शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
2
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
3
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
4
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
5
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
6
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
7
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स
8
Samsung S24 Ultra: कवडीच्या भावात मिळतोय सॅमसंग एस २४ अल्ट्रा; खरेदीवर थेट ६० हजारांचं डिस्काउंट!
9
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
10
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!
11
फक्त दहावी शिकलीये तेजस्विनी पंडित, म्हणाली- "कॉलेजची फी भरायला वडिलांकडे पैसे नव्हते..."
12
वर्षा उसगावकरांसोबत डान्स करणार नाही, असं त्या 'महा'नटाने सांगितलं..; महेश टिळेकर यांचा मोठा खुलासा
13
Beed Video: 'डोक्यात मार... पायावर मार... मार... मार'; उपसरपंचाला काठ्या, दगडाने मारहाण, बीड पुन्हा हादरले
14
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
15
दक्षिण भारत प्रसिद्ध खलनायकाला मुकला; कोटा श्रीनिवास राव यांचे ८३ व्या वर्षी निधन
16
सोनं-शेअर्स विसरा! चांदीने दिला सर्वाधिक परतावा, किंमत १.११ लाख रुपयांवर, अजून किती वाढणार?
17
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
18
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
19
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
20
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...

चाराटंचाईही गंभीर..!

By admin | Updated: June 29, 2014 00:38 IST

ईट : पावसाळा सुरू होऊन एक महिना आणि दोन नक्षत्र संपत आले तरी मान्सूनचे आगमन झालेले नाही.

ईट : पावसाळा सुरू होऊन एक महिना आणि दोन नक्षत्र संपत आले तरी मान्सूनचे आगमन झालेले नाही. त्यामुळे ईट परिसरात पाण्यासोबतच जनावरांच्या चाऱ्याचीही मोठी टंचाई निर्माण झाली असून, २५ रूपये दर देऊनही कडब्याची पेंढी मिळत नसल्याने पशुपालकांनी आता कडब्याला पर्याय म्हणून उसाची निवड केल्याचे दिसत आहे.भूम तालक्यात दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. शिवाय तालुक्याचे बहुतांश क्षेत्र हे डोंगराळ असल्यामुळे चराऊ क्षेत्र मोठे आहे. तसेच रबी पिकाचा तालुका विशेषत: ज्वारीचे कोठार म्हणूनही ओळख असल्याने या तालुक्यात जनावरांसाठीचा कडबाही मुबलक उपलब्ध होतो. त्यामुळे या भागात शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. दुधापासून खवा, खव्यापासून पेढा उत्पादन करणारी केंद्रे तसेच दूध संकलन केंद्रेही तालुक्यात मोठ्या प्रमाणात आहेत. पर्यायाने दुभत्या जनावरांची संख्याही भरपूर आहे.यंदाच्या रबी हंगामात फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी वादळी वाऱ्यासह गारांचा अवकाळी पाऊस झाल्याने ज्वारी पिकाचे मोठे नुकसान झाले. तसेच ज्वारीचा कडबा भिजून काळा पडल्याने पशुपालकांसमोर चाऱ्याचा प्रश्नही गंभीर निर्माण झाला आहे. वेळेवर पाऊस पडला तर हिरव्या चाऱ्याची निर्मिती करता येईल, या आशेवर शेतकरी होता. परंतु, यंदाच्या पावसाळ्यातील मृग नक्षत्र कोरडे गेले. त्यापाठोपाठ आता अद्रा नक्षत्रातील पाच दिवसही कोरडेच गेल्याने पशुपालकांसमोर चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. कडबा खरेदीसाठी पशुपालक गावोगावी फिरत असून, सध्या अडीच हजार रूपये प्रती शेकडा कडब्याची खरेदी केली जात आहे. जादा दर देऊनही कडबा उपलब्ध होत नसल्याने पशुपालकांनी आता शेतातील उसाचाच चारा म्हणून वापर करण्यास सुरूवात केली आहे. या भागात प्रतीगुंठा अडीच हजार रूपये दराने ऊस विकत घेतला जात असून, तोच जनावरांना चारा म्हणून दिला जात आहे. एकूणच पशुखाद्याने गगनाला भिडलेले भाव, चाऱ्याची टंचाई आणि पाण्याचा प्रश्न यामुळे या भागातील दुग्धव्यवसाय अडचणीत सापडल्याचे चित्र आहे. (वार्ताहर)