शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

अतिरिक्त गावांमुळे ग्रामसेवकांवर ताण !

By admin | Updated: July 1, 2014 01:03 IST

विठ्ठल कटके , रेणापूर रेणापूर तालुक्यात ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवकांची चार पदे रिक्त असून, एकेका ग्रामसेवकाला तीन-तीन गावांचा पदभार दिल्यामुळे त्यांच्यावर कामाचा अतिरिक्त ताण पडत आहे.

विठ्ठल कटके , रेणापूररेणापूर तालुक्यात ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवकांची चार पदे रिक्त असून, एकेका ग्रामसेवकाला तीन-तीन गावांचा पदभार दिल्यामुळे त्यांच्यावर कामाचा अतिरिक्त ताण पडत आहे. तर काही ग्रामसेवक दहा-दहा वर्षांपासून नेमणुकीच्या ठिकाणीच कार्यरत आहेत.रेणापूर तालुक्यात एकूण ६६ ग्रामपंचायती असून, ४२ सज्जे आहेत. रेणापूर, पोहरेगाव, कोष्टगाव, कारेपूर या ठिकाणी ग्रामविकास अधिकारी तर उर्वरित ग्रामपंचायतींवर ग्रामसेवक ग्रामपंचायतींचे दैनंदिन काम पाहतात. एकूण ३६ ग्रामसेवक सहा ग्रामविकास अधिकाऱ्यांमध्ये २२ पुरुष तर ११ महिला कर्मचारी आहेत. ६६ ग्रामपंचायतीला ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवकांची ६६ पदे असणे गरजेचे असताना केवळ ४२ कार्यरत आहेत. एक ग्रामविकास अधिकारी व तीन ग्रामसेवकांची पदे रिक्त आहेत. ३३ ग्रामसेवकांना दोन ते तीन गावांचा कारभार सांभाळावा लागतो. जर एखादा ग्रामसेवक रजेवर गेला, तर त्याही गावाचा कारभार अतिरिक्त दिला जातो. त्यामुळे कोणत्या ग्रामपंचायतीकडे कधी हजर रहायचे, यासाठी त्या ग्रामसेवकाला वार ठरवून घ्यावा लागतो. त्यामुळे गावातील दैनंदिन कामांना पर्यायाने दिरंगाई होते. एखाद्या व्यक्तीला एखाद्या प्रमाणपत्राची तातडीची गरज असेल, तेव्हा त्यांची मोठी अडचण होते. ठरलेल्या दिवसाची प्रतीक्षाच नागरिकांना करावी लागते. शिवाय, दोन-तीन गावांचा एका कर्मचाऱ्यावर अतिरिक्त भार पडल्यामुळे तो कर्मचारी त्रासून जातो. त्याने कोणत्या गावी वास्तव्य करावे, हाही त्याच्यासमोर प्रश्न उभा असतो.सेवाज्येष्ठतेचा नियम शिथिल करा...निवाडा-आंदलगावचे ग्रामसेवक ए.सी. उस्तुर्गे यांच्याकडे २२ डिसेंबर २००४ पासून याच गावचा पदभार आहे. त्यांच्याबाबत ग्रामस्थांकडून अनेक तक्रारी असतानाही त्यांची बदली होत नाही. तर दिवेगाव, माकेगाव, नरवटवाडीचे एस.ए. पवार, रामवाडीचे एस.व्ही. गुडे, तळणीचे राठोड हे ग्रामसेवकही आठ-आठ वर्षांपासून त्याच ठिकाणी कार्यरत आहेत. त्यांनी जर विनंती अर्ज केला तरच त्यांची बदली होते, असे समजते. सेवाज्येष्ठता नियम बदलीसाठी आड येतो, असे सांगण्यात येते. त्यामुळे हा नियम शिथिल करावा, अशी मागणी सरपंचांकडून केली जात आहे.