शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

सरकारला खाजगी बँकांच प्रिय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 00:37 IST

प्रत्येक सरकारने या बँकांना व त्यातील कर्मचा-यांना कायमच दुय्यम समजले आहे. त्यांना आपली ताकद दाखवून देण्यासाठी, आपले हक्क मिळविण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय बँक कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस संजीव बंदलीश यांनी केले. संघटनेतर्फे रविवारी अग्रसेन भवन येथे आयोजित एकदिवसीय राज्यस्तरीय अधिवेशनाचे त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : ‘देशाच्या आर्थिक प्रगतीचा पाया सार्वजनिक बँकांनी रचला आहे. देशाच्या कानाकोप-यात बँकांचे जाळे पसरविण्यापासून ते जागतिक मंदीतही अर्थव्यवस्था मजबूत ठेवण्यात सार्वजनिक बँकांनी मोलाची भूमिका बजावलेली असतानाही प्रत्येक सरकारने या बँकांना व त्यातील कर्मचा-यांना कायमच दुय्यम समजले आहे. त्यांना आपली ताकद दाखवून देण्यासाठी, आपले हक्क मिळविण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय बँक कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस संजीव बंदलीश यांनी केले. संघटनेतर्फे रविवारी अग्रसेन भवन येथे आयोजित एकदिवसीय राज्यस्तरीय अधिवेशनाचे त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.यावेळी मंचावर संंघटनेचे अध्यक्ष विनील सक्सेना, ‘एआयएसबीआयएसएफ ’चे अध्यक्ष व्ही.व्ही.एस.आर. सर्मा, सुरेंद्रकुमार शर्मा, जी.एस. राणा, पार्थसारथी पत्रा, अमोल सुतार, नरेश बोदलिया, मिलिंद नाडकर्णी, अधिवेशन सचिव अरुण जोशी, जगदीश शृंगारपुरे आणि प्रदीप येळणे उपस्थित होते.बंदलीश यांनी सरकारच्या धोरणांवर टीका करीत कर्मचा-यांच्या पगारवाढीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, जेव्हा सरकारला ग्रामीण भागात बँक पोहोचवयाची असते तेव्हा सार्वजनिक बँक आठवते, नोटाबंदी काळात आम्ही दिवसरात्र मेहनत केली; परंतु जेव्हा समाधानकारक वेतनाचा विषय येतो तेव्हा बँकांची आर्थिक स्थिती खराब असल्याची बतावणी करून तो विषय लांबणीवर टाकला जातो.लक्षावधी कोटी रुपयांच्या थकीत कर्जांमुळे राष्ट्रीय बँकांची आर्थिक पत ढासळली असल्याचे सांगत ते म्हणाले, कर्ज बुडवणा-या मोठमोठ्या उद्योगपतींवर सरकार का कारवाई करीत नाही.कर्ज बुडवणाºयांची नावे घोषित करून गुन्हे नोंदविण्याची विनंती केली तर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल म्हणतात, अनुत्पादित मालमत्ताधारक व्यावसायिकांचे नाव सांगितले तर देशाच्या आर्थिक विकासाला खीळ बसेल. आता असे कर्जबुडवे देशाच्या प्रगतीत कसे योगदान देत आहेत, हाच प्रश्न आहे.सुमारे ११ वर्षांनंतर भरलेल्या अधिवेशनाच्या निमित्ताने सर्व कर्मचारी संघटनांनी एकत्र येऊन लढा दिला पाहिजे, असे आवाहन जगदीश शृंगारपुरे यांनी केले. वैशाली जहागीरदार आणि प्रियंका वगने यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. अधिवेशनात संघटनेच्या महाराष्ट्रातील पदाधिका-याची नियुक्ती व केंद्रीय समितासाठी सदस्यांना नामांकन देण्यात आले.केवळ १२ जणांकडे २५ टक्के थकीत कर्ज!राष्ट्रीयीकृत बँकांच्या थकीत कर्जाचा आकडा दहा लाख कोटी रुपये मानला, तर कर्ज थकविणाºयांच्या यादीतील पहिल्या १२ जणांकडेच सुमारे २.५ लाख कोटी रुपयांचे कर्ज बाकी आहे.सरकारने हे थकीत २५ टक्के कर्ज जरी वसूल केले, तर बँकांची स्थिती सुधारेल. सध्या बँकांसमोर विलीनीकरण, खाजगीकरण आणि अनुत्पादित मालमत्ता यासारख्या समस्यांचे आव्हान आहे, असा सूर या अधिवेशनातून उमटला.