शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
3
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
4
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
5
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
6
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
7
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
8
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
9
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
10
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
11
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
13
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
14
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
15
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
16
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
17
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
18
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
19
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
20
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण

पाणंदमुक्त गावांनाच शासनाचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2015 00:28 IST

लातूर : शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाअंतर्गत उपलब्ध करुन देण्यात येणारा निधी हा आता पाणंदमुक्त गावातच खर्च करण्यात आहे़

लातूर : शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाअंतर्गत उपलब्ध करुन देण्यात येणारा निधी हा आता पाणंदमुक्त गावातच खर्च करण्यात आहे़ त्यामुळे पाणीपुरवठा व स्वच्छता विभागातील उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आता गावाच्या पाणंदमुक्तीकडे विशेष लक्ष केंद्रित करावे लागणार आहे़ परिणामी, अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराला शासनानेच चाप लावला आहे़लातूर जिल्हा परिषदेअंतर्गत पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या वतीने मिशन स्वच्छ भारत राबविण्यात येत आहे़ ‘मिशन स्वच्छ भारत’ अंतर्गत जिल्हाभरात स्वच्छतेचा जागर करण्यात येत आहे़ शौचालय नसतील तर ते बांधून घ्यायला लावणे, त्यासाठी शासनाचे अनुदान उपलब्ध करून देणे, कचऱ्याची विल्हेवाट लावणे, कचरा व्यवस्थापन करणे, तसेच पाणंदमुक्त गावात वाढ करणे आदी योजना प्रभावी पद्धतीने राबविण्याचे काम करण्यात येत आहे़ गावागावांत स्वच्छतेचे महत्व पटवून देणे़ नागरिकांमध्ये स्वच्छतेचे महत्व पटवून देवून ज्यांच्याकडे शौचालय नसतील, अशा गावकऱ्यांना शौचालय बांधणीसाठी प्रोत्साहित करून त्यांना शौचालय बांधायला लावणे़ शौचालयाचा वापर का करावा तसेच उघड्यावर शौचास गेल्यामुळे होणारे रोग याबाबत प्रबोधन करणे अशा सर्व बाबी या विभागामार्फत राबविल्या जातात़ शाळेतील विद्यार्थ्यांना, निरक्षर नागरिकांना स्वच्छतेचे व आरोग्य सुरक्षिततेचे महत्व पटवून देण्याचे काम हा विभाग करीत आहे़ ज्या नागरिकांकडे शौचालय नाहीत किंवा त्यांची आर्थिक कुवत नसेल तर त्याबाबत राज्य व केंद्र शासनाच्या अनुदानबाबतची माहिती लाभार्थ्यांना देऊन त्यांना शैचालयाला मिळणारे अनुदान उपलब्ध करून देण्याचे कामही सुरू आहे. त्यामुळे शौचालय बांधणीकडे कल वाढला आहे़ (प्रतिनिधी)