शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
4
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
5
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
6
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
7
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
8
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
9
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
10
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
11
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
12
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
13
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
14
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
15
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
16
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
17
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
18
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
19
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
20
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई

शिष्यवृत्ती परीक्षेचे शुल्क भरणार जि.प.

By admin | Updated: July 6, 2016 00:17 IST

औरंंंगाबाद : जिल्हा परिषदेच्या शाळांमधील इयत्ता ५ वी तसेच ८ वीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षा अनिवार्य करण्यात येणार आहे.

औरंंंगाबाद : जिल्हा परिषदेच्या शाळांमधील इयत्ता ५ वी तसेच ८ वीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षा अनिवार्य करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील बहुतांशी कुटुंबांची हलाखीची परिस्थिती असल्यामुळे त्यांना परीक्षा शुल्क अदा करणे परवडत नाही. परिणामी, अनेक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसारख्या परीक्षेपासून वंचित राहावे लागते. त्यासाठी यंदा जिल्हा परिषदेने शिष्यवृत्ती परीक्षेचे शुल्क भरण्याची जबाबदारी स्वीकारली असून त्यासाठी उपकरात २५ लाख रुपयांची तरतूद केली आहे.यासंदर्भात शिक्षणाधिकारी आर. एस. मोगल यांनी सांगितले की, दरवर्षी काही ठराविक विद्यार्थीच शिष्यवृत्ती परीक्षा देतात. मात्र, ज्याची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. ते विद्यार्थी हुशार असतानादेखील शिष्यवृत्तीसारख्या परीक्षेला बसू शकत नाहीत. विद्यार्थ्यांमध्ये अवांतर क्षमता विकसित झाल्या पाहिजेत, यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने इयत्ता ५ वी आणि ८ वीच्या सर्वच विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षा अनिवार्य करण्याचे ठरविले आहे. यासाठी पालकांना परीक्षा शुल्कासारखा भुर्दंड बसणार नाही. शिष्यवृत्ती परीक्षेचे शुल्क भरता यावे, यासाठी जिल्हा परिषदेने उपकरामध्ये २५ लाखांची यासाठी तरतूद केली आहे. जिल्ह्यात जवळपास ७५ हजार विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे. शिष्यवृत्ती परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी प्रतिविद्यार्थी ६० रुपये एवढा खर्च येतो. शिष्यवृत्ती परीक्षा शुल्क भरण्याचा प्रयोग नाशिक जिल्हा परिषदेनंतर औरंगाबाद जिल्हा परिषदेमध्ये राबविण्यात येणार आहे. मार्च २०१७ पर्यंत जिल्ह्यातील सर्व जि. प. शाळा प्रगत झाल्या पाहिजे, यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. गेल्या वर्षी २०० शाळा प्रगत करण्याचे शिक्षण विभागाचे उद्दिष्ट होते. यापैकी १३६ शाळा प्रगत झाल्या आहेत. यंदा इयत्तेनुसार विद्यार्थ्यांमध्ये क्षमता विकसित झाल्या की नाही, याची दर महिन्याला शिक्षण विभागाकडून चाचणी घेऊन पडताळणी करण्यात येणार आहे. या चाचणीद्वारे पूर्ण क्षमता विकसित न होणाऱ्या विद्यार्थ्यांचा वेगळा गट निर्माण करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी आर. एस. मोगल यांनी दिली.