शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
3
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
4
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
5
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
6
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
7
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
8
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
11
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
12
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
13
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
14
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
15
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
20
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका

वीज थकबाकीत गेवराई तालुका ‘अव्वल’

By admin | Updated: January 28, 2015 00:57 IST

राजेश खराडे , बीड महिन्याकाठी सरासरीइतकीही वसुली न झाल्याने जिल्ह्यात सर्वाधिक थकबाकी ही गेवराई तालुक्याकडे आहे. ग्राहकांची संख्या अधिक असूनही वीजचोरीचे प्रमाण अधिक

राजेश खराडे , बीडमहिन्याकाठी सरासरीइतकीही वसुली न झाल्याने जिल्ह्यात सर्वाधिक थकबाकी ही गेवराई तालुक्याकडे आहे. ग्राहकांची संख्या अधिक असूनही वीजचोरीचे प्रमाण अधिक असल्यामुळे वसुलीला मात्र खिळ बसली आहे. सध्य स्थितीला तालुक्याकडे जवळपास १३५ कोटीची थकबाकी आहे. वाढती थकबाकी पाहता तालुक्यात भारनियमनही अधिकच्या प्रमाणात करण्यात आले आहे. गेवराई तालुक्यात विजेचा वापर करणाऱ्या ग्राहकांची संख्याही अधिक आहे. मात्र ग्राहकांच्या तुलनेत महिन्याकाठी वसुली होत नाही. तालुक्यात घरगुती, व्यापारी, औद्योगिक, शेतीपंपग्राहक, सार्वजनिक पाणीपुरवठा विभाग व पथदिव्यांची एकुण ३८ हजार सहाशे ग्राहक आहेत. तर थकबाकी ही १३५ कोटीच्या घरात गेली आहे.सर्वाधिक तोटा शेती पंपग्राहकांचा तालुक्यात ३८ हजार ६०० पैकी २३ हजार ऐवढी शेतीपंप ग्राहकांची संख्या आहे. अतिरीक्त विद्युत पंपाचा भार वाढल्यामुळे या परिसरातील ट्रान्सफारर्मरचाही धुरुळा उडत आहे. तर केवळ शेतीपंपग्राहकांकडेच १११ कोटी २३ लाख रुपयांची थकबाकी आहे. तालुक्याची थकबाकी अधिक असल्याने भारनियमनही याच तालुक्यात सर्वाधिक प्रमाणात आहे.वसुली मोहिमाही फेल जिल्ह्यात सर्वाधिक थकबाकी गेवराई तालुक्यात असल्याने महावितरण कंपनीने याच भागात तगडी वसुली यंत्रना लावली होती. मात्र सर्वाधिक थकबाकी असतानाही सर्वात कमी वसुली तालुक्यातून होत आहे. त्यामुळे महिन्याकाठी थकबाकीत कमी न होता वाढच होत आहे. महावितरणचे कर्मचारी वसुलीकरिता गेले असता ग्राहकांकडूनच त्यांना अरेरावीची भाषा ऐकूण घ्यावी लागत आहे.मानसिकता बदलणे आवश्यकबदलत्या काळाच्या ओघात वीज ही मुलभूत गरज आहे. महावितरण कंपनीकडून अगोदर ग्राहकांना सेवा देऊन नंतर बील आकारणी केली जाते. मात्र ग्राहकांची मानसिकता नसल्यानेच थकबाकीत वाढ होत आहे. त्यामुळे ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांनी आपली मानसिकता बदलणे आवश्यक असल्याचे अधिक्षक अभियंता सुंदर लटपटे यांनी सांगितले.