शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, न्याय विभागाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

शिष्यवृत्ती परीक्षेचे शुल्क भरणार जि.प.

By admin | Updated: July 6, 2016 00:17 IST

औरंंंगाबाद : जिल्हा परिषदेच्या शाळांमधील इयत्ता ५ वी तसेच ८ वीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षा अनिवार्य करण्यात येणार आहे.

औरंंंगाबाद : जिल्हा परिषदेच्या शाळांमधील इयत्ता ५ वी तसेच ८ वीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षा अनिवार्य करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील बहुतांशी कुटुंबांची हलाखीची परिस्थिती असल्यामुळे त्यांना परीक्षा शुल्क अदा करणे परवडत नाही. परिणामी, अनेक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसारख्या परीक्षेपासून वंचित राहावे लागते. त्यासाठी यंदा जिल्हा परिषदेने शिष्यवृत्ती परीक्षेचे शुल्क भरण्याची जबाबदारी स्वीकारली असून त्यासाठी उपकरात २५ लाख रुपयांची तरतूद केली आहे.यासंदर्भात शिक्षणाधिकारी आर. एस. मोगल यांनी सांगितले की, दरवर्षी काही ठराविक विद्यार्थीच शिष्यवृत्ती परीक्षा देतात. मात्र, ज्याची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. ते विद्यार्थी हुशार असतानादेखील शिष्यवृत्तीसारख्या परीक्षेला बसू शकत नाहीत. विद्यार्थ्यांमध्ये अवांतर क्षमता विकसित झाल्या पाहिजेत, यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने इयत्ता ५ वी आणि ८ वीच्या सर्वच विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षा अनिवार्य करण्याचे ठरविले आहे. यासाठी पालकांना परीक्षा शुल्कासारखा भुर्दंड बसणार नाही. शिष्यवृत्ती परीक्षेचे शुल्क भरता यावे, यासाठी जिल्हा परिषदेने उपकरामध्ये २५ लाखांची यासाठी तरतूद केली आहे. जिल्ह्यात जवळपास ७५ हजार विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे. शिष्यवृत्ती परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी प्रतिविद्यार्थी ६० रुपये एवढा खर्च येतो. शिष्यवृत्ती परीक्षा शुल्क भरण्याचा प्रयोग नाशिक जिल्हा परिषदेनंतर औरंगाबाद जिल्हा परिषदेमध्ये राबविण्यात येणार आहे. मार्च २०१७ पर्यंत जिल्ह्यातील सर्व जि. प. शाळा प्रगत झाल्या पाहिजे, यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. गेल्या वर्षी २०० शाळा प्रगत करण्याचे शिक्षण विभागाचे उद्दिष्ट होते. यापैकी १३६ शाळा प्रगत झाल्या आहेत. यंदा इयत्तेनुसार विद्यार्थ्यांमध्ये क्षमता विकसित झाल्या की नाही, याची दर महिन्याला शिक्षण विभागाकडून चाचणी घेऊन पडताळणी करण्यात येणार आहे. या चाचणीद्वारे पूर्ण क्षमता विकसित न होणाऱ्या विद्यार्थ्यांचा वेगळा गट निर्माण करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी आर. एस. मोगल यांनी दिली.