शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

सरकारने विमानतळाचे विस्तारीकरण प्राधान्यक्रमावर घ्यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:05 IST

औरंगाबाद टुरिझम डेव्हलपमेंट फाउंडेशन आणि उद्योजक --- औरंगाबादच्या चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विस्तारीकरणात धावपट्टीचा विस्तार होईल. मोठ्या धावपट्टीमुळे मोठी विमाने ...

औरंगाबाद टुरिझम डेव्हलपमेंट फाउंडेशन आणि उद्योजक

---

औरंगाबादच्या चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विस्तारीकरणात धावपट्टीचा विस्तार होईल. मोठ्या धावपट्टीमुळे मोठी विमाने उतरणे शक्य होईल. त्यामुळे राज्य सरकारने लवकरात लवकर भूसंपादन करून जमीन भारतीय विमानतळ प्राधिकरणाला हस्तांतरित करावी. म्हणजे प्राधिकरण विमानतळाचे विस्तारीकरण करू शकतील.

---

कोरोनामुळे औरंगाबादच्या विमानसेवेला फटका बसला. दुसऱ्या लाटेत इंडिगोने विमानसेवा तात्पुरती रद्द केली. पण कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच पुन्हा एकदा ही विमानसेवा सुरळीत होत आहे. दिल्ली, हैदराबाद विमानसेवा पुन्हा एकदा उड्डाण घेत आहे. तर १२ जुलैपासून मुंबईची विमानसेवा सुरू केली जात आहे. या तीनही विमानसेवांना प्रवाशांचा प्रतिसाद वाढल्यानंतर अहमदाबाद आणि बंगळुरू विमानसेवा सुरू करण्यासाठी पाठपुरावा केला जाईल. आर्थिक व्यवहार सुरळीत होत आहे. लसीकरण वाढत असल्याने विमान प्रवासी वाढत आहेत. त्यामुळे औरंगाबादला पूर्वी सुरू असलेल्या विमानसेवा पुन्हा एकदा पूर्ववत सुरू होतील, असा विश्वास आहे.

राज्य आणि केंद्र सरकारने विमानतळाचे विस्तारीकरण प्राधान्यक्रमावर घेतले पाहिजे. केंद्रीय नागरी उड्डयन मंत्र्यांची भेट घेऊन हे काम लवकर पूर्ण करण्याची मागणी केली जाईल. विमानतळाचे विस्तारीकरण झाल्यानंतर मोठी विमाने उतरू शकतील. शिवाय आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होण्यास मदत होईल. मराठवाड्यातील शेतीमाल हा देशभरात आणि परदेशात गेला पाहिजे. कार्गो विमानसेवा सुरू झाली तर हे शक्य होईल. यासाठीही विस्तारीकरण होणे गरजेचे आहे. देशात किसान उडान योजना सुरू आहे. मराठवाड्यात किसान रेल्वेबरोबर किसान उडान वाढले पाहिजे. त्यासाठीदेखील पाठपुरावा केला जाईल.

औरंगाबाद शहराला डॉप्लर वेदर रडार पाहिजे. शेतकऱ्यांना त्याद्वारे हवामानाचा अचूक अंदाज कळेल. सोबतच विमानसेवेलाही त्याचा फायदा होईल. यासाठी मिनिस्ट्री ऑफ अर्थ, सायन्स आणि डायरेक्टर जनरल ऑफ मेटॅरॉलॉजी यांच्याकडे पाठपुरावा केला जाईल. गोव्याच्या धर्तीवर महाराष्ट्रात पर्यटनाला चालना दिली पाहिजे. ज्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत, त्यांना पर्यटनस्थळी जाण्याची परवानगी दिली पाहिजे. गेली दीड वर्षे नागरिक कुठेच गेलेले नाहीत. परदेशी पर्यटकही पर्यटनासाठी भारतात येण्यास इच्छुक आहेत. लसीकरण पूर्ण झाल्यानंतर पर्यटन चारपटीने वाढेल, असा विश्वास आहे.