शहरं
Join us  
Trending Stories
1
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
2
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
3
"काँग्रेस पराभव लपवण्यासाठी खोटे दावे करतेय"; मतचोरीवरून भाजपाचा राहुल गांधींवर हल्लाबोल
4
२.४० कोटींपैकी केवळ ८० लाख लाडक्या बहिणींचे eKYC पूर्ण, १८ नोव्हेंबरपर्यंतची मुदत; पुढे काय?
5
राहुल गांधींनी जिला 'ब्राझिलियन मॉडेल' म्हटलं, ती निघाली 'पिंकी'? काँग्रेसच्या मत चोरीच्या दाव्यानंतर, चकित करणारा खुलास!
6
इंदुरीकर यांच्या मुलीचा शाही साखरपुडा चर्चेत; एवढा खर्च कशासाठी?, महाराज म्हणाले...
7
"मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध 
8
"रस्ते चांगले असतील तर जास्त अपघात होतील"; बस अपघातावर भाजपा खासदाराचं वादग्रस्त विधान
9
Astro Tips: तुमच्या नशिबात प्रेम की धोका, हे कसे ओळखाल? ज्योतिष शास्त्र काय सांगते पाहा!
10
“अजित पवार कायम उप असतात, त्यांना ‘अखंड उप भव’ हा आशीर्वाद”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
11
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
12
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
13
Sensex Will Go Above 1 Lakh: वाईट काळ सरला..! पुढील वर्षी सेन्सेक्स गाठणार १ लाखांचा टप्पा, कोण म्हणालं असं?
14
यूएईकडून भारताला धोका? ६००० कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दुबईतून गायब; सुप्रीम कोर्ट संतापले
15
प्रियकराने केली शिवीगाळ, वडिलांचा अपमान सहन न झालेल्या २० वर्षीय मुलीने उचललं टोकाचं पाऊल
16
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
17
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
18
प्रणित मोरे आज परत येतोय? 'बिग बॉस १९' मध्ये मोठा ट्विस्ट; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
19
लर्निंग लायसन्सचे ऑडिट कधी होणार? 'फेसलेस' प्रणालीमध्ये गंभीर त्रुटी उघड तरीही विभाग गप्प
20
अखेर सूरज चव्हाणने दाखवला होणाऱ्या बायकोचा चेहरा! अंकिता वालावलकरच्या घरी झालं केळवण, पाहा व्हिडीओ

मूळ आदिवासींचा भव्य मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 00:34 IST

नामसदृश्यतेचा फायदा घेऊन बोगस आदिवासींना प्रमाणपत्र दिले जात असून त्याचा फटका मूळ आदिवासींना बसत आहे. राज्यभरातील बोगस आदिवासींंना जात प्रमाणपत्र देण्यात येऊ नये या मागणीसाठी आदिवासी समाजाच्या वतीने गुरुवारी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: नामसदृश्यतेचा फायदा घेऊन बोगस आदिवासींना प्रमाणपत्र दिले जात असून त्याचा फटका मूळ आदिवासींना बसत आहे. राज्यभरातील बोगस आदिवासींंना जात प्रमाणपत्र देण्यात येऊ नये या मागणीसाठी आदिवासी समाजाच्या वतीने गुरुवारी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मराठवाड्यासह विदर्भातूनही आदिवासी बांधव सहभागी झाले होते.शहरातील नवामोंढा मैदानातून निघालेल्या या मोर्चात हजारो आदिवासी सहभागी झाले होते. अनेक आदिवासी हे पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते. मोर्चाचे नेतृत्व माजी शिक्षणमंत्री, माजी उपसभापती वसंतराव पुरके, माजी सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे, माजी आ. भीमराव केराम, आ. संतोष टारपे, माजी आ. उत्तम इंगळे, दादाराव टारपे यांनी केले.अनुसूचित जमातीच्या जात वैधता प्रमाणपत्राबाबत सर्वोच्च न्यायालयाने ६ जुलै २०१७ रोजी निर्णय दिला आहे. मात्र या निर्णयाची अद्यापही अंमलबजावणी झाली नाही. या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करावी, आंध आदिवासी जमाती संदर्भात बदनामी करणाºयावर गुन्हे दाखल करावे, नांदेड जिल्हा गॅझेटियर १९६१ च्या जनगणनेप्रमाणे नांदेड जिल्ह्यात मन्नेरवारलू व महादेव कोळी या जमाती अस्तित्वात नसल्याने त्यांना दिलेले बोगस अनुसूचित जमातीचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द करावे आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. या मोर्चात मूळ आदिवासी पारंपरिक वेशात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्याचबरोबर आदिवासी सांस्कृतिक कलापथके सहभागी झाले होते.मोर्चादरम्यान या कलापथकाने आदिवासींच्या समस्या जनतेपुढे ठेवल्या. नामसदृश्यतेचा फायदा घेऊन राज्यात बोगस आदिवासींनी मूळ आदिवासींच्या अनेक योजनांचा फायदा घेतला आहे. त्यात आता राज्य सरकारने मंत्रीमंडळाच्या ३ आॅक्टोबर २०१७ रोजी झालेल्या बैठकीत जात वैधतेबाबतचे पत्र असलेल्या व्यक्तीच्या सर्व कुटुंबियांना तो पुरावा म्हणून तो ग्राह्य धरण्याचे आदेश दिले आहेत.या निर्णयाचा मोठा फटका आदिवासींना बसला आहे. हा निर्णय अनुसूचित जमातींना लागू करु,नये अशी मागणी मोर्चेकºयांनी केली.राज्य शासनाने स्थापन केलेल्या विशेष तपासणी समितीवरही यावेळी टीका करण्यात आली. ही समिती केवळ वेळकाढू धोरणासाठी स्थापन करण्यात आल्याचे म्हटले आहे. या मोर्चात सखाराम वाकोडे, प्रा. किशन मिरासे, प्रा. किशन फोले, डॉ. शेकोबा ढोले, डॉ. बळीराम भुरके, शेषराव कोवे, प्रा. विजय खुपसे, डॉ. हनुमंत रिठ्ठे, राम मिरासे,रत्नाकर बुरकुल आदींचा सहभाग होता.