शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा विश्वासू मित्र देश रशिया करणार पाकिस्तानची मदत?; JF 17 लढाऊ विमानाला पुरवणार इंजिन
2
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
3
या राज्यात ५० किमी वेगाने वारे वाहतील, मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा इशारा
4
देशातील राष्ट्रीय चलनातून चार शून्य हटवले जाणार; इराणचा ऐतिहासिक निर्णय, काय होणार बदल?
5
त्यानं स्वतःच कापला प्रायव्हेट पार्ट अन् रचला हल्ल्याचा बनाव! पोलिसांना गोंधळात टाकणारा प्रकरणाचा 'असा' झाला खुलासा
6
आजचे राशीभविष्य- ६ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस आनंददायी, नोकरी व्यवसायात फायदाच फायदा!
7
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
8
उपचारांवरचा खर्च नाकारणे म्हणजेच हक्काचे उल्लंघन; केरळ हायकोर्टाने एलआयसीला सुनावले
9
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
10
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
11
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
12
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
13
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
14
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
15
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
16
खोकल्याच्या औषधात होते विषारी रसायन; महाराष्ट्रासह सहा राज्यांत सीडीएससीओची तपासणी
17
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
18
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
19
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
20
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत

ग्रामसभा म्हणजे विरोधकांचा आखाडा

By admin | Updated: January 17, 2016 00:05 IST

औरंगाबाद : ग्रामसभा म्हणजे विरोधकांचा आखाडा झाला आहे. गावातील काही टगेखोरांना हाताशी धरून विरोधकांमार्फत ग्रामसभा उधळून लावण्याचे प्रयत्न होतात.

औरंगाबाद : ग्रामसभा म्हणजे विरोधकांचा आखाडा झाला आहे. गावातील काही टगेखोरांना हाताशी धरून विरोधकांमार्फत ग्रामसभा उधळून लावण्याचे प्रयत्न होतात. अनेक ठिकाणी तर सरपंच आणि गावपुढारी हे ग्रामसभेत झालेले ठराव बदलून नंतर मर्जीप्रमाणे निर्णय घेतात. मग, अशा ग्रामसभांचा उपयोग काय, असा सूर जिल्हा परिषद पंचायत विभागाच्या वतीने आयोजित वादविवाद स्पर्धेत उमटला. जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाने शनिवारी ‘जागतिकीकरणाच्या युगात ग्रामसभेची आवश्यकता?’ या विषयावर वादविवाद स्पर्धा घेतली. या स्पर्धेत प्रत्येक तालुक्यातील दोन, अशा एकूण २२ सरपंच आणि ग्रामसेवकांनी सहभाग घेतला. यामध्ये महिला सरपंच वर्षा जाधव यांनीदेखील अंतर्मुख करणारे मनोगत व्यक्त केले. या स्पर्धेत वैजापूर तालुक्याला प्रथम पारितोषिक मिळाले. वादविवाद स्पर्धेनंतर आयोजित कार्यशाळेत उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांनी ‘ग्रामपंचायतींची आयएसओ’कडे वाटचाल’, नवीन करप्रणाली लागू करण्याचा फॉर्म्युला’ आणि ‘चौदावा वित्त आयोग’ यासंदर्भात प्रेझेंटेशनद्वारे माहिती सादर केली.