शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
2
“काँग्रेसचे पाक प्रेम उतू चाललेय, ऑपरेशन सिंदूरचा हिशोब विचारणारे देशद्रोही”: एकनाथ शिंदे
3
भारतीय बाजारात उद्याच स्वस्तातली सात सीटर कार लाँच होणार; अर्टिगा, ट्रायबरला मिळणार टक्कर...
4
स्वस्त 'पर्सनल लोन'च्या शोधात आहात? 'या' ५ बँकांमध्ये मिळतोय सर्वात कमी व्याजदर; १२ लाखांचा EMI किती?
5
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
6
PM मोदी जॉर्डन-ओमान दौऱ्यावर, तर जयशंकर इजराइलमध्ये; भारताचा जगाला स्पष्ट संदेश..!
7
मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बुरखा हटवल्याने महिला डॉक्टर धक्क्यात; सरकारी नोकरी नाकारून सोडले राज्य
8
काव्या मारननं पारखलं सोनं! अनसोल्ड खेळाडूवर लावली बोली, त्यानं ४८ चेंडूत कुटल्या ७६ धावा
9
Post Office ची जबरदस्त स्कीम... घरबसल्या दर महिन्याला होईल २० हजार रुपयांची कमाई, कोणती आहे योजना, पाहा डिटेल्स
10
बुकिंग सुरू होताच 'या' कारवर तुटून पडले लोक, 24 तासांत 70000 यूनिट बूक; खिशात हवेत फक्त ₹21000
11
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
12
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
13
...अन् त्यावेळी राष्ट्रपती बनण्याचा प्रस्ताव वाजपेयींनी नाकारला; 'अटल संस्मरण' पुस्तकात दावा
14
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
15
Video - हार्ट अटॅकमुळे वेदनेने तडफडत होता पती; पत्नीने जोडले हात, पण कोणीच केली नाही मदत
16
शेतकऱ्यांसाठी मोठा अलर्ट! फार्मर आयडीशिवाय पीएम किसानचे पैसे येणार नाहीत; अशी तयार करा ID
17
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
18
BMC ELections: मुंबईत अजित पवार पडले एकटे, राष्ट्रवादीची किती जागांवर लढण्याची तयारी, बैठकीत काय झाला निर्णय? 
19
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
Daily Top 2Weekly Top 5

शासनाकडून अचानक स्टॅम्प विक्री बंद!

By admin | Updated: February 10, 2015 00:33 IST

औरंगाबाद : शासनाने जानेवारीअखेरपासून राज्यात स्टॅम्प विक्री बंद केली. त्यामुळे राज्यातील १५ हजारांहून अधिक वेंडर बांधवांवर बेरोजगाराची कुऱ्हाड कोसळली आहे.

औरंगाबाद : शासनाने जानेवारीअखेरपासून राज्यात स्टॅम्प विक्री बंद केली. त्यामुळे राज्यातील १५ हजारांहून अधिक वेंडर बांधवांवर बेरोजगाराची कुऱ्हाड कोसळली आहे. वर्षानुवर्षे बाँड विक्री करून उदरनिर्वाह करणाऱ्या वेंडर मंडळींवर उपासमारीची वेळ आली आहे.महाराष्ट्र शासनाने राज्यातील राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये कार्यान्वित होणाऱ्या ई-एसबीटीआर (ई-सेक्युअर्ड बँक कम ट्रेझरी रिसिट) या नव्या संगणकीय पद्धतीचा वापर १ फेब्रुवारीपासून सुरू केला आहे. त्यामुळे एकट्या औरंगाबाद जिल्ह्यातील दोनशेहून अधिक, तर राज्यातील १५ हजार स्टॅम्प वेंडर बेरोजगार झाले आहेत. या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या इतर हजारो कुटुंबांवरही बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. नागरिकांना आजही प्रतिज्ञापत्र, दस्त नोंदणी, मुद्रांक शुल्क आदी कामांसाठी स्टॅम्पपेपर लागतात. राज्यातील सर्व स्टॅम्पपेपर विक्रेत्यांना कोषागार कार्यालयातून स्टॅम्प देणेच बंद करण्यात आले आहे. स्टॅम्पपेपर छपाई बंद करण्याबाबत शासनाचा काय उद्देश आहे, याबाबत आम्हाला माहिती नाही; परंतु मुद्रांक विक्रेत्यांना फ्रँकिंग मशीन, ई-स्टॅम्पिंग आदी सोयी- सुविधा दिल्यास चार पैसे तरी मिळतील. शासनाने स्टॅम्प विक्री बंद केली तरी किमान पर्याय खुले करावेत.राज्यात आतापर्यंत जेवढे स्टॅम्प घोटाळे झाले आहेत, त्यामध्ये एकाही स्टॅम्पपेपर विक्रेत्यांचा समावेश नाही. असे असतानाही मागील महिन्यात विक्रेत्यांकडे उपलब्ध असलेले स्टॅम्प अल्ट्रा व्हायलेट दिव्याने तपासण्यात आले. आमचा कोणताही गुन्हा नसताना ही शिक्षा कशासाठी आणि का देण्यात येत आहे, असा प्रश्न मुद्रांक विक्रेता संघटनेने उपस्थित केला आहे.