शहरं
Join us  
Trending Stories
1
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
2
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
3
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
4
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?
5
३ वर्षात १ लाखाचे झाले १५ लाखांपेक्षा अधिक, ६ महिन्यांत १८०% नं वधारला स्टॉक
6
"हे विजयाचं परिमाण असू शकत नाही, भारताने...!"; भारत-पाकिस्तान सामन्यासंदर्भात काय म्हणाले ओवेसी?
7
एकीकडे 'घरवाली' दुसरीकडे 'बाहेरवाली'; दोघींसोबत आनंदाने जगत होता तरुण अन् एक दिवस असं काही झालं... 
8
पितृपक्ष इंदिरा एकादशी २०२५: १० राशींवर श्रीहरी प्रसन्न, शिव-गौरी-लक्ष्मी कृपा; शुभ-लाभ-पैसा!
9
'क्रिस्टल ब्लॅक पर्ल' रंगात होंडा अमेझ भारतात लॉन्च; नव्या लूकमध्ये दिसते आणखी धासू!
10
बीचवर फिरायला गेलेल्या तरुणीवर बॉयफ्रेंडसमोरच सामूहिक बलात्कार; पोलिसांनी आरोपी कसे शोधले?
11
महाराष्ट्रात ७९ ठिकाणी शेतकरी भवन उभारणार; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
12
आयटी इंजिनिअरने १० टक्के पगारवाढ मागितली, नोकरी गमावली; मग त्याला काढणाऱ्याचीही गेली...
13
भारत आणि चीनचं टेन्शन वाढवणार युरोपियन युनियन! अमेरिकेच्या समोर झुकलं का EU?
14
'ओझेम्पिक टीथ' म्हणजे काय? वजन कमी करण्याच्या औषधाचा होतोय 'असा' दुष्परिणाम
15
Nupur Bora: नुपूर बोरा आहे तरी कोण? सहा वर्षात अनेक गैरव्यवहार, घरातही सापडलं मोठं घबाड!
16
निष्पाप लेकरावर दयाही आली नाही! ७ वर्षांच्या मुलीला तिसऱ्या मजल्यावरून फेकलं, सावत्र आईचा गुन्हा 'असा' झाला उघड
17
6G क्षेत्रात भारताची मोठी झेप, IIT हैदराबादने विकसित केले प्रोटोटाइप; 2030 पर्यंत लॉन्च होणार
18
दही, दूध, लोणी घागर भरूनी...! सर्व स्वस्त झाले, या मोठ्या डेअरीने GST कपातीपूर्वीच घोषणा केली
19
बंगल्याचा हव्यास, गोविंद बरगेंचा छळ; पूजा गायकवाडचा तुरुंगातील मुक्काम वाढला
20
ITR भरण्यासाठी उरले शेवटचे काही तास! आयकर विभागाकडून करदात्यांसाठी ६ टिप्स

पदवीधर पदस्थापनेची प्रक्रिया नव्याने होणार

By admin | Updated: July 23, 2014 00:20 IST

हिंगोली : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांना प्राथमिक पदवीधरची पदस्थापना देण्यासंदर्भात निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर ही प्रक्रिया आता संपूर्णपणे नव्याने करण्याचा निर्णय

हिंगोली : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांना प्राथमिक पदवीधरची पदस्थापना देण्यासंदर्भात निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर ही प्रक्रिया आता संपूर्णपणे नव्याने करण्याचा निर्णय जिल्हा परिषद प्रशासनाने घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. जिल्ह्यातील १८७ जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांना प्राथमिक पदवीधरची पदस्थापना देण्याचा निर्णय प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला होता. यासंदर्भात तालुकास्तरावरून प्रस्ताव मागविण्यात आले. त्यानुसार पदवीसह बीएडची पदवी मिळविलेल्या शिक्षकांना संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यावेळी आठ दिवसांपूर्वीच बीएडचा निकाल लागलेल्या मुक्त विद्यापीठाच्या शिक्षकांनाही या प्रक्रियेत संधी हवी होती. याच पार्श्वभूमीवर प्रत्येक तालुक्यातील गटशिक्षणाधिकारीच जि.प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे अधिकार वापरून तालुकास्तरावरच शिक्षकांना पदस्थापना देत असल्याचे व यामुळे घोडाबाजार वाढल्याचे वृत्त २२ जुलै रोजी ‘लोकमत’ ने प्रसिद्ध केले. याच विषयावर मंगळवारी सकाळी शिक्षण आयुक्तांनी राज्यातील सर्व जि. प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची व्हीडिओ कॉन्फरंस घेतली. त्यामध्ये यासंदर्भात वेगवेगळ्या सूचना देण्यात आल्या. संपूर्ण राज्यस्तरावर ही प्रक्रिया एकाच पद्धतीने व्हावी, असा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर जिल्ह्यात यापूर्वी सुरू करण्यात आलेली पदवीधर पदस्थापनेची प्रक्रिया स्थगित करण्याचा निर्णय जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी पी.व्ही.बनसोडे यांनी घेतला आहे. आता ही संपूर्ण प्रक्रियाच आता नव्याने पार पाडली जाणार आहे. त्यासाठी राज्यस्तरावरून सूचना येणार आहेत. त्यानंतरच प्राथमिक पदवीधर शिक्षकांना पदस्थापना देण्यात येणार आहे. त्यामुळे या प्रक्रियेला आता वेळ लागण्याची शक्यता आहे.आता पदवीधारकांनाही संधीयापूर्वीच्या प्रक्रियेत पदवीनंतर बीएड उत्तीर्ण असलेल्या शिक्षकांना पदवीधरची पदस्थापना देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता मात्र या निर्णयामध्ये लवचिकता येण्याची शक्यता आहे. त्यामुळे फक्त पदवी मिळविलेल्या शिक्षकांनाही आता पदवीधरची पदस्थापना मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा शिक्षकांची संख्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आहे. परिणामी या शिक्षकांमधून पदवीधरची पदस्थापना देण्याकरीता गुणवत्तापूर्व शिक्षकांची परीक्षेद्वारे निवड करण्याची संधी जिल्हा परिषदेकडे आहे. त्यामुळे आता परीक्षेद्वारेच पदोन्नतीसाठी शिक्षकांची निवड करावी, अशी अपेक्षा सर्वसामान्यांमधून व्यक्त होत आहे. कळमनुरीत १५ जणांचे आक्षेपकळमनुरी तालुक्यातील ४९ पदवीधर शिक्षकांना पदस्थापना देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यापैकी मंगळवारी सायंकाळी ४ वाजेपर्यंत १५ जणांनी आक्षेप नोंदविले आहे. याबाबतचा अहवाल वरिष्ठांकडे पाठविण्यात येणार असल्याचे शिक्षण विस्तार अधिकारी एस.बी. सोनुने यांनी सांगितले.