शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

भू-जल पातळी १२ मीटरने खालावली !

By admin | Updated: August 10, 2015 00:57 IST

उस्मानाबाद : जिल्ह्यात मागील तीन वर्षेपासून सरासरीपेक्षा कमी पाऊस पडत आहे. परिणामी भू-जल पातळी कमालीची खालावली आहे. भूजलसर्वेक्षण विभागाच्या वतीने

उस्मानाबाद : जिल्ह्यात मागील तीन वर्षेपासून सरासरीपेक्षा कमी पाऊस पडत आहे. परिणामी भू-जल पातळी कमालीची खालावली आहे. भूजलसर्वेक्षण विभागाच्या वतीने आॅगस्ट महिन्यांच्या पहिल्या आठवडयात आठ तालुक्यात विविध विहिरींचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यानुसार भू-जलपातळी तब्बल १२.३४ मिटरपर्यंत खोल गेली आहे. जिल्ह्यात मागील काही वर्षांत बोअरची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे भूगर्भातील पाणीउपसा मोठ्या प्रमाणात सुरु आहे. असे असतानाच तीन-चार वर्षांपासून पावसाचे प्रमाणही घटले आहे. त्यामुळे जलस्त्रोतांसोबतच भू-जल पातळीतही अपेक्षित प्रमाणात वाढली नाही. परिणामी ऐन पावसाळयात अनेक गावांतील सार्वजनिक जलस्त्रोत कोरडेठाक पडले आहेत. त्यामुळे संबंधित गावांना टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. सध्या टँकरची संख्या १४९ वर जावून ठेपली आहे. पाऊस वेळेत न पडल्यास ही संख्या आणखी वाढणार आहे. मागील पाच वर्षांतील खालावलेलया सरासरी भूजल पातळीचा विचार केला असता जवळपास साडेतीन टक्क्यांनी अधिक खोल गेली आहे. ही बाब सर्वांसाठीच चिंतेची मानली जात आहे. त्यामुळे भू-जल पातळी उंचावण्यासाठी आता कठोर पाऊले उचलण्याची गरज व्यक्त होत आहे. भू-वैज्ञानिक कार्यालयाकडून जिल्ह्यातील विविध ११४ विहिरींचे निरीक्षण करण्यात आले असता भूम तालुक्याची भूजल पातळी तब्बल १३.२१ मिटर, कळंब ११.०४, लोहारा ११.५३, उमरगा १२.४९, उस्मानाबाद १२.१२, परंडा १२.८९, तुळजापूर १२.१४ तर वाशी तालुक्याची भूजल पातळीही सर्वाधिक १३.३४ ने खालावली आहे. आठही तालुक्यांची सरासरी विचारात घेता भूजल पातळी १२.३४५ मिटरने खोल गेली आहे. सर्वाधिक चिंताजनक स्थिती वाशी तालुक्यात निर्माण झाली आहे. त्यामुळे भू-जल पातळी उंचाविण्यासाठी आता जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)