शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
4
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
5
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
6
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
7
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
8
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
9
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
10
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
11
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
12
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
13
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
15
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
16
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
17
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
18
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
19
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
20
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

पदवीधर पदस्थापनेची प्रक्रिया नव्याने होणार

By admin | Updated: July 23, 2014 00:20 IST

हिंगोली : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांना प्राथमिक पदवीधरची पदस्थापना देण्यासंदर्भात निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर ही प्रक्रिया आता संपूर्णपणे नव्याने करण्याचा निर्णय

हिंगोली : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांना प्राथमिक पदवीधरची पदस्थापना देण्यासंदर्भात निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर ही प्रक्रिया आता संपूर्णपणे नव्याने करण्याचा निर्णय जिल्हा परिषद प्रशासनाने घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. जिल्ह्यातील १८७ जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांना प्राथमिक पदवीधरची पदस्थापना देण्याचा निर्णय प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला होता. यासंदर्भात तालुकास्तरावरून प्रस्ताव मागविण्यात आले. त्यानुसार पदवीसह बीएडची पदवी मिळविलेल्या शिक्षकांना संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यावेळी आठ दिवसांपूर्वीच बीएडचा निकाल लागलेल्या मुक्त विद्यापीठाच्या शिक्षकांनाही या प्रक्रियेत संधी हवी होती. याच पार्श्वभूमीवर प्रत्येक तालुक्यातील गटशिक्षणाधिकारीच जि.प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे अधिकार वापरून तालुकास्तरावरच शिक्षकांना पदस्थापना देत असल्याचे व यामुळे घोडाबाजार वाढल्याचे वृत्त २२ जुलै रोजी ‘लोकमत’ ने प्रसिद्ध केले. याच विषयावर मंगळवारी सकाळी शिक्षण आयुक्तांनी राज्यातील सर्व जि. प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची व्हीडिओ कॉन्फरंस घेतली. त्यामध्ये यासंदर्भात वेगवेगळ्या सूचना देण्यात आल्या. संपूर्ण राज्यस्तरावर ही प्रक्रिया एकाच पद्धतीने व्हावी, असा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर जिल्ह्यात यापूर्वी सुरू करण्यात आलेली पदवीधर पदस्थापनेची प्रक्रिया स्थगित करण्याचा निर्णय जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी पी.व्ही.बनसोडे यांनी घेतला आहे. आता ही संपूर्ण प्रक्रियाच आता नव्याने पार पाडली जाणार आहे. त्यासाठी राज्यस्तरावरून सूचना येणार आहेत. त्यानंतरच प्राथमिक पदवीधर शिक्षकांना पदस्थापना देण्यात येणार आहे. त्यामुळे या प्रक्रियेला आता वेळ लागण्याची शक्यता आहे.आता पदवीधारकांनाही संधीयापूर्वीच्या प्रक्रियेत पदवीनंतर बीएड उत्तीर्ण असलेल्या शिक्षकांना पदवीधरची पदस्थापना देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता मात्र या निर्णयामध्ये लवचिकता येण्याची शक्यता आहे. त्यामुळे फक्त पदवी मिळविलेल्या शिक्षकांनाही आता पदवीधरची पदस्थापना मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा शिक्षकांची संख्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आहे. परिणामी या शिक्षकांमधून पदवीधरची पदस्थापना देण्याकरीता गुणवत्तापूर्व शिक्षकांची परीक्षेद्वारे निवड करण्याची संधी जिल्हा परिषदेकडे आहे. त्यामुळे आता परीक्षेद्वारेच पदोन्नतीसाठी शिक्षकांची निवड करावी, अशी अपेक्षा सर्वसामान्यांमधून व्यक्त होत आहे. कळमनुरीत १५ जणांचे आक्षेपकळमनुरी तालुक्यातील ४९ पदवीधर शिक्षकांना पदस्थापना देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यापैकी मंगळवारी सायंकाळी ४ वाजेपर्यंत १५ जणांनी आक्षेप नोंदविले आहे. याबाबतचा अहवाल वरिष्ठांकडे पाठविण्यात येणार असल्याचे शिक्षण विस्तार अधिकारी एस.बी. सोनुने यांनी सांगितले.