शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

भव्य कलशयात्रेत नारी शक्तीचा जयघोष

By admin | Updated: January 2, 2015 00:49 IST

औरंगाबाद : सृजन, मांगल्य आणि शक्तीचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या कलशाला डोक्यावर घेत शहरातील हजारो महिलांनी गुरुवारी मंगल कलशयात्रा काढली.

औरंगाबाद : सृजन, मांगल्य आणि शक्तीचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या कलशाला डोक्यावर घेत शहरातील हजारो महिलांनी गुरुवारी मंगल कलशयात्रा काढली. मराठवाड्यावरील दुष्काळाचे सावट दूर होऊन निसर्गाची कृपा सदोदित राहावी यासाठी यावेळी प्रार्थना करण्यात आली. पाटीदार भवनपासून ते टकसाळी मंगल कार्यालयापर्यंतच्या या पदयात्रेत विविध वयोगटातील महिला मोठ्या संख्येने सामील झाल्या. आजघडीला पर्यावरणाचा बिघडत चाललेला समतोल पूर्ववत करण्यासाठी हरिद्वारच्या गायत्री परिवारातर्फे चार दिवसांचा भव्य गायत्री संस्कार आयोजित केला आहे. यावेळी गायत्री परिवाराचे संजय टांक, मुकेश चोटलानी, प्रकाश पटेल, राम कलानी, सांडू मानके, सतीश वेद उपस्थित होते. शांतिकुंज हरिद्वार येथून कैलास महाजन आणि गोविंद पाटीदार यांनी मंत्रवाचनाने कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यांनी कलशाचे महत्त्व सांगितले. ते म्हणाले, ‘कलशात ३३ कोटी देवतांचा निवास असतो व केवळ नारीच शक्ती त्याचे समर्थपणे वहन करूशकते. गायत्री मंत्राचे पठण करत स्त्रियांनी वरुण देवतेला आवाहन केले. हजारो महिला व मुली कलशयात्रेत सामील झाल्या होत्या. यात विविध वयोगटातील महिला पावसातही कलश घेऊन पाटीदार भवनपासून टाकसाळी मंगल कार्यालयापर्यंत चालत गेल्या. अनेकांनी या यात्रेचे दर्शन घेतले. ‘नारीचा सन्मान जिथे, संस्कृतीचे उत्थान तिथे’ ही घोषणा देत यात्रा निघाली होती. कलशयात्रा टाकसाळी मंगल कार्यालयात पोहोचल्यावर यज्ञशाळेत कलशधारी महिलांची आरती करण्यात आली. शुक्रवारी सकाळी साडेसात ते अकरा गायत्री महायज्ञ होईल. यात साधकच नाही तर सामान्यही सहभागी होऊ शकतील. पर्यावरण स्वच्छतेसाठी विशेष हवनसामग्री यात वापरली जाणार आहेत. यामुळे प्रदूषण टाळले जाईल, असे परिवाराचे प्रमुख स्वयंसेवक राजेश टांक यांनी सांगितले.