शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

सरकारने त्यांच्या प्रकल्पांत स्थानिक उत्पादनच वापरावे

By admin | Updated: August 26, 2015 23:56 IST

जालना : विविध कारणांमुळे जालन्यातील स्टील उद्योग अडचणीत सापडला असून, या उद्योगापुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

जालना : विविध कारणांमुळे जालन्यातील स्टील उद्योग अडचणीत सापडला असून, या उद्योगापुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. यातून मार्ग काढण्यासाठी सरकारच्या विविध प्रकल्पांसाठी गुणवत्तेचे राज्यातच उत्पादित केलेले स्टील वापरावे, अशी आग्रही मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केल्याची माहिती उद्योजक तथा रुपम स्टीलचे किशोर अग्रवाल यांनी लोकमतशी बोलताना दिली.अन्य राज्यांतील वीजदराशी तुलना केली तर महाराष्ट्रात हे दर अधिक असल्याने उद्योगांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. मध्यंतरी तात्कालीन राज्य सरकारने उद्योगांसाठी रात्रीच्या वेळी वीजदरात अडीच रुपयांची सूट दिली होती. मात्र, काही दिवसांपूर्वी ती कमी करुन दीड रुपयांवर आणण्यात आली आहे. यासह विविध प्रकारच्या करांमुळे स्टील उद्योग सध्या अडचणीतून जात आहे. जालन्यातील बहुतांश स्टील कंपन्या बंद झाल्या असून, परिस्थिती अशीच राहिली तर अन्य कंपन्याही बंद होण्याची भीती अग्रवाल यांनी व्यक्त केली. राज्य सरकार एकीकडे ‘मेक इन महाराष्ट्र’चा नारा देत आहे. तर दुसरीकडे राज्यात उद्योग वाढीसाठी पोषक वातावरण नसल्याचे अग्रवाल म्हणाले. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आम्ही स्टील उद्योगाला भेडसावणाऱ्या समस्या मांडल्या असून, त्या सोडविण्याच्या दृष्टीने सकारात्मक पाऊले उचलली जातील, असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहे. मात्र, लवकरात लवकर पाऊले उचलली गेली नाही, तर स्टील उद्योगापुढे भीषण संकट निर्माण होण्याचे संकेत अग्रवाल यांनी यावेळी दिले. सध्या हा उद्योग अडचणीत सापडल्याने अनेक कारखाने तीन पाळ्यात चालविणे जिकीरीचे झाल्याने ते कमी पाळ्यावर सुरु आहेत. परिणामी जालन्यातील कारखान्यांपैकी अनेक कारखाने बंद झाल्याने हजारो लोक बेरोजगार झाले आहेत. सरकारने लवकरात लवकर यावर उपाययोजना आखण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केल्याचे अग्रवाल यावेळी म्हणाले.