राजेश खराडे , बीडमहिन्याकाठी सरासरीइतकीही वसुली न झाल्याने जिल्ह्यात सर्वाधिक थकबाकी ही गेवराई तालुक्याकडे आहे. ग्राहकांची संख्या अधिक असूनही वीजचोरीचे प्रमाण अधिक असल्यामुळे वसुलीला मात्र खिळ बसली आहे. सध्य स्थितीला तालुक्याकडे जवळपास १३५ कोटीची थकबाकी आहे. वाढती थकबाकी पाहता तालुक्यात भारनियमनही अधिकच्या प्रमाणात करण्यात आले आहे. गेवराई तालुक्यात विजेचा वापर करणाऱ्या ग्राहकांची संख्याही अधिक आहे. मात्र ग्राहकांच्या तुलनेत महिन्याकाठी वसुली होत नाही. तालुक्यात घरगुती, व्यापारी, औद्योगिक, शेतीपंपग्राहक, सार्वजनिक पाणीपुरवठा विभाग व पथदिव्यांची एकुण ३८ हजार सहाशे ग्राहक आहेत. तर थकबाकी ही १३५ कोटीच्या घरात गेली आहे.सर्वाधिक तोटा शेती पंपग्राहकांचा तालुक्यात ३८ हजार ६०० पैकी २३ हजार ऐवढी शेतीपंप ग्राहकांची संख्या आहे. अतिरीक्त विद्युत पंपाचा भार वाढल्यामुळे या परिसरातील ट्रान्सफारर्मरचाही धुरुळा उडत आहे. तर केवळ शेतीपंपग्राहकांकडेच १११ कोटी २३ लाख रुपयांची थकबाकी आहे. तालुक्याची थकबाकी अधिक असल्याने भारनियमनही याच तालुक्यात सर्वाधिक प्रमाणात आहे.वसुली मोहिमाही फेल जिल्ह्यात सर्वाधिक थकबाकी गेवराई तालुक्यात असल्याने महावितरण कंपनीने याच भागात तगडी वसुली यंत्रना लावली होती. मात्र सर्वाधिक थकबाकी असतानाही सर्वात कमी वसुली तालुक्यातून होत आहे. त्यामुळे महिन्याकाठी थकबाकीत कमी न होता वाढच होत आहे. महावितरणचे कर्मचारी वसुलीकरिता गेले असता ग्राहकांकडूनच त्यांना अरेरावीची भाषा ऐकूण घ्यावी लागत आहे.मानसिकता बदलणे आवश्यकबदलत्या काळाच्या ओघात वीज ही मुलभूत गरज आहे. महावितरण कंपनीकडून अगोदर ग्राहकांना सेवा देऊन नंतर बील आकारणी केली जाते. मात्र ग्राहकांची मानसिकता नसल्यानेच थकबाकीत वाढ होत आहे. त्यामुळे ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांनी आपली मानसिकता बदलणे आवश्यक असल्याचे अधिक्षक अभियंता सुंदर लटपटे यांनी सांगितले.
वीज थकबाकीत गेवराई तालुका ‘अव्वल’
By admin | Updated: January 28, 2015 00:57 IST