शहरं
Join us  
Trending Stories
1
पीक नुकसानभरपाईच्या मदत रकमेत आता कपात; तीनऐवजी दोन हेक्टरपर्यंतच मिळणार मदत
2
आजचे राशीभविष्य: शनिवार 31 मे 2025; खर्चाचे प्रमाण वाढेल, एखाद्या स्त्रीमुळे त्रास होऊ शकतो
3
युद्धनौका, पाणबुड्यांची नावे, ठावठिकाणा वर्माने पाकला पुरवला; कोठडीत रवानगी
4
दुनिया हिला देंगे हम! MI नं 'बेबी ओव्हर'सह GT चा खेळ खल्लास करत मिळवलं क्वालिफायर २ चं तिकीट
5
गेट लॉस्ट, मि. मस्क! दुसऱ्याच्या पदच्युतीसाठी किमान चार वर्षे लागतील
6
गाळ टाकण्याच्या जागेतही हेराफेरी; लॉगशीटवर गुंदवली, माल उतरवला दिवे गावात!
7
विलीनीकरणाचा कोणताही प्रस्ताव आमच्याकडे नाही; राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा. तटकरे यांचे स्पष्टीकरण
8
तुर्की एअरलाइन्ससोबतचा करार रद्द करा, भारत सरकारने इंडिगोला निर्देश दिले
9
'केईएम'मध्ये पुन्हा पाणी साचायला नको, उपाययोजनांसह प्रतिज्ञापत्र सादर करा : हायकोर्ट
10
मामांचे पितळ उघडे पडले! शंशाक, सुशीलला दिलेल्या शस्त्र परवान्यावर सुपेकरांची सही
11
राज्यात साडेएकवीस हजार शासकीय वाहने भंगारात; अपघातांसह प्रदूषणास बसेल आळा
12
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान एकाकी पडला; तालिबानशी संबंध सुधारण्याची घोषणा
13
आधी कॅच घेताना गडबडला; बॅटिंग करताना Hit Wicket झाला! मग नेटकऱ्यांमध्ये रंगली मॅच 'फिक्सिंग'ची चर्चा
14
"राज्यपातळीवरुन 'गोकुळ'च्या राजकारणात हस्तक्षेप झाला नाही..."; सतेज पाटलांनी स्पष्टच सांगितलं
15
MI vs GT : हार्दिक पांड्याची कडक फटकेबाजी; त्याच्या षटकारानंतर लक्षवेधी ठरली ही सुंदरी (VIDEO)
16
रेल्वेकडून धाराशिवचे नामांतर फायनल, दोन स्थानके निर्णयाधिन;अहिल्यानगर आणि छ. संभाजीनगरला प्रतिक्षा : रेल्वे बोर्डाकडून होणार निर्णय
17
Maharashtra Politics : पक्षात कोण नाराज आहे का? जयंत पाटलांनी दिलं उत्तर; चर्चांना दिला पूर्णविराम
18
IPL 2025 Eliminator : हिटमॅन रोहितनं खास 'ट्रिपल सेंच्युरी'सह रचला इतिहास; जाणून घ्या त्याचा रेकॉर्ड
19
वैष्णवीचे चारित्र्यहनन पूर्णपणे चुकीचे; वकिलांनी बोलताना भान बाळगणे गरजेचे, आयोगाची सूचना
20
KCR कुटुंबात घमासान BRS चा उत्तराधिकारी कोण; केटीआर की के. कविता कुणाला मिळणार कमान?

काम न करता रक्कम हडप !

By admin | Updated: July 21, 2014 00:23 IST

आशपाक पठाण , लातूर रमाई आवास योजना व इंदिरा आवास योजनेत लातूर तालुक्यातील ३५ लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झाले होते

आशपाक पठाण , लातूररमाई आवास योजना व इंदिरा आवास योजनेत लातूर तालुक्यातील ३५ लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झाले होते. त्यानंतर या लाभार्थ्यांना पहिला हप्ता देण्यात आला होता. मात्र या लाभार्थ्यांनी कामच केले नाही. पंचायत समितीकडून वारंवार सूचना, पत्रव्यवहार करूनही संबंधित लाभार्थ्यांनी काम सुरू केले नसल्यामुळे आता या लाभार्थ्यांची यादी संबंधित पोलिस ठाण्यांकडे देण्यात आली असून, त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.२००६ ते २०१३ या दरम्यान मंजूर झालेल्या इंदिरा आवास योजना व रमाई आवास योजनेतील २०३ लाभार्थ्यांनी बांधकाम केले. परंतु, शौचालय बांधले नसल्यामुळे त्यांचा शेवटचा हप्ता थकित होता. शौचालय बांधून घेऊन काम पूर्ण करावे, अशा सूचना करुनही बहुतांश लाभार्थ्यांनी आजपर्यंत शौचालयाचे काम सुरू केले नाही. त्यामुळे आहे त्या परिस्थितीत संबंधितांचे काम पूर्ण करून अहवाल सादर करावा, अशा सूचना लातूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी धन्वंतकुमार माळी यांनी सहाय्यक अभियंत्यांना दिल्या आहेत. पैसे उचलले; काम नाही..!लातूर तालुक्यातील २००९-१० मध्ये ५ घरकुल लाभार्थ्यांनी पहिला अग्रीम हप्ता उचलला. परंतु, अद्यापही कामाला सुरुवात केली नाही. तसेच २०१०-११ मध्ये ११, २०११-१२ मध्ये ११, २०१२-१३ मध्ये १० व २०१३-१४ मध्ये २४ जणांनी रमाई आवास योजना व इंदिरा आवास योजनेतील घरकुलाचा पहिला हप्ता उचलला. यातील ६१ लाभार्थ्यांपैकी २६ जणांनी काम सुरू केले आहे. मात्र ३५ लाभार्थ्यांनी अद्यापही कामाला सुरुवात केलेली नाही. प्रशासनाकडून वारंवार योग्य त्या सूचना करूनही त्यांनी काम न करताच रक्कम हडप केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.अभियंत्यांना सूचना...लातूर तालुक्यातील ‘त्या’ ३५ लाभार्थ्यांची यादी गातेगाव, मुरुड, एमआयडीसी पोलिस ठाण्यांकडे सोपविण्यात आली आहे. ठाण्याअंतर्गत असलेल्या लाभार्थ्यांवर आता कडक कारवाई होणार आहे. त्याचबरोबर पंचायत समितीच्या बांधकाम विभागाच्या सहाय्यक अभियंत्यांनाही लाभार्थ्यांवर कारवाई करण्याचे आदेश बजावण्यात आले असल्याचे गटविकास अधिकारी धन्वंतकुमार माळी यांनी सांगितले आहे.२०३ जणांनी शौचालय बांधले नाही...२००६-०७ मध्ये घरकुल मंजूर झालेल्या १३ जणांनी बांधकाम केले. परंतु, शौचालय बांधले नाही. तसेच २००७-०८ मध्ये २७, २००८-०९ मध्ये ५३, २००९-१० मध्ये १४, २०१०-११ मध्ये ११, २०११-१२ मध्ये ३० व २०१३-१४ मध्ये ५५ लाभार्थ्यांनी शौचालय बांधले नव्हते. या प्रकरणी ११ मे रोजी गटविकास अधिकाऱ्यांनी संबंधित लाभार्थ्यांना नोटीस बजावली होती. त्यानुसार यातील ६३ जणांनी शौचालयाचे काम केले आहे. काही जणांचे पूर्णत्वास आहे. ज्यांनी बांधकामच केले नाही, त्यांचे आहे त्या परिस्थितीत काम पूर्ण करून अहवाल सादर केला जाणार आहे. त्यामुळे त्यांना उर्वरित हप्ता दिला जाणार नाही.