शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
3
भारतावर ट्रम्प इतके नाराज का आहेत?
4
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
5
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
6
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
7
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
8
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
9
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
10
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
11
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
12
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
13
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
14
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
15
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
16
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
17
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
18
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
19
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
20
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?

भव्य कलशयात्रेत नारी शक्तीचा जयघोष

By admin | Updated: January 2, 2015 00:49 IST

औरंगाबाद : सृजन, मांगल्य आणि शक्तीचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या कलशाला डोक्यावर घेत शहरातील हजारो महिलांनी गुरुवारी मंगल कलशयात्रा काढली.

औरंगाबाद : सृजन, मांगल्य आणि शक्तीचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या कलशाला डोक्यावर घेत शहरातील हजारो महिलांनी गुरुवारी मंगल कलशयात्रा काढली. मराठवाड्यावरील दुष्काळाचे सावट दूर होऊन निसर्गाची कृपा सदोदित राहावी यासाठी यावेळी प्रार्थना करण्यात आली. पाटीदार भवनपासून ते टकसाळी मंगल कार्यालयापर्यंतच्या या पदयात्रेत विविध वयोगटातील महिला मोठ्या संख्येने सामील झाल्या. आजघडीला पर्यावरणाचा बिघडत चाललेला समतोल पूर्ववत करण्यासाठी हरिद्वारच्या गायत्री परिवारातर्फे चार दिवसांचा भव्य गायत्री संस्कार आयोजित केला आहे. यावेळी गायत्री परिवाराचे संजय टांक, मुकेश चोटलानी, प्रकाश पटेल, राम कलानी, सांडू मानके, सतीश वेद उपस्थित होते. शांतिकुंज हरिद्वार येथून कैलास महाजन आणि गोविंद पाटीदार यांनी मंत्रवाचनाने कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यांनी कलशाचे महत्त्व सांगितले. ते म्हणाले, ‘कलशात ३३ कोटी देवतांचा निवास असतो व केवळ नारीच शक्ती त्याचे समर्थपणे वहन करूशकते. गायत्री मंत्राचे पठण करत स्त्रियांनी वरुण देवतेला आवाहन केले. हजारो महिला व मुली कलशयात्रेत सामील झाल्या होत्या. यात विविध वयोगटातील महिला पावसातही कलश घेऊन पाटीदार भवनपासून टाकसाळी मंगल कार्यालयापर्यंत चालत गेल्या. अनेकांनी या यात्रेचे दर्शन घेतले. ‘नारीचा सन्मान जिथे, संस्कृतीचे उत्थान तिथे’ ही घोषणा देत यात्रा निघाली होती. कलशयात्रा टाकसाळी मंगल कार्यालयात पोहोचल्यावर यज्ञशाळेत कलशधारी महिलांची आरती करण्यात आली. शुक्रवारी सकाळी साडेसात ते अकरा गायत्री महायज्ञ होईल. यात साधकच नाही तर सामान्यही सहभागी होऊ शकतील. पर्यावरण स्वच्छतेसाठी विशेष हवनसामग्री यात वापरली जाणार आहेत. यामुळे प्रदूषण टाळले जाईल, असे परिवाराचे प्रमुख स्वयंसेवक राजेश टांक यांनी सांगितले.