शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

सरकारला खाजगी बँकांच प्रिय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 00:37 IST

प्रत्येक सरकारने या बँकांना व त्यातील कर्मचा-यांना कायमच दुय्यम समजले आहे. त्यांना आपली ताकद दाखवून देण्यासाठी, आपले हक्क मिळविण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय बँक कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस संजीव बंदलीश यांनी केले. संघटनेतर्फे रविवारी अग्रसेन भवन येथे आयोजित एकदिवसीय राज्यस्तरीय अधिवेशनाचे त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : ‘देशाच्या आर्थिक प्रगतीचा पाया सार्वजनिक बँकांनी रचला आहे. देशाच्या कानाकोप-यात बँकांचे जाळे पसरविण्यापासून ते जागतिक मंदीतही अर्थव्यवस्था मजबूत ठेवण्यात सार्वजनिक बँकांनी मोलाची भूमिका बजावलेली असतानाही प्रत्येक सरकारने या बँकांना व त्यातील कर्मचा-यांना कायमच दुय्यम समजले आहे. त्यांना आपली ताकद दाखवून देण्यासाठी, आपले हक्क मिळविण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय बँक कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस संजीव बंदलीश यांनी केले. संघटनेतर्फे रविवारी अग्रसेन भवन येथे आयोजित एकदिवसीय राज्यस्तरीय अधिवेशनाचे त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.यावेळी मंचावर संंघटनेचे अध्यक्ष विनील सक्सेना, ‘एआयएसबीआयएसएफ ’चे अध्यक्ष व्ही.व्ही.एस.आर. सर्मा, सुरेंद्रकुमार शर्मा, जी.एस. राणा, पार्थसारथी पत्रा, अमोल सुतार, नरेश बोदलिया, मिलिंद नाडकर्णी, अधिवेशन सचिव अरुण जोशी, जगदीश शृंगारपुरे आणि प्रदीप येळणे उपस्थित होते.बंदलीश यांनी सरकारच्या धोरणांवर टीका करीत कर्मचा-यांच्या पगारवाढीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, जेव्हा सरकारला ग्रामीण भागात बँक पोहोचवयाची असते तेव्हा सार्वजनिक बँक आठवते, नोटाबंदी काळात आम्ही दिवसरात्र मेहनत केली; परंतु जेव्हा समाधानकारक वेतनाचा विषय येतो तेव्हा बँकांची आर्थिक स्थिती खराब असल्याची बतावणी करून तो विषय लांबणीवर टाकला जातो.लक्षावधी कोटी रुपयांच्या थकीत कर्जांमुळे राष्ट्रीय बँकांची आर्थिक पत ढासळली असल्याचे सांगत ते म्हणाले, कर्ज बुडवणा-या मोठमोठ्या उद्योगपतींवर सरकार का कारवाई करीत नाही.कर्ज बुडवणाºयांची नावे घोषित करून गुन्हे नोंदविण्याची विनंती केली तर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल म्हणतात, अनुत्पादित मालमत्ताधारक व्यावसायिकांचे नाव सांगितले तर देशाच्या आर्थिक विकासाला खीळ बसेल. आता असे कर्जबुडवे देशाच्या प्रगतीत कसे योगदान देत आहेत, हाच प्रश्न आहे.सुमारे ११ वर्षांनंतर भरलेल्या अधिवेशनाच्या निमित्ताने सर्व कर्मचारी संघटनांनी एकत्र येऊन लढा दिला पाहिजे, असे आवाहन जगदीश शृंगारपुरे यांनी केले. वैशाली जहागीरदार आणि प्रियंका वगने यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. अधिवेशनात संघटनेच्या महाराष्ट्रातील पदाधिका-याची नियुक्ती व केंद्रीय समितासाठी सदस्यांना नामांकन देण्यात आले.केवळ १२ जणांकडे २५ टक्के थकीत कर्ज!राष्ट्रीयीकृत बँकांच्या थकीत कर्जाचा आकडा दहा लाख कोटी रुपये मानला, तर कर्ज थकविणाºयांच्या यादीतील पहिल्या १२ जणांकडेच सुमारे २.५ लाख कोटी रुपयांचे कर्ज बाकी आहे.सरकारने हे थकीत २५ टक्के कर्ज जरी वसूल केले, तर बँकांची स्थिती सुधारेल. सध्या बँकांसमोर विलीनीकरण, खाजगीकरण आणि अनुत्पादित मालमत्ता यासारख्या समस्यांचे आव्हान आहे, असा सूर या अधिवेशनातून उमटला.