शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

मोजक्याच शेतकऱ्यांना गारपीट अनुदान

By admin | Updated: May 2, 2016 23:50 IST

धारूर : २०१४ मधील गारपिटीने तालुक्यातील धुनकवड गावात धुमाकूळ घातला होता. परिणामी उसासह फळबागा आणि इतर पिके उद्ध्वस्त झाली;

महसूल यंत्रणेची मनमानी : धुनकवडचे शेतकरी हैराण; तलाठी जबाबदार असल्याचा आरोपधारूर : २०१४ मधील गारपिटीने तालुक्यातील धुनकवड गावात धुमाकूळ घातला होता. परिणामी उसासह फळबागा आणि इतर पिके उद्ध्वस्त झाली; मात्र ४०० पेक्षा अधिक शेतकरी असलेल्या या गावातील केवळ १२५ लोकांना गारपीट अनुदान आले असून, इतरांच्या पदरात काहीच पडले नाही. महसूल यंत्रणेच्या मनमानीमुळे व पाहणी अहवाल घरात बसून केल्यामुळे शेतकऱ्यांना अनुदानापासून वंचित रहावे लागले. नैसर्गिक संकट आल्यानंतर तलाठी, ग्रामसेवक ही जी महसूल खात्याची यंत्रणा आहे. त्यांच्या मनमानीचा फटका गोरगरीब शेतकऱ्यांना कसा बसतो याचे उदाहरण म्हणजे हे गाव आहे. २०१४ ला गारपीट झाली, तेव्हा या गावात काही मोजक्याच शेतकऱ्यांच्या शेतात झाली असे नव्हते. आसपासच्या गावासह संपूर्ण शिवारात गारपीट झाली, ज्यामुळे उभ्या पिकाचं नुकसान झाले होते. फळबागासह इतर पिके उद्ध्वस्त झाली. मात्र पंचनामा करणाऱ्या महसूल यंत्रणेने तालुक्याच्या ठिकाणी बसूनच काही ठराविक शेतकऱ्यांच्या याद्या तयार केल्या. ज्याचा लाभ केवळ १२५ शेतकऱ्यांना मिळाला. वास्तविक पाहता माजलगाव, परळी, अंबाजोगाई आदी तालुक्यात गारपीट झाल्यानंतर तलाठ्याने गावातील संपूर्ण शेतकऱ्यांना लाभ मिळवून दिल्याचे निदर्शनास आले. मात्र या गावात जाणीवपूर्वक बाकीच्या शेतकऱ्यांना लाभ मिळाला नाही. खरं तर हा भेदभाव महसूल यंत्रणेने का केला, याची सखोल चौकशी होण्याची गरज आहे. आज ज्यांना अनुदान मिळाले ते शेतकरी दुष्काळात खुश असले तरी दुष्काळात होरपळणारे शेतकरी मोठ्या प्रमाणावर बाकी राहिल्याने गावात अनेकांच्या चेहऱ्यांवर निराशा आहे. (वार्ताहर)उर्वरित शेतकऱ्यांचा अनुदानासाठी अहवाल तयार करामहसूल यंत्रणा कधीकधी सामान्य जनतेच्या मुळावर कशी उठते याचा हा प्रकार आहे. आता अनुदान जरी मिळाले नाही तरी या प्रश्नाचे गांभीर्य फार मोठे आव्हानात्मक असून, याची चौकशी करावी व उर्वरित शेतकऱ्यांचा अनुदानासाठी अहवाल तयार करावा, अशी मागणी राम कुलकर्णी यांनी केली.