शहरं
Join us  
Trending Stories
1
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
2
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
3
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटचा वादातून शाळेतच संपवले
4
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
5
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
6
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
7
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
8
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
9
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
10
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
11
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
12
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
13
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
14
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे
15
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
16
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
17
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
18
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
19
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
20
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'

शासकीय ‘विश्रामा’त दारुचे पेग !

By admin | Updated: January 9, 2015 00:50 IST

उस्मानाबाद : शहरातील पोलीस मुख्यालयानजीक असलेल्या शासकीय विश्रामगृहा बरोबरच आवारातही देशी-विदेशी दारुच्या बाटल्या आढळून येत आहेत़

उस्मानाबाद : शहरातील पोलीस मुख्यालयानजीक असलेल्या शासकीय विश्रामगृहा बरोबरच आवारातही देशी-विदेशी दारुच्या बाटल्या आढळून येत आहेत़ त्यामुळे या शासकीय विश्रामगृहातच दारूचे पेग रिचवितो कोण? असा प्रश्न समोर येत आहे़ विशेष म्हणजे या विश्रामगृहात अनेकजण नाव नोंदणी नसतानाही आराम करीत असल्याचे ‘लोकमत’ प्रतिनिधींनी गुरूवारी केलेल्या ‘स्टिंग आॅपरेशन’मधून दिसून आले़ उस्मानाबाद प्रमाणेच जिल्ह्यातील इतर विश्रामगृहांचीही अवस्था असल्याचे केलेल्या पाहणीत दिसून आले. याचा फटका अधिकारी-कर्मचाऱ्यांसह ‘व्हीआयपीं’ना सोसावा लागत असल्याचे चित्र आहे़विजय मुंडे ल्ल उस्मानाबादशासकीय विश्रामगृहात राजकीय पुढारी, अधिकाऱ्यांसह व्हीआयपींना ‘विश्राम’ करण्यासाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी शासकीय विश्रामगृहे बांधण्यात आली आहेत़ उस्मानाबाद शहरात शिंगोली नजीक, शहरात पोलीस मुख्यालयानजीक शासकीय विश्रामगृह आहे़ तसेच जलसंपदा विभाग, महावितरण कंपनी यांची वेगवेगळी विश्रामगृहे आहेत़ गुरूवारी शहरातील पोलीस मुख्यालयानजीकच्या विश्रामगृहाची पाहणी केली असता आवारात अस्वच्छता दिसून आली़ ठिकठिकाणी कचरा आणि पाण्याच्या बाटल्या दिसून येत होत्या़ या कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमध्ये देशी-विदेशीच्या बाटल्या पडल्या होत्या़ आतमध्ये रूमची साफसफाई ठेवण्यात आली होती़ तसेच पहिल्या मजल्यावर एका कोपऱ्यात ‘विदेशी’चा खांबा आणि पाण्याची बाटली होती़ एकूणच शासकीय विश्रामगृहात बिनधास्तपणे देशी-विदेशी मद्याचे पेग रिचविण्याचा प्रकार सुरू असल्याचे दिसून येत आहे़ त्यामुळे या बाटल्या इथे टाकणाऱ्यांचा शोध घेवून तात्काळ कारवाई करण्याची गरज व्यक्त होत आहे़मारूती कदम ल्ल उमरगापाटबंधारे प्रकल्प मजबुतीकरण विभागाच्या अख्त्यारित असलेल्या येथील शासकीय विश्रामगृहाच्या शेजारी असलेल्या दोन खोल्यांमध्ये चक्क दारूच्या, शितपेयांच्या बाटल्यांचा खच दिसून आला़ परिसरातील घाणीचे साम्राज्य आणि शौचालयाची दूरवस्था यामुळे विश्रामगृहालाच घरघर लागल्याचे दुर्दैवी चित्र गुरूवारी केलेल्या पाहणीतून दिसून आले़शहरातील दत्त मंदिर कॉलनी भागात वीस वर्षापूर्वी पाटबंधारे विभागाकडून येथे व्हीआयपींच्या निवासाची सोय व्हावी म्हणून विश्रामगृहाची उभारणी करण्यात आली आहे़ विश्रामगृहाच्या देखभाल दुरूस्तीकडे दूर्लक्ष करण्यात आल्याने सद्यस्थितीत अनेक समस्या येथे निर्माण झाल्या आहेत़ विश्रामगृहाच्या परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे़ शेजारी असलेल्या स्वयंपाक गृहाचीही दूरवस्था झाली आहे़ येथील शैचालयाचा वापर अनेक वर्षापासून बंद असून, दरवाजे तुटून पडले आहेत़ या परिसरात मोकाट जनावरे, डुकरांचाही वावर वाढला आहे़ शेजारीच मुख्य अभियंत्यांचे निवासस्थान आहे़ या निवासस्थानासमोर अनेक वर्षापूर्वी एक कार उभा करण्यात आली आहे़ मात्र, तिचा वापर नसल्याने ती कार अनेक वर्षापासून धूळखात पडली आहे़ विश्रामगृहाच्या शेजारी असलेल्या दोन खोल्यांमध्ये काही इसमांनी दारू पिवून टाकलेल्या बाटल्या जमा करण्यात आल्या आहेत़ दारूच्या बाटल्यांची संख्या पाहता पाहणाराही अवाक होवू जातो ! विशेष म्हणजे हा प्रकार शासकीय विश्रामगृहातील मद्यपींचाच असल्याचेही दिसून येत आहे़मी नवीन आहेया विश्रामगृहाबाबत कार्यकारी अभियंता एस़आऱसोनवणे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, मी या कार्यालयाचा नव्याने पदभार घेतला आहे़ मला विश्रामगृहातील सुविधांबाबत माहिती नाही़ पाटबंधारे कार्यालय स्थलांतरित करण्याच्या हलचाली सुरू आहेत़ कार्यालयाचे स्थलांतर किंवा पुनर्वसन मार्च पर्यंत होण्याची शक्यता आहे़ विश्रामगृहातील सोयी-सुविधांची माहिती घेवून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील, असेही सोनवणे म्हणाले़सध्या पाटबंधारे प्रकल्प मजबुतीकरणाची कामे बंद आहेत़ त्यामुळे संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांचे या विश्रामगृहाकडे दूर्लक्ष झाले आहे़ येथील स्वच्छता, रखवालीसाठी कर्मचाऱ्याची नियुक्ती नसल्याने अधिकारीही दूुर्लक्ष करीत आहेत़ त्यामुळे कोणीही या, कसेही वावरा आणि निघून जा, अशीच स्थिती या विश्रामगृहाच्या बाबतीत असून, देखभालीअभावी विश्रामगृहाला घरघर लागली आहे़पांडुरंग पोळे ल्ल नळदुर्गदेखभाल दुरूस्ती अभावी नळदुर्ग (ता़तुळजापूर) येथील शासकीय विश्रामगृहाला उकिरड्याचे स्वरूप आले आहे़ ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून, परिसरात दारूच्या बाटल्या दिसून येतात़ या प्रकारामुळे शासनाच्या उद्देशाला हरताळ फासल्याचे दिसून येत आहे़शासकीय अधिकारी, उच्चपदस्त राजकीय नेत्यांसह विविध विभागातील व्हीआयपींना राहता यावे, विश्रांती मिळावी यासाठी ठिकठिकाणी शासकीय विश्रामगृहे बांधण्यात आलेली आहेत़ नळदुर्ग येथील शासकीय विश्रामगृहाच्या देखभालीसाठी एक शाखा अभियंता, एक लिपिक व दोन सेवक कार्यरत आहेत़ पाच सुटाच्या या विश्रामगृहाच्या आवारात मात्र मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले आहे़ बागबगिचासाठी असलेल्या जागेत गवत उगवले असून, देशी-विदेशी दारूच्या बाटल्याही ठिकठिकाणी आढळून येतात़ तर गुटख्याच्या पुढ्यांचा ढिगाराही दिसून येतो़ अनेक सूटच्या काचा फुटल्या असून, बाथरूममध्येही स्वच्छतेअभावी दूर्गंधी सुटली आहे़ विजेअभावी परिसरात रात्री अंधाराचे साम्राज्य पसरलेले असते़ त्यामुळे रात्री कोणाचा वावर असतो हेही कळू शकत नाही़ येथील रजिस्टरवर २६ डिसेंबर रोजीची शेवटची नोंद आहे़ नगर पालिकेकडून येथे पाण्याचा पुरवठा करण्यात येतो़ मुबलक जागा असतानाही बगिचा फुलविल्याचे दिसत नाही़ तर असलेली झाडे-झुडपेही कोमेजून जावू लागली आहेत.