मागील काही वर्षांत बोअरची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे भूगर्भातील पाणीउपसा मोठ्या प्रमाणात सुरु आहे. असे असतानाच तीन-चार वर्षांपासून पावसाचे प्रमाणही घटले आहे. त्यामुळे जलस्त्रोतांसोबतच भू-जल पातळीतही अपेक्षित प्रमाणात वाढली नाही. परिणामी ऐन पावसाळयात अनेक गावांतील सार्वजनिक जलस्त्रोत कोरडेठाक पडले आहेत. त्यामुळे संबंधित गावांना टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. सध्या टँकरची संख्या १४९ वर जावून ठेपली आहे. पाऊस वेळेत न पडल्यास ही संख्या आणखी वाढणार आहे. मागील पाच वर्षांतील खालावलेलया सरासरी भूजल पातळीचा विचार केला असता जवळपास साडेतीन टक्क्यांनी अधिक खोल गेली आहे. ही बाब सर्वांसाठीच चिंतेची मानली जात आहे. त्यामुळे भू-जल पातळी उंचावण्यासाठी आता कठोर पाऊले उचलण्याची गरज व्यक्त होत आहे. भू-वैज्ञानिक कार्यालयाकडून जिल्ह्यातील विविध ११४ विहिरींचे निरीक्षण करण्यात आले असता भूम तालुक्याची भूजल पातळी तब्बल १३.२१ मिटर, कळंब ११.०४, लोहारा ११.५३, उमरगा १२.४९, उस्मानाबाद १२.१२, परंडा १२.८९, तुळजापूर १२.१४ तर वाशी तालुक्याची भूजल पातळीही सर्वाधिक १३.३४ ने खालावली आहे. आठही तालुक्यांची सरासरी विचारात घेता भूजल पातळी १२.३४५ मिटरने खोल गेली आहे. सर्वाधिक चिंताजनक स्थिती वाशी तालुक्यात निर्माण झाली आहे. त्यामुळे भू-जल पातळी उंचाविण्यासाठी आता जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)