शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामसभा म्हणजे विरोधकांचा आखाडा

By admin | Updated: January 17, 2016 00:05 IST

औरंगाबाद : ग्रामसभा म्हणजे विरोधकांचा आखाडा झाला आहे. गावातील काही टगेखोरांना हाताशी धरून विरोधकांमार्फत ग्रामसभा उधळून लावण्याचे प्रयत्न होतात.

औरंगाबाद : ग्रामसभा म्हणजे विरोधकांचा आखाडा झाला आहे. गावातील काही टगेखोरांना हाताशी धरून विरोधकांमार्फत ग्रामसभा उधळून लावण्याचे प्रयत्न होतात. अनेक ठिकाणी तर सरपंच आणि गावपुढारी हे ग्रामसभेत झालेले ठराव बदलून नंतर मर्जीप्रमाणे निर्णय घेतात. मग, अशा ग्रामसभांचा उपयोग काय, असा सूर जिल्हा परिषद पंचायत विभागाच्या वतीने आयोजित वादविवाद स्पर्धेत उमटला. जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाने शनिवारी ‘जागतिकीकरणाच्या युगात ग्रामसभेची आवश्यकता?’ या विषयावर वादविवाद स्पर्धा घेतली. या स्पर्धेत प्रत्येक तालुक्यातील दोन, अशा एकूण २२ सरपंच आणि ग्रामसेवकांनी सहभाग घेतला. यामध्ये महिला सरपंच वर्षा जाधव यांनीदेखील अंतर्मुख करणारे मनोगत व्यक्त केले. या स्पर्धेत वैजापूर तालुक्याला प्रथम पारितोषिक मिळाले. वादविवाद स्पर्धेनंतर आयोजित कार्यशाळेत उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांनी ‘ग्रामपंचायतींची आयएसओ’कडे वाटचाल’, नवीन करप्रणाली लागू करण्याचा फॉर्म्युला’ आणि ‘चौदावा वित्त आयोग’ यासंदर्भात प्रेझेंटेशनद्वारे माहिती सादर केली.