शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

सरकारने विमानतळाचे विस्तारीकरण प्राधान्यक्रमावर घ्यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:05 IST

औरंगाबाद टुरिझम डेव्हलपमेंट फाउंडेशन आणि उद्योजक --- औरंगाबादच्या चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विस्तारीकरणात धावपट्टीचा विस्तार होईल. मोठ्या धावपट्टीमुळे मोठी विमाने ...

औरंगाबाद टुरिझम डेव्हलपमेंट फाउंडेशन आणि उद्योजक

---

औरंगाबादच्या चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विस्तारीकरणात धावपट्टीचा विस्तार होईल. मोठ्या धावपट्टीमुळे मोठी विमाने उतरणे शक्य होईल. त्यामुळे राज्य सरकारने लवकरात लवकर भूसंपादन करून जमीन भारतीय विमानतळ प्राधिकरणाला हस्तांतरित करावी. म्हणजे प्राधिकरण विमानतळाचे विस्तारीकरण करू शकतील.

---

कोरोनामुळे औरंगाबादच्या विमानसेवेला फटका बसला. दुसऱ्या लाटेत इंडिगोने विमानसेवा तात्पुरती रद्द केली. पण कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच पुन्हा एकदा ही विमानसेवा सुरळीत होत आहे. दिल्ली, हैदराबाद विमानसेवा पुन्हा एकदा उड्डाण घेत आहे. तर १२ जुलैपासून मुंबईची विमानसेवा सुरू केली जात आहे. या तीनही विमानसेवांना प्रवाशांचा प्रतिसाद वाढल्यानंतर अहमदाबाद आणि बंगळुरू विमानसेवा सुरू करण्यासाठी पाठपुरावा केला जाईल. आर्थिक व्यवहार सुरळीत होत आहे. लसीकरण वाढत असल्याने विमान प्रवासी वाढत आहेत. त्यामुळे औरंगाबादला पूर्वी सुरू असलेल्या विमानसेवा पुन्हा एकदा पूर्ववत सुरू होतील, असा विश्वास आहे.

राज्य आणि केंद्र सरकारने विमानतळाचे विस्तारीकरण प्राधान्यक्रमावर घेतले पाहिजे. केंद्रीय नागरी उड्डयन मंत्र्यांची भेट घेऊन हे काम लवकर पूर्ण करण्याची मागणी केली जाईल. विमानतळाचे विस्तारीकरण झाल्यानंतर मोठी विमाने उतरू शकतील. शिवाय आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होण्यास मदत होईल. मराठवाड्यातील शेतीमाल हा देशभरात आणि परदेशात गेला पाहिजे. कार्गो विमानसेवा सुरू झाली तर हे शक्य होईल. यासाठीही विस्तारीकरण होणे गरजेचे आहे. देशात किसान उडान योजना सुरू आहे. मराठवाड्यात किसान रेल्वेबरोबर किसान उडान वाढले पाहिजे. त्यासाठीदेखील पाठपुरावा केला जाईल.

औरंगाबाद शहराला डॉप्लर वेदर रडार पाहिजे. शेतकऱ्यांना त्याद्वारे हवामानाचा अचूक अंदाज कळेल. सोबतच विमानसेवेलाही त्याचा फायदा होईल. यासाठी मिनिस्ट्री ऑफ अर्थ, सायन्स आणि डायरेक्टर जनरल ऑफ मेटॅरॉलॉजी यांच्याकडे पाठपुरावा केला जाईल. गोव्याच्या धर्तीवर महाराष्ट्रात पर्यटनाला चालना दिली पाहिजे. ज्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत, त्यांना पर्यटनस्थळी जाण्याची परवानगी दिली पाहिजे. गेली दीड वर्षे नागरिक कुठेच गेलेले नाहीत. परदेशी पर्यटकही पर्यटनासाठी भारतात येण्यास इच्छुक आहेत. लसीकरण पूर्ण झाल्यानंतर पर्यटन चारपटीने वाढेल, असा विश्वास आहे.