शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी गव्हावरच चोरट्यांचा डल्ला

By admin | Updated: October 22, 2014 01:17 IST

जालना : रेल्वे प्रशासनाने उभारलेले हायमॅक्स दिवे बंद ठेवले जात असल्याने अंधाराचा फायदा घेत चोरट्यांनी सील तोडून गव्हाचे १७ पोते पळवून नेण्याचा प्रयत्न केला.

जालना : रेल्वे प्रशासनाने उभारलेले हायमॅक्स दिवे बंद ठेवले जात असल्याने अंधाराचा फायदा घेत चोरट्यांनी सील तोडून गव्हाचे १७ पोते पळवून नेण्याचा प्रयत्न केला. उभ्या रेल्वे गाडीतून गहू चोरीचा प्रयत्न झाला. मात्र रेल्वे सुरक्षा पथकाने दरवाजा उघडल्याने पोते कोसळले, असा देखावा केला. पहाटे ६ वाजेपर्यंत सदर प्रकरणाची चौकशी सुरू होती. जालना रेल्वे स्थानकालगतच्या मालधक्क्यावर मालाच्या सुरक्षेसाठी कोणतीही सक्षम यंत्रणा नाही. शिवाय खत, गहू, सिमेंट अस्ताव्यस्त पडलेले दिसून येते. त्यातच माल धक्क्यावरील हायमॅक्स दिवे बंद ठेवले जातात. माल धक्क्यावरच ५० ते ७५ ट्रकची कायम पार्कींग केली जाते. यात झोपणारे कोण? हे सुरक्षा विभागालाही सांगता येणे अवघड आहे. सोमवारी रात्रीच्या सुमारास सील तोडून गव्हाचे पोते पळविण्यात आले. हा प्रकार पहाटे सुरक्षा पथकाच्या लक्षात आला. ठिकठिकाणी पडलेले गव्हाचे पोते गोळा करून या पथकाने माल वाहतूक विभागाच्या कक्षात साठवून ठेवले. सील तुटले तर कोसळलेले गव्हाचे पोते लोहमार्गालगत सापडणे गरजेचे होते. माल धक्क्यावरील ओट्याखाली म्हणजेच लोहमार्गापासून तब्बल ४० ते ५० फूट अंतरावर पोते पडलेले दिसल्याचे लोहमार्ग सुरक्षा पथकातील कर्मचाऱ्यांनी सांगितले. बी. एल. एन. एच. एल. ३३१३१० ९२८९७ एन.सी.आर. या डब्यातून गव्हाचे पोते सील तुटून कोसळल्याचे रेल्वे सुरक्षा बलाचे जमादार राऊत यांनी सांगितले. या डब्याचे सील तुटले असते तर त्यावर डकविण्यात आलेले सील पूर्णत: फाटलेले असते. मात्र हे सील व्यवस्थित काढून बाजूला फेकण्यात आलेले आढळून आले. या सीलला कोठेही धक्का लागलेला नाही. चोरीनंतर हे सील पुन्हा जसेच्या तसे लावण्याचा प्रयत्न बहुतेक चोरट्यांचा असावा, असाही अंदाज व्यक्त करण्यात आला. सुरक्षा बल आणि रेल्वे प्रशासनाने मात्र असे काहीच घडले नसल्याचे कागदोपत्री दाखविले आहे. या पंचनाम्यावर स्टेशन उपअधीक्षक शैलेंद्रकुमार, सुरक्षा बलाचे पोलिस शिपाई गंगावणे, पाँईट मॅन कर्नक के. पुरूषोत्तम आदींच्या सह्या आहेत. त्यांनी जप्त केलेले १७ पोते पुन्हा मालधक्क्यावर जमा केले आहेत. जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल माचेवाड यांनी सांगितले, रेल्वे सुरक्षा बल अथवा रेल्वे प्रशासनाने या चोरीचा कोणताही अहवाल पुरवठा विभागाला दिला नाही. ही बाब फूड कॉर्पोरेशन आॅफ इंडियाच्या कार्यकक्षेत ही बाब येते. त्यांनी रेल्वेतून आलेला माल वखार महामंडळाच्या गोदाम ठेवल्यानंतर पुरवठा विभाग हे माल उचलल्यानंतर त्याला जबाबदार ठरतो. (प्रतिनिधी)