शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
3
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
4
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
5
भयंकर! लग्नात वाजत होता DJ; १५ वर्षांच्या मुलीला सहन झाला नाही आवाज, हार्ट अटॅकने मृत्यू
6
“किडनी विकावी लागणे शेतकऱ्यांच्या अडचणींची परीसीमा, अतिशय दुर्दैवी”; सुप्रिया सुळेंची टीका
7
'आता निष्पक्ष निवडणुका राहिलेल्या नाहीत', राजदचे खासदार मनोज कुमार झा स्पष्टच बोलले
8
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण! टाटा समुहाच्या 'या' कंपनीला सर्वाधिक फटका, IT सेक्टरचा आधार
9
ICC T20 Rankings : तिलक वर्माची उंच उडी! बटलरसह पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानला फटका
10
घाई करू नका! नवीन स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी 'ही' आहे सर्वोत्तम वेळ; हमखास वाचतात तुमचे हजारो रुपये..
11
Secret Santa : अरे व्वा! ऑफिसमध्ये 'सीक्रेट सँटा'साठी गिफ्ट द्यायचंय? ५०० रुपयांपर्यंतचे झक्कास पर्याय
12
IPL 2026: "मला नवं आयुष्य दिल्याबद्दल धन्यवाद" पिवळी जर्सी मिळताच मुंबईच्या पोराची इमोशनल पोस्ट!
13
वंदे भारत की राजधानी, कोणत्या ट्रेनच्या लोको पायलटला सर्वाधिक पगार मिळतो? आकडा पाहून व्हाल थक्क
14
कर्जदारांना 'अच्छे दिन'! भारतीय अर्थव्यवस्था 'गोल्डीलॉक्स' स्थितीत; गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले...
15
पहिल्याच बैठकीत जागावाटपावरून 'मविआ'त काडीमोड, पवारांच्या नेत्यांचा बैठकीतून वॉक आऊट
16
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! वेटिंग-RAC तिकिटाची स्थिती आता १० तास आधी कळणार
17
काँग्रेसची कार्यकर्ती, वरपर्यंत ओळख असल्याचं सांगून आणायची प्रेमासाठी दबाव, त्रस्त पोलीस इन्स्पेक्टरची महिलेविरोधात तक्रार
18
मुंबई इंडियन्सची 'ती गोष्ट 'जितेंद्र भाटवडेकर'च्या मनाला लागली? रोहितसोबतचा फोटो शेअर करत म्हणाला...
19
‘टॅरिफला आता हत्यार बनवले जातेय’, निर्मला सीतारमण यांनी सांगितला 'ट्रम्प टॅरिफ'मागील खेळ...
20
ICICI Prudential AMC IPO Allotment: कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस? जीएमपीमध्येही जोरदार तेजी
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण क्षेत्रातील ‘प्रयोग’ शासनाने आता थांबवावेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 00:20 IST

शासनाने शिक्षण क्षेत्रात सुरू केलेले नवनवीन प्रयोग थांबवावेत. ग्रामीण भागातील गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण देणाºया जिल्हा परिषदांच्या शाळा बंद करू नयेत, बंद केलेल्या शाळा खाजगी संस्थांना चालविण्यासाठी द्याव्यात आणि कॉर्पोरेट कंपन्यांना चालविण्यासाठी शाळा देऊ नयेत, अन्यथा दहावी व बारावी बोर्ड परीक्षेसाठी खाजगी शाळांच्या इमारती देणार नाहीत, असा इशारा शिक्षण संस्था महामंडळ व अखिल महाराष्ट्र मुख्याध्यापक संयुक्त महामंडळाने आज येथे दिला आहे.

औरंगाबाद : शासनाने शिक्षण क्षेत्रात सुरू केलेले नवनवीन प्रयोग थांबवावेत. ग्रामीण भागातील गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण देणाºया जिल्हा परिषदांच्या शाळा बंद करू नयेत, बंद केलेल्या शाळा खाजगी संस्थांना चालविण्यासाठी द्याव्यात आणि कॉर्पोरेट कंपन्यांना चालविण्यासाठी शाळा देऊ नयेत, अन्यथा दहावी व बारावी बोर्ड परीक्षेसाठी खाजगी शाळांच्या इमारती देणार नाहीत, असा इशारा शिक्षण संस्था महामंडळ व अखिल महाराष्ट्र मुख्याध्यापक संयुक्त महामंडळाने आज येथे दिला आहे.यासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत विजय नवल पाटील, रावसाहेब आवारी व अशोक पारधी म्हणाले की, शिक्षण क्षेत्रात विद्यमान शासनाकडून रोज नवनवीन प्रयोग राबविले जात आहेत. त्यामुळे शिक्षणाचा खेळखंडोबा झाला आहे. अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण पुरविणे ही शासनाची जबाबदारी आहे. मात्र, शिक्षणावरचा खर्च कमी करण्यासाठी शासनाने खाजगी कॉर्पोरेट कंपन्यांना शिक्षण क्षेत्राचे दरवाजे उघडण्याचा घाट घातला आहे. कॉर्पोरेट कंपन्या मोठमोठ्या शहरात ‘पैसे द्या आणि शिक्षण घ्या’ या तत्त्वावर शाळा सुरू करतील. परिणामी, गरिबांची मुले शिक्षणापासून वंचित राहतील. त्यामुळे कॉर्पोरेट कंपन्यांना शिक्षण क्षेत्रासाठी आमंत्रण देऊ नये, अशी आमची मागणी आहे.शासनाने ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करू नये. त्या खाजगी शिक्षण संस्था शिक्षकांसहित चालविण्यास तयार आहेत. जि. प. शाळा बंद केल्यास ग्रामीण मुले-मुली शिकणार नाहीत. शिक्षणासाठी मुलींना दूर अंतरावर पायी जाऊ देण्यास पालक तयार नाहीत. सध्या सर्वत्र असुरक्षिततेचे वातावरण आहे. शासनाने या बाबीचा विचार करावा.२०१२ पासून शिक्षक भरती बंद केली आहे. याशिवाय अतिरिक्त शिक्षकांचे विषयनिहाय समायोजन न करता सरसकट शिक्षक लादले जातात. त्यामुळे शाळांमध्ये एकाच विषयाचे अनेक शिक्षक कार्यरत असून, अनेक ठिकाणी गणित, विज्ञान विषयांसाठी शिक्षकच नाहीत. शिक्षकेतर आकृतिबंधाबाबत २००२ पासून शासनाने निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे अनेक शाळांमध्ये कारकुनी कामे शिक्षक व मुख्याध्यापकांनाच करावी लागत आहेत.शिक्षण संस्था महामंडळ व अखिल महाराष्ट्र मुख्याध्यापक संयुक्त महामंडळाने औरंगाबादेत बैठक घेऊन एकत्रित कार्यकारिणी जाहीर केली. संयुक्त कार्यकारिणीमध्ये दोन्ही महामंडळांचे प्रत्येकी दहा सदस्य घेण्यात आले असून, शिक्षण क्षेत्रातील विविध प्रलंबित प्रश्नांवर लढा उभारण्यासाठी ही कार्यकारिणी निर्णय घेईल. सुरुवातीला चर्चेसाठी शासनाला वेळ मागितला जाईल. शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्नांवर सामोपचाराने तोडगा न निघाल्यास शिक्षण संस्थाचालक आणि मुख्याध्यापक संघटना एकत्रितपणे एल्गार पुकारतील.४यावेळी विनोद गुडधे, अशोक थोरात, आर. पी. जोशी, एस. पी. जवळकर, रवींद्र फडणवीस, युनूस पटेल, वाल्मीक सुरासे, दीपक दोंदल आदींची उपस्थिती होती.