शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

मूळ आदिवासींचा भव्य मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 00:34 IST

नामसदृश्यतेचा फायदा घेऊन बोगस आदिवासींना प्रमाणपत्र दिले जात असून त्याचा फटका मूळ आदिवासींना बसत आहे. राज्यभरातील बोगस आदिवासींंना जात प्रमाणपत्र देण्यात येऊ नये या मागणीसाठी आदिवासी समाजाच्या वतीने गुरुवारी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: नामसदृश्यतेचा फायदा घेऊन बोगस आदिवासींना प्रमाणपत्र दिले जात असून त्याचा फटका मूळ आदिवासींना बसत आहे. राज्यभरातील बोगस आदिवासींंना जात प्रमाणपत्र देण्यात येऊ नये या मागणीसाठी आदिवासी समाजाच्या वतीने गुरुवारी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मराठवाड्यासह विदर्भातूनही आदिवासी बांधव सहभागी झाले होते.शहरातील नवामोंढा मैदानातून निघालेल्या या मोर्चात हजारो आदिवासी सहभागी झाले होते. अनेक आदिवासी हे पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते. मोर्चाचे नेतृत्व माजी शिक्षणमंत्री, माजी उपसभापती वसंतराव पुरके, माजी सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे, माजी आ. भीमराव केराम, आ. संतोष टारपे, माजी आ. उत्तम इंगळे, दादाराव टारपे यांनी केले.अनुसूचित जमातीच्या जात वैधता प्रमाणपत्राबाबत सर्वोच्च न्यायालयाने ६ जुलै २०१७ रोजी निर्णय दिला आहे. मात्र या निर्णयाची अद्यापही अंमलबजावणी झाली नाही. या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करावी, आंध आदिवासी जमाती संदर्भात बदनामी करणाºयावर गुन्हे दाखल करावे, नांदेड जिल्हा गॅझेटियर १९६१ च्या जनगणनेप्रमाणे नांदेड जिल्ह्यात मन्नेरवारलू व महादेव कोळी या जमाती अस्तित्वात नसल्याने त्यांना दिलेले बोगस अनुसूचित जमातीचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द करावे आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. या मोर्चात मूळ आदिवासी पारंपरिक वेशात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्याचबरोबर आदिवासी सांस्कृतिक कलापथके सहभागी झाले होते.मोर्चादरम्यान या कलापथकाने आदिवासींच्या समस्या जनतेपुढे ठेवल्या. नामसदृश्यतेचा फायदा घेऊन राज्यात बोगस आदिवासींनी मूळ आदिवासींच्या अनेक योजनांचा फायदा घेतला आहे. त्यात आता राज्य सरकारने मंत्रीमंडळाच्या ३ आॅक्टोबर २०१७ रोजी झालेल्या बैठकीत जात वैधतेबाबतचे पत्र असलेल्या व्यक्तीच्या सर्व कुटुंबियांना तो पुरावा म्हणून तो ग्राह्य धरण्याचे आदेश दिले आहेत.या निर्णयाचा मोठा फटका आदिवासींना बसला आहे. हा निर्णय अनुसूचित जमातींना लागू करु,नये अशी मागणी मोर्चेकºयांनी केली.राज्य शासनाने स्थापन केलेल्या विशेष तपासणी समितीवरही यावेळी टीका करण्यात आली. ही समिती केवळ वेळकाढू धोरणासाठी स्थापन करण्यात आल्याचे म्हटले आहे. या मोर्चात सखाराम वाकोडे, प्रा. किशन मिरासे, प्रा. किशन फोले, डॉ. शेकोबा ढोले, डॉ. बळीराम भुरके, शेषराव कोवे, प्रा. विजय खुपसे, डॉ. हनुमंत रिठ्ठे, राम मिरासे,रत्नाकर बुरकुल आदींचा सहभाग होता.