शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

ग्रा.पं.कर्मचा-यांची परवड थांबणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 00:54 IST

वाळूज महानगर : आठ महिन्यांपासून विनावेतन काम करणाºया ग्रामपंचायत कर्मचा-यांच्या किमान वेतनासाठी शासनाकडून जिल्हा परिषदेला सव्वातीन कोटींचे अनुदान प्राप्त झाले आहे. किमान वेतनासाठी अनुदान मिळाल्यामुळे ग्रामपंचायत कर्मचा-यांची परवड थांबणार आहे.

शेख महेमूद ।लोकमत न्यूज नेटवर्कवाळूज महानगर : आठ महिन्यांपासून विनावेतन काम करणाºया ग्रामपंचायत कर्मचा-यांच्या किमान वेतनासाठी शासनाकडून जिल्हा परिषदेला सव्वातीन कोटींचे अनुदान प्राप्त झाले आहे. किमान वेतनासाठी अनुदान मिळाल्यामुळे ग्रामपंचायत कर्मचा-यांची परवड थांबणारआहे.शासनाकडून ग्रामपंचायतीच्या कर्मचाºयांना किमान वेतनासाठी ग्रामपंचायतीला अनुदान देण्यात येते; मात्र अनुदानाची रक्कम ग्रामपंचायतींना वेळेवर मिळत नसल्यामुळे गावात पाणीपुरवठा, स्वच्छता, साफ-सफाई व कार्यालयीन कामकाज करणाºया हजारो कर्मचाºयांना दरमहा नियमितपणे वेतन मिळत नाही. काम करूनही प्रत्येक महिन्यात वेतन मिळत नसल्यामुळे कर्मचाºयांना उधारी-उसनवारी करून कुटुंबाची गुजराण करावी लागतआहे.महागाई दिवसेंदिवस वाढतच चालली असून, वेतन मिळत नसल्यामुळे कुटुंबाचे पालन-पोषण करताना ग्रामपंचायत कर्मचा-यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. वेतन अदा करण्यात यावे, यासाठी ग्रामपंचायतीकडे सतत पाठपुरावा करूनही अनुदान प्राप्त झाले नसल्याचे कारण दाखवून या कर्मचाºयांना ग्रामसेवक, सरपंच व पदाधिकारी वेतन देण्यास नकार देत असल्याचे कर्मचाºयांचे म्हणणे आहे. वाळूज परिसरातील आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या रांजणगाव, जोगेश्वरी, घाणेगाव, वाळूज आदी मोजक्याच ग्रामपंचायती कर्मचाºयांना दरमहा वेतन अदा करीत असतात. या सक्षम ग्रामपंचायती व काही मोठ्या ग्रामपंचायतींचा अपवाद वगळता जिल्ह्यातील लहान-सहान ग्रामपंचायतींच्या कर्मचाºयांना वेतनासाठी महिनोन्महिने प्रतीक्षा करावी लागत असते. थकीत वेतनासाठी कर्मचाºयांनी आंदोलनाचे हत्यार उपसल्यानंतर काही ग्रामपंचायती ग्रामनिधीतून कर्मचाºयांना काही प्रमाणात वेतन अदा करीत असतात.ग्रामपंचायत कर्मचाºयांना दरमहा नियमितपणे वेतन अदा करण्यात यावे, यासाठी  राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष गणेश गायके, ताजू मुल्ला, अशोक पाटेकर, उमेश जाधव, नाना इंगळे, अशोक दिवेकर, माणिक शेजूळ, गजानन फरकाडे आदींचा प्रशासनाकडे सतत पाठपुरावा सुरू आहे. आता अनुदान प्राप्त झाल्यामुळे कर्मचाºयांचे थकीत वेतन देण्यात यावे, अन्यथा संबंधित ग्रामपंचायतींच्या ग्रामविकास अधिकारी व सरपंचांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा संघटनेचे राज्य उपाध्यक्ष गणेश गायके व पदाधिका-यांनी दिला आहे.