शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
3
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
4
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
5
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
6
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
7
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
8
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
9
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
10
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
11
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
12
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
13
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
14
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
15
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
16
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
17
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
18
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
19
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
20
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."

शासनाने मराठा समाजाचा अंत पाहू नये

By admin | Updated: October 11, 2016 00:26 IST

कळंब : कोपर्डी प्रकरण, मराठा आरक्षणासह विविध मागण्यासाठी मराठा समाज रस्त्यावर उतरत आहे़ यातून राज्यात आजवर २४ ठिकाणी झालेल्या मराठा क्रांती मूक मोर्चात लाखोंच्या संख्येने समाज सहभागी झाला आहे़

कळंब : कोपर्डी प्रकरण, मराठा आरक्षणासह विविध मागण्यासाठी मराठा समाज रस्त्यावर उतरत आहे़ यातून राज्यात आजवर २४ ठिकाणी झालेल्या मराठा क्रांती मूक मोर्चात लाखोंच्या संख्येने समाज सहभागी झाला आहे़ मात्र, राज्य शासन मराठा समाजाच्या मागण्यांबाबत उदासिन व वेळकाढूपणाची भूमिका घेत असल्याची टिका करीत, शासनाने समाजाचा अंत पाहू नये अन्यथा, समाजाला संघर्षाचा मार्ग पत्कराला लागेल, असा इशारा स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष आ़ नितेश राणे यांनी दिला़स्वाभिमान संघटनेच्या वतीनेआयोजित ‘मराठा आरक्षण एल्गार’ मेळाव्यात ते बोलत होते़ अध्यक्षस्थानी अखिल भारतीय वारकरी महामंडळाचे अध्यक्ष ह.भ.प. प्रकाश बोधले महाराज तर नगराध्यक्ष मिराताई चोंदे, माजी नगराध्यक्ष शिवाजी कापसे, स्वाभिमान संघटनेचे जिल्हाध्यक्ष किरण टेकाळे, विनोद गपाट, मराठवाडा संपर्क मनोज गरड, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अतुल गायकवाड, माधव गंभीरे, भागवतराव धस, अतुल कवडे, प्रकाश भोसले आदींची प्रमुख उपस्थिती होती़आ.राणे म्हणाले, राज्यात आजवर २४ मुकमोर्चे निघाले आहेत. लाखोच्या संख्येने समाज रस्त्यावर उतरूनही सरकारचे डोके ठिकाणावर आलेले नाही. या विक्रमी मोर्चाची काही जण ‘मुका मोर्चा’ म्हणून टिंगल करत आहे. यावरूनच हे सरकार व सरकारमध्ये सहभागी असलेले लोक मराठा समाजाच्या प्रश्नाविषयी व आरक्षणाविषयी गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. समाजात सहशीनशीलता आहे, या सहनशिलतेचा शासनाने अंत पाहू नये, असा इशाराही त्यांनी दिला़ मराठा आरक्षणावर निर्णय घेण्यासाठी आघाडी सरकारने नारायण राणे समिती नेमली होती. यासमितीने राज्यातील अठरा लाख लोकांचे प्रत्यक्ष सर्व्हेक्षण केले. त्यानुसार मराठा समाजाची आर्थिक, शैक्षणिक व नौकरी आदी संदर्भातील स्थिती जाणून घेऊन मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. परंतु प्रकरण न्यायप्रविष्ट झाल्यानंतर सध्याच्या सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही. परिणामी समाजाला आरक्षणापासून दूर रहावे लागले. नारायण राणे समितीचा अहवाल वस्तूनिष्ट असताना, बापट समितीच्या अहवालाचा गवगवा केला जात आहे. याविषयावर मराठा समाजाला न्याय देण्यासाठी शासन कमी पडत असून, या अंसतोषातूनच लोक रस्त्यावर उतरत असल्याचे ते म्हणाले. यावेळी हभप प्रकाश बोधले महाराज, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अतुल गायकवाड आदींनी मार्गदर्शन केले. या मेळाव्यास मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते़ मेळाव्यासाठी ‘स्वाभिमान’चे जिल्हाध्यक्ष किरण टेकाळे, प्रकाश भोसले, विकास यादव, नाना खराडे आदींनी परिश्रम घेतले़