शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

सरकारने त्यांच्या प्रकल्पांत स्थानिक उत्पादनच वापरावे

By admin | Updated: August 26, 2015 23:56 IST

जालना : विविध कारणांमुळे जालन्यातील स्टील उद्योग अडचणीत सापडला असून, या उद्योगापुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

जालना : विविध कारणांमुळे जालन्यातील स्टील उद्योग अडचणीत सापडला असून, या उद्योगापुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. यातून मार्ग काढण्यासाठी सरकारच्या विविध प्रकल्पांसाठी गुणवत्तेचे राज्यातच उत्पादित केलेले स्टील वापरावे, अशी आग्रही मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केल्याची माहिती उद्योजक तथा रुपम स्टीलचे किशोर अग्रवाल यांनी लोकमतशी बोलताना दिली.अन्य राज्यांतील वीजदराशी तुलना केली तर महाराष्ट्रात हे दर अधिक असल्याने उद्योगांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. मध्यंतरी तात्कालीन राज्य सरकारने उद्योगांसाठी रात्रीच्या वेळी वीजदरात अडीच रुपयांची सूट दिली होती. मात्र, काही दिवसांपूर्वी ती कमी करुन दीड रुपयांवर आणण्यात आली आहे. यासह विविध प्रकारच्या करांमुळे स्टील उद्योग सध्या अडचणीतून जात आहे. जालन्यातील बहुतांश स्टील कंपन्या बंद झाल्या असून, परिस्थिती अशीच राहिली तर अन्य कंपन्याही बंद होण्याची भीती अग्रवाल यांनी व्यक्त केली. राज्य सरकार एकीकडे ‘मेक इन महाराष्ट्र’चा नारा देत आहे. तर दुसरीकडे राज्यात उद्योग वाढीसाठी पोषक वातावरण नसल्याचे अग्रवाल म्हणाले. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आम्ही स्टील उद्योगाला भेडसावणाऱ्या समस्या मांडल्या असून, त्या सोडविण्याच्या दृष्टीने सकारात्मक पाऊले उचलली जातील, असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहे. मात्र, लवकरात लवकर पाऊले उचलली गेली नाही, तर स्टील उद्योगापुढे भीषण संकट निर्माण होण्याचे संकेत अग्रवाल यांनी यावेळी दिले. सध्या हा उद्योग अडचणीत सापडल्याने अनेक कारखाने तीन पाळ्यात चालविणे जिकीरीचे झाल्याने ते कमी पाळ्यावर सुरु आहेत. परिणामी जालन्यातील कारखान्यांपैकी अनेक कारखाने बंद झाल्याने हजारो लोक बेरोजगार झाले आहेत. सरकारने लवकरात लवकर यावर उपाययोजना आखण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केल्याचे अग्रवाल यावेळी म्हणाले.