शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

शासनाने हिंगोलीत व्यापारी संकुल उभारावे

By admin | Updated: July 4, 2017 23:41 IST

हिंगोली : जिल्हा होऊन अनेक वर्षे ेउलटली असली तरी हिंगोली जिल्ह्याचा हवा तसा विकास झाला नाही. व्यापार क्षेत्रातही प्रगती झाली नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्हा होऊन अनेक वर्षे ेउलटली असली तरी हिंगोली जिल्ह्याचा हवा तसा विकास झाला नाही. व्यापार क्षेत्रातही प्रगती झाली नाही. त्यामुळे हिंगोली शहरात शासनाने व्यापारी संकुल उभारावे, शिवाय कारखान्याची उभारणी करणेही तितकेच महत्त्वाचे आहे, अशी माहिती जिल्हा व्यापारी महासंघाचे संस्थापक तथा जिल्हाध्यक्ष रमेशचंद्र बगडिया तसेच महासंघाचे मार्गदर्शक धरमचंद बडेरा यांनी दिली.जिल्हा व्यापारी महासंघाची स्थापना के व्हा झाली?बगडिया - व्यापाऱ्यांच्या हितासाठी १९९१ साली जिल्हा व्यापारी महासंघाची स्थापना करण्यात आली. स्थापना झाल्यापासून आतापर्यंत व्यापाऱ्यांच्या हितासाठी महासंघातर्फे लढा दिला जात आहे. शिवाय शासनाकडे विविध मागण्यांसाठी पाठपुरावा सुरूच आहे.महासंघाच्या कोणकोणत्या मागण्या आहेत? बगडिया - ना रोजगार, ना उद्योग म्हणून हिंगोली जिल्ह्याची ओळख आहे. जिल्ह्याचा विकास करायचा असेल तर शासनाने एखाद्या कारखान्याची उभारणी करावी. याबाबत व्यापारी महासंघातर्फे प्रशासनामार्फत वेळोवेळी निवेदने सादर करण्यात आली. शिवाय अजूनही पाठपुरावा सुरूच आहे. शासनाने लागू केलेल्या जीएसटीबद्दल महासंघाचे काय मत आहे? बगडिया - शासनाने लागू केलेल्या जीएसटीला महासंघाचा विरोध नाही. परंतु जीएसटीमधील जाचक अटींमुळे लहान व्यापाऱ्यांचे अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जीएसटीमधील जाचक नियमात सुधारणा होणे गरजेचे आहे. जिल्हा बंदमुळे व्यापाऱ्यांचे नुकसान होते का?बडेरा - जिल्हा बंदचे आवाहन एखाद्या पक्ष किंवा संघटनेतर्फे करण्यात आल्यास संबधित पदाधिकारी महासंघाला कळवितात. किंवा तसे पत्रही देतात. शिवाय पोलीस प्रशासनही महासंघाचे म्हणणे ऐकून घेते. अशावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, याबाबत महासंघातील प्रत्येक पदाधिकारी खबदारी घेतात. परंतु बंदमुळे छोट्या व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. जिल्ह्यात व्यापार क्षेत्रात प्रगती होत आहे का? बडेरा - जिल्हा निर्मिती होऊन अनेक वर्षे झाली आहेत. परंतु व्यापार क्षेत्रात हवी तसी प्रगती झाली नाही. त्यामुळे रेल्वे दळणवळण वाढीस लागल्यास निश्चित प्रगती होईल. जिल्ह्याच्या ठिकाणी मेडिकल कॉलेज होणे तितकेच महत्त्वाचे आहे. शिवाय इतर सुविधा निर्माण झाल्यास व्यापाराला चालना मिळू शकते.