शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
4
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
5
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
6
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
7
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
8
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
9
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
10
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
11
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
12
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
13
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
14
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
15
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
16
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
17
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
18
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
19
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
20
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!

शासकीय कार्यालयांकडे कोटींची थकबाकी

By admin | Updated: March 20, 2017 22:41 IST

बीड बिल अदा करण्याची उदासीनता केवळ घरगुती, व्यापारी, औद्योगिक ग्राहकांमध्येच नाही तर शासकीय कार्यालयेही त्याच रांगेत आहेत.

राजेश खराडे  बीडबिल अदा करण्याची उदासीनता केवळ घरगुती, व्यापारी, औद्योगिक ग्राहकांमध्येच नाही तर शासकीय कार्यालयेही त्याच रांगेत आहेत. जिल्हा परिषद, नगरपालिका अंतर्गतच्या पाणीपुरवठा विभागाकडे महावितरणचे ५५ कोटी ६५ लाख एवढी थकबाकी आहे, तर न.प.च्या विद्युत विभागाकडे १९ कोटी २० लाख रुपयांची थकबाकी शिल्लक आहे.सध्या बीड विभागात मार्च अखेरच्या अनुषंगाने विशेष वसुली मोहीम सुरू आहे. उपविभागीय कार्यालयातील अभियंते, वायरमन, स्थानिक पातळीवर घरगुती ग्राहकांकडे वसुली करीत आहेत, तर अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता यांना शासनदरबारी जाण्याची वेळ आली आहे.बीड विभागाकडे कृषी पंपासह १४२२ कोटींची थकबाकी असून, परिमंडळात थकबाकीत बीड अग्रस्थानी आहे. त्यामुळे विभागाला ९४ कोटींचे वसुलीचे उद्दिष्ट ठरवून देण्यात आले आहे. फेब्रुवारी अखेरीस २० कोटींची वसुली झाली असून, मार्चच्या सुरुवातीपासून दिवस उजाडताच अधिकारी, कर्मचारी ग्राहकांच्या दारी जात आहेत. वेळप्रसंगी ग्राहकांना नोटीस बजावली जात असून, अधिकच्या थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडित केला जात आहे.ग्राहकांपाठोपाठ आता महावितरणने वसुलीचा मोर्चा शासकीय कार्यालयाकडे वळविला आहे. पाणीपुरवठ्याकरिता विभागात उच्च विद्युत दाब वाहिनीवरील १४ ग्राहकांची नोंद असून, त्यांच्याकडे ५५ कोटींची थकबाकी आहे. वसुलीच्या अनुषंगाने अधीक्षक अभियंता रतन सोनुले व कार्यकारी अभियंता जी.बी. घोडके यांनी सोमवारी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे यांची भेट घेऊन वसुलीसंदर्भात आवाहन केले आहे.पाणीपुरवठ्याप्रमाणेच पथदिव्यांचीही थकबाकी दिवसेंदिवस वाढत आहे. बीड न.प.कडे २२ कोटींची थकबाकी असून, महिनाकाठी केवळ १२ ते १३ लाखांची बोळवण केली जात आहे. त्यामुळे ही रक्कम व्याजापोटीच जमा होत असल्याने मुद्दलामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. न.प. पाणीपुरवठा विभागाकडे १५ कोटींची थकबाकी आहेएकंदरित सर्वच शासकीय कार्यालयांकडे कोटींच्या घरात थकबाकी असून, वसुलीबाबत उदासीनता असल्याने वीज पुरवठा खंडित करण्याच्या सूचना वरिष्ठ कार्यालयाकडून देण्यात आल्या आहेत. तसेच पत्रही बीड विभागाकडे सुपुर्द झाले असून, त्वरित बिले अदा न केल्यास पाणीपुरवठा करणाऱ्या चौदाही ठिकाणचा वीज पुरवठा खंडित केला जाणार आहे. परिणामी याचा फटका सर्वसामान्य ग्राहकांनाच सोसावा लागणार आहे.