शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतच्या सदस्यांनी भरविला जनता दरबार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:05 IST

केऱ्हाळा : या आगोदर आपण मंत्री, आमदार, खासदार यांनी आपल्या मतदार संघातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी जनता दरबार ...

केऱ्हाळा : या आगोदर आपण मंत्री, आमदार, खासदार यांनी आपल्या मतदार संघातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी जनता दरबार आयोजित केलेला पाहिलेला आहे. किंबहूना हा आता शिरस्ताच पडला आहे; मात्र ग्रामपंचायत स्तरावर असा प्रयोग कोणी केल्याचे ऐकीवात नाही; पण सिल्लोड तालुक्यातील केऱ्हाळा या गावातील विरोधी बाकावर बसलेल्या तीन ग्रामपंचायत सदस्यांनी जनता दरबार आयोजित करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.

तेरा सदस्य असलेल्या केऱ्हाळा ग्रामपंचायतमध्ये शिवसेना पुरस्कृत शिवशाही पॅनलचे दहा सदस्य निवडून आले आहेत. तर विरोधी संत गाडगेबाबा ग्रामविकास पॅनलचे तीन सदस्य निवडून आले आहेत. सरपंच, उपसरपंच पदाच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या असून, यात सविता कुडके या सरपंचपदी तर उपसरपंचपदी बिनाबी पठाण विराजमान झाल्या आहेत. निवडणुका होत नाहीत, तर विरोधी बाकावर असलेल्या सदस्यांनी सत्ताधाऱ्यांना घेरण्याचे मनसुबे आखायला सुरुवात केली आहे. नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी विरोधी बाकावरील साहेबराव बांबर्डे, सूर्यभान बन्सोड, शिवनंदा भिंगारे या सदस्यांनी सोमवारी गावात जनता दरबारचे आयोजन केले होते. यावेळी गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने या जनता दरबारमध्ये हजेरी लावून आपल्या समस्यांचा पाढा वाचला. नागरिकांनी मांडलेल्या या समस्या १९ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या ग्रामपंचायतच्या मिटिंगमध्ये मांडणार असल्याचे या सदस्यांनी सांगितले. दर तीन महिन्यांनी हा जनता दरबार आयोजित केला जाणार आहे. या उपक्रमामुळे सत्ताधारी पक्षात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

कोट नागरिकांच्या समस्याचे ऑडिट करणार

गावातील नागरिकांनी मांडलेल्या समस्यांचे ऑडिट दरवर्षी करून त्यापैकी किती समस्यांना न्याय दिला, हे दरवर्षी नागरिकांसमोर लेखी मांडणार आहे. यामुळे नागरिकांच्या समस्या मिटण्यास मदत होईल.-साहेबराव बांबर्डे, ग्रा. पं.सदस्य, केऱ्हाळा.

कोट

अनेक सदस्यांना अधिकाराची माहितीच नाही

अनेक ग्रामपंचायत सदस्यांना घटनेने आपल्याला काय अधिकार दिला, याची माहितीच नाही. प्रोसेडिंगला सही करा म्हटले की, सही करतात. काय काम करताहेत, काय करायचं, हे काम का होत नाही, हे करावंच लागेल, असे प्रश्न कोणीच विचारत नाहीत. परिणामी, नागरिकांच्या समस्यांना न्याय मिळत नाही व गावचाही विकास होत नाही.

-सूर्यभान बन्सोड, ग्रामपंचायत सदस्य

फोटो : केऱ्हाळा येथील पहिल्याच जनता दरबारात ग्रामपंचायत सदस्यांसमोर आपल्या समस्यांचा पाढा वाचताना महिला व नागरिक.

150221\20210215_091419_1.jpg

केऱ्हाळा येथील पहिल्याच जनता दरबारात ग्रामपंचायत सदस्यांसमोर आपल्या समस्यांचा पाढा वाचताना महिला व नागरिक.