शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

शिक्षण क्षेत्रातील ‘प्रयोग’ शासनाने आता थांबवावेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 00:20 IST

शासनाने शिक्षण क्षेत्रात सुरू केलेले नवनवीन प्रयोग थांबवावेत. ग्रामीण भागातील गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण देणाºया जिल्हा परिषदांच्या शाळा बंद करू नयेत, बंद केलेल्या शाळा खाजगी संस्थांना चालविण्यासाठी द्याव्यात आणि कॉर्पोरेट कंपन्यांना चालविण्यासाठी शाळा देऊ नयेत, अन्यथा दहावी व बारावी बोर्ड परीक्षेसाठी खाजगी शाळांच्या इमारती देणार नाहीत, असा इशारा शिक्षण संस्था महामंडळ व अखिल महाराष्ट्र मुख्याध्यापक संयुक्त महामंडळाने आज येथे दिला आहे.

औरंगाबाद : शासनाने शिक्षण क्षेत्रात सुरू केलेले नवनवीन प्रयोग थांबवावेत. ग्रामीण भागातील गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण देणाºया जिल्हा परिषदांच्या शाळा बंद करू नयेत, बंद केलेल्या शाळा खाजगी संस्थांना चालविण्यासाठी द्याव्यात आणि कॉर्पोरेट कंपन्यांना चालविण्यासाठी शाळा देऊ नयेत, अन्यथा दहावी व बारावी बोर्ड परीक्षेसाठी खाजगी शाळांच्या इमारती देणार नाहीत, असा इशारा शिक्षण संस्था महामंडळ व अखिल महाराष्ट्र मुख्याध्यापक संयुक्त महामंडळाने आज येथे दिला आहे.यासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत विजय नवल पाटील, रावसाहेब आवारी व अशोक पारधी म्हणाले की, शिक्षण क्षेत्रात विद्यमान शासनाकडून रोज नवनवीन प्रयोग राबविले जात आहेत. त्यामुळे शिक्षणाचा खेळखंडोबा झाला आहे. अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण पुरविणे ही शासनाची जबाबदारी आहे. मात्र, शिक्षणावरचा खर्च कमी करण्यासाठी शासनाने खाजगी कॉर्पोरेट कंपन्यांना शिक्षण क्षेत्राचे दरवाजे उघडण्याचा घाट घातला आहे. कॉर्पोरेट कंपन्या मोठमोठ्या शहरात ‘पैसे द्या आणि शिक्षण घ्या’ या तत्त्वावर शाळा सुरू करतील. परिणामी, गरिबांची मुले शिक्षणापासून वंचित राहतील. त्यामुळे कॉर्पोरेट कंपन्यांना शिक्षण क्षेत्रासाठी आमंत्रण देऊ नये, अशी आमची मागणी आहे.शासनाने ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करू नये. त्या खाजगी शिक्षण संस्था शिक्षकांसहित चालविण्यास तयार आहेत. जि. प. शाळा बंद केल्यास ग्रामीण मुले-मुली शिकणार नाहीत. शिक्षणासाठी मुलींना दूर अंतरावर पायी जाऊ देण्यास पालक तयार नाहीत. सध्या सर्वत्र असुरक्षिततेचे वातावरण आहे. शासनाने या बाबीचा विचार करावा.२०१२ पासून शिक्षक भरती बंद केली आहे. याशिवाय अतिरिक्त शिक्षकांचे विषयनिहाय समायोजन न करता सरसकट शिक्षक लादले जातात. त्यामुळे शाळांमध्ये एकाच विषयाचे अनेक शिक्षक कार्यरत असून, अनेक ठिकाणी गणित, विज्ञान विषयांसाठी शिक्षकच नाहीत. शिक्षकेतर आकृतिबंधाबाबत २००२ पासून शासनाने निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे अनेक शाळांमध्ये कारकुनी कामे शिक्षक व मुख्याध्यापकांनाच करावी लागत आहेत.शिक्षण संस्था महामंडळ व अखिल महाराष्ट्र मुख्याध्यापक संयुक्त महामंडळाने औरंगाबादेत बैठक घेऊन एकत्रित कार्यकारिणी जाहीर केली. संयुक्त कार्यकारिणीमध्ये दोन्ही महामंडळांचे प्रत्येकी दहा सदस्य घेण्यात आले असून, शिक्षण क्षेत्रातील विविध प्रलंबित प्रश्नांवर लढा उभारण्यासाठी ही कार्यकारिणी निर्णय घेईल. सुरुवातीला चर्चेसाठी शासनाला वेळ मागितला जाईल. शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्नांवर सामोपचाराने तोडगा न निघाल्यास शिक्षण संस्थाचालक आणि मुख्याध्यापक संघटना एकत्रितपणे एल्गार पुकारतील.४यावेळी विनोद गुडधे, अशोक थोरात, आर. पी. जोशी, एस. पी. जवळकर, रवींद्र फडणवीस, युनूस पटेल, वाल्मीक सुरासे, दीपक दोंदल आदींची उपस्थिती होती.