शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

सरकारने त्यांच्या प्रकल्पांत स्थानिक उत्पादनच वापरावे

By admin | Updated: August 26, 2015 23:56 IST

जालना : विविध कारणांमुळे जालन्यातील स्टील उद्योग अडचणीत सापडला असून, या उद्योगापुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

जालना : विविध कारणांमुळे जालन्यातील स्टील उद्योग अडचणीत सापडला असून, या उद्योगापुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. यातून मार्ग काढण्यासाठी सरकारच्या विविध प्रकल्पांसाठी गुणवत्तेचे राज्यातच उत्पादित केलेले स्टील वापरावे, अशी आग्रही मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केल्याची माहिती उद्योजक तथा रुपम स्टीलचे किशोर अग्रवाल यांनी लोकमतशी बोलताना दिली.अन्य राज्यांतील वीजदराशी तुलना केली तर महाराष्ट्रात हे दर अधिक असल्याने उद्योगांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. मध्यंतरी तात्कालीन राज्य सरकारने उद्योगांसाठी रात्रीच्या वेळी वीजदरात अडीच रुपयांची सूट दिली होती. मात्र, काही दिवसांपूर्वी ती कमी करुन दीड रुपयांवर आणण्यात आली आहे. यासह विविध प्रकारच्या करांमुळे स्टील उद्योग सध्या अडचणीतून जात आहे. जालन्यातील बहुतांश स्टील कंपन्या बंद झाल्या असून, परिस्थिती अशीच राहिली तर अन्य कंपन्याही बंद होण्याची भीती अग्रवाल यांनी व्यक्त केली. राज्य सरकार एकीकडे ‘मेक इन महाराष्ट्र’चा नारा देत आहे. तर दुसरीकडे राज्यात उद्योग वाढीसाठी पोषक वातावरण नसल्याचे अग्रवाल म्हणाले. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आम्ही स्टील उद्योगाला भेडसावणाऱ्या समस्या मांडल्या असून, त्या सोडविण्याच्या दृष्टीने सकारात्मक पाऊले उचलली जातील, असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहे. मात्र, लवकरात लवकर पाऊले उचलली गेली नाही, तर स्टील उद्योगापुढे भीषण संकट निर्माण होण्याचे संकेत अग्रवाल यांनी यावेळी दिले. सध्या हा उद्योग अडचणीत सापडल्याने अनेक कारखाने तीन पाळ्यात चालविणे जिकीरीचे झाल्याने ते कमी पाळ्यावर सुरु आहेत. परिणामी जालन्यातील कारखान्यांपैकी अनेक कारखाने बंद झाल्याने हजारो लोक बेरोजगार झाले आहेत. सरकारने लवकरात लवकर यावर उपाययोजना आखण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केल्याचे अग्रवाल यावेळी म्हणाले.