शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
2
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
3
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
4
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
5
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
6
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
7
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
8
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
9
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
10
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
11
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?
12
जीएसटी 2.0चा धमाका : क्वीड vs एसप्रेसो vs अल्टो, देशातील सर्वात स्वस्तकार कोणती? 'या' कारवर मिळेल सर्वाधिक फायदा
13
Kieron Pollard: किरॉन पोलार्डचा वर्ल्ड रेकॉर्ड! 'असा' पराक्रम करणारा जगातील पहिलाच
14
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?
15
हुंड्यासाठी जावयाची क्रूरता! जमिनीसाठी पत्नीची केली हत्या, सासऱ्यालाही दिला विजेचा झटका
16
चिमुकली आई... आई... करत राहिली, लिव्ह इन पार्टनरने गर्लफ्रेंडच्या मुलीची हत्या केली  
17
Navratri 2025: नवरात्र हा शक्ती उपासनेचा काळ, दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचनाने कोणते लाभ होतात?
18
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
19
ऐकावं ते नवलच! शोधून शोधून थकली पण सापडलाच नाही नवरा; मग स्वत:शीच केलं लग्न अन्...

सरकारला खाजगी बँकांच प्रिय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 00:37 IST

प्रत्येक सरकारने या बँकांना व त्यातील कर्मचा-यांना कायमच दुय्यम समजले आहे. त्यांना आपली ताकद दाखवून देण्यासाठी, आपले हक्क मिळविण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय बँक कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस संजीव बंदलीश यांनी केले. संघटनेतर्फे रविवारी अग्रसेन भवन येथे आयोजित एकदिवसीय राज्यस्तरीय अधिवेशनाचे त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : ‘देशाच्या आर्थिक प्रगतीचा पाया सार्वजनिक बँकांनी रचला आहे. देशाच्या कानाकोप-यात बँकांचे जाळे पसरविण्यापासून ते जागतिक मंदीतही अर्थव्यवस्था मजबूत ठेवण्यात सार्वजनिक बँकांनी मोलाची भूमिका बजावलेली असतानाही प्रत्येक सरकारने या बँकांना व त्यातील कर्मचा-यांना कायमच दुय्यम समजले आहे. त्यांना आपली ताकद दाखवून देण्यासाठी, आपले हक्क मिळविण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय बँक कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस संजीव बंदलीश यांनी केले. संघटनेतर्फे रविवारी अग्रसेन भवन येथे आयोजित एकदिवसीय राज्यस्तरीय अधिवेशनाचे त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.यावेळी मंचावर संंघटनेचे अध्यक्ष विनील सक्सेना, ‘एआयएसबीआयएसएफ ’चे अध्यक्ष व्ही.व्ही.एस.आर. सर्मा, सुरेंद्रकुमार शर्मा, जी.एस. राणा, पार्थसारथी पत्रा, अमोल सुतार, नरेश बोदलिया, मिलिंद नाडकर्णी, अधिवेशन सचिव अरुण जोशी, जगदीश शृंगारपुरे आणि प्रदीप येळणे उपस्थित होते.बंदलीश यांनी सरकारच्या धोरणांवर टीका करीत कर्मचा-यांच्या पगारवाढीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, जेव्हा सरकारला ग्रामीण भागात बँक पोहोचवयाची असते तेव्हा सार्वजनिक बँक आठवते, नोटाबंदी काळात आम्ही दिवसरात्र मेहनत केली; परंतु जेव्हा समाधानकारक वेतनाचा विषय येतो तेव्हा बँकांची आर्थिक स्थिती खराब असल्याची बतावणी करून तो विषय लांबणीवर टाकला जातो.लक्षावधी कोटी रुपयांच्या थकीत कर्जांमुळे राष्ट्रीय बँकांची आर्थिक पत ढासळली असल्याचे सांगत ते म्हणाले, कर्ज बुडवणा-या मोठमोठ्या उद्योगपतींवर सरकार का कारवाई करीत नाही.कर्ज बुडवणाºयांची नावे घोषित करून गुन्हे नोंदविण्याची विनंती केली तर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल म्हणतात, अनुत्पादित मालमत्ताधारक व्यावसायिकांचे नाव सांगितले तर देशाच्या आर्थिक विकासाला खीळ बसेल. आता असे कर्जबुडवे देशाच्या प्रगतीत कसे योगदान देत आहेत, हाच प्रश्न आहे.सुमारे ११ वर्षांनंतर भरलेल्या अधिवेशनाच्या निमित्ताने सर्व कर्मचारी संघटनांनी एकत्र येऊन लढा दिला पाहिजे, असे आवाहन जगदीश शृंगारपुरे यांनी केले. वैशाली जहागीरदार आणि प्रियंका वगने यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. अधिवेशनात संघटनेच्या महाराष्ट्रातील पदाधिका-याची नियुक्ती व केंद्रीय समितासाठी सदस्यांना नामांकन देण्यात आले.केवळ १२ जणांकडे २५ टक्के थकीत कर्ज!राष्ट्रीयीकृत बँकांच्या थकीत कर्जाचा आकडा दहा लाख कोटी रुपये मानला, तर कर्ज थकविणाºयांच्या यादीतील पहिल्या १२ जणांकडेच सुमारे २.५ लाख कोटी रुपयांचे कर्ज बाकी आहे.सरकारने हे थकीत २५ टक्के कर्ज जरी वसूल केले, तर बँकांची स्थिती सुधारेल. सध्या बँकांसमोर विलीनीकरण, खाजगीकरण आणि अनुत्पादित मालमत्ता यासारख्या समस्यांचे आव्हान आहे, असा सूर या अधिवेशनातून उमटला.