शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

जनतेचा सरकारवरील विश्वास उडत चालला -अण्णा हजारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 01:14 IST

जनतेला ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवून भाजपने सत्ता मिळविली असून, जनतेचा या सरकारवरील विश्वास उडत चालला असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सिडको वाळूज महानगरात आयोजित कार्यक्रमात केले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाळूज महानगर (औरंगाबाद) : जनतेला ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवून भाजपने सत्ता मिळविली असून, जनतेचा या सरकारवरील विश्वास उडत चालला असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सिडको वाळूज महानगरात आयोजित कार्यक्रमात केले. लोकपाल बिलाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात यावी, यासाठी फेब्रुवारी महिन्यात दिल्लीत जनांदोलन छेडण्याचा इशाराही अण्णा हजारे यांनी सोमवारी येथे दिला.सिडको वाळूज महानगरातील मनजित सोसायटीच्या वतीने आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमासाठी अण्णा हजारे आले होते. यावेळी सिडकोचे मुख्य प्रशासक ओम प्रकाश बकोरिया यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना अण्णा हजारे म्हणाले की, लोकपाल बिलाची अंमलबजावणी करण्यात यावी, यासाठी प्रदीर्घ लढा दिल्यानंतर हे बिल मंजूर करण्यात आले आहे; मात्र मंजूर करण्यात आलेले लोकपाल बिल अतिशय कमकुवत आहे. यावेळी अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही जोरदार टीका केली. भाजपच्या ‘अच्छे दिन’ घोषणेचीही त्यांनी खिल्ली उडविली. जनतेला ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवत भाजपने सत्ता मिळविली आहे. सत्तेवर येण्यापूर्वी प्रत्येक नागरिकाच्या बँक खात्यावर १५ लाख रुपये जमा करणार असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले होते; मात्र सत्ता मिळवून साडेतीन वर्षे झाली तरी अद्याप एकाही व्यक्तीच्या खात्यावर १५ रुपये जमा झाले नसल्याचे सांगत ‘कुठे गेले तुमचे अच्छे दिन’ असा सवाल अण्णांनी उपस्थित केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी अनेकदा पत्रव्यवहार करूनही त्यांनी प्रतिसाद दिला नसल्याची खंत अण्णा हजारे यांनी व्यक्त केली.