शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

व्यापार, शिक्षण आणि गुंतवणुकीसाठी अमेरिकेत मोठ्या संधी...

By admin | Updated: October 7, 2016 01:30 IST

औरंगाबाद : भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांचे संबंध बळावले असल्याने येणाऱ्या काळात दोन्ही देशांतील व्यापार हा ५०० अब्ज डॉलरच्या घरात जाणार असून,

औरंगाबाद : भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांचे संबंध बळावले असल्याने येणाऱ्या काळात दोन्ही देशांतील व्यापार हा ५०० अब्ज डॉलरच्या घरात जाणार असून, भारतीय नागरिकांना अमेरिकेत व्यापार, शिक्षण, पर्यटन आणि गुंतवणुकीमध्ये मोठ्या संधी असल्याचे मुंबईतील अमेरिकन वकिलातीतील (कॉन्सुलेट जनरल) महासंचालक थॉमस वायडा यांनी औरंगाबादेतील पत्रकारांशी संवाद साधताना स्पष्ट केले. अमेरिकन कॉन्सुलेट आणि सीआयआय (कॉन्फेडरेशन आॅफ इंडियन इंडस्ट्रीज) च्या सहकार्याने औरंगाबादमधील नागरिक, पर्यटक आणि विद्यार्थ्यांसाठी ‘यूएसए टू गो’ हा उपक्रम घेण्यात आला. ताज विवांता येथे झालेल्या या कार्यक्रमाला शहरातील विविध संस्थांतील विद्यार्थी तसेच नागरिक उपस्थित होते. ‘यूएसए टू गो’ सारखे कार्यक्रम हे भारताला अमेरिकेच्या अधिक जवळ नेतात. दोन्ही देशांत विशेष हॉटलाईनही सुरू आहे. औरंगाबादसारख्या तिसऱ्या टप्प्यातील शहरांत येण्याचे कारण म्हणजे शिक्षण, व्यापार आणि पर्यटन क्षेत्राची माहिती विकसित होणाऱ्या शहरांपर्यंत जावी हा उद्देश असल्याचे वायडा यांनी स्पष्ट केले. भारतातून अमेरिकेत जाणाऱ्यांची संख्या मागील वर्षभराच्या काळात १३ टक्क्यांवरुन २९ टक्क्यांपर्यंत गेल्याचे सांगत वायडा म्हणाले की, शिक्षण क्षेत्रात पदवी ते पीएच. डी. अशी मोठी संधी अमेरिकेत आहे. अर्थात गुणवत्ता हा निकष त्यासाठी आहेच. भारतीय नागरिकांना काही कारणांमुळे ‘व्हिसा’ नाकारला जातो. मात्र त्याचे कारण स्पष्ट केले जात नाही, या प्रश्नावर वायडा यांनी हा मुद्दा ‘व्हिसा’ अधिकाऱ्यांशी संबंधित असल्याचे सांगितले. अमेरिकेतील माहिती तंत्रज्ञान आणि बीपीओ क्षेत्रात भारतीयांना मिळणाऱ्या संधी कमी होत चालल्या आहेत का, या प्रश्नावरही त्यांनी सध्या परिस्थिती ‘स्टेबल’ असल्याचे सांगितले. निवडणुकीचा परिणाम नाहीअमेरिकेतील अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर भारत आणि अमेरिकेच्या संबंधांमध्ये काही फरक पडेल का, या मुद्यावर वायडा म्हणाले की, निवडणुकीनंतर ‘व्हाईट हाऊस’ मध्ये कोणीही बसले तरी भारताला अमेरिकेचे मोठे पाठबळ (स्ट्राँग सपोर्ट) राहणारच आहे. कंपन्यांची पाहणी या दौऱ्यात त्यांनी येथील जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन कंपनीला भेट देऊन पाहणी केली व समाधान व्यक्त केले. जालना येथील महिको कंपनीसही त्यांनी भेट देऊन संकरित बियाणांबाबत माहिती घेतली. सीआयआयतर्फे चर्चासत्रशहरातील नागरिक व विद्यार्थ्यांसाठी अमेरिकन कॉन्सुलेट आणि सीआयआयच्या वतीने दोन विषयांवर चर्चासत्र घेण्यात आले. चर्चासत्रात थॉमस वायडा यांनी आपली भूमिका मांडली. मुंबईतील अमेरिकन कॉन्सुलेट जनरल थॉमस वायडा यांना औरंगाबाद शहराच्या पहिल्याच दौऱ्यात ‘लोडशेडिंग’चा फटका बसला. ‘स्मार्ट सिटी’कडे वाटचाल करण्याची स्वप्ने पाहणाऱ्या शहरात हा प्रकार घडल्याने कार्यक्रमासाठी आलेल्या संयोजकांमध्येही अपराधाची भावना निर्माण झाली. येथील ताज विवांता हॉटेलमध्ये सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास वायडा यांचा पत्रकारांशी संवाद चालू होता. त्याच सुमारास हॉटेलच्या इतर दोन हॉलमध्ये कॉन्सुलेटच्या इतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गुंतवणूक, शिक्षण आणि पर्यटन या विषयांवर चर्चासत्र चालू होते. शहरातील उच्चशिक्षित नागरिक आणि व्यापार व उद्योग क्षेत्रातील अनेक व्यक्तींसह विद्यार्थीही उपस्थित होते. सहा वाजण्याच्या सुमारास अचानक वीज गेली. त्यामुळे वायडा यांनी अंधारातच पत्रकारांशी संवाद चालू ठेवला. अडीच- तीन मिनिटांनी वीज आली आणि अर्धा मिनिटातच पुन्हा गेली. काही सेकंदांनी ती परत आली. विजेच्या या लपंडावामुळे कॉन्सुलर जनरलही थोडे विचलित झाले. त्यांच्यासमवेत असणारे मीडिया अधिकाऱ्यांनाही काय करावे हे सुचेनासे झाले. एका महिला अधिकाऱ्याने हॉलचे पडदे उघडले. मात्र, सायंकाळची वेळ असल्याने पुरेसा नैसर्गिक प्रकाशही आत येऊ शकला नाही. यासंदर्भात हॉटेलचे आॅपरेशन अधिकारी गौतम पंड्या म्हणाले की, महावितरणची वीज गेल्याने हा प्रकार झाला. यामध्ये हॉटेल व्यवस्थापनाचा दोष नाही. तर दुसरीकडे महावितरणचे कार्यकारी अभियंता अमित कुलकर्णी यांनी वीज गेल्याचा प्रकार घडलाच नसल्याचे सांगितले. सीआयआयचे उपाध्यक्ष ऋषी बागला यांनी वीज जाण्याच्या प्रकाराबद्दल असमाधान व्यक्त केले. अमेरिकन कॉन्सुलेट जनरल आले असताना असा प्रकार व्हायला नको होता, असे ते म्हणाले.