शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

शेतीमालाचे दर वाढविण्यात शासनाला रस नाही !

By admin | Updated: September 17, 2015 00:27 IST

उस्मानाबाद : दुष्काळ हा काही नवीन नसून सध्या उद्भवलेली चारा, पाणी टंचाई ही सरकारचे पाप आहे. वरवरच्या कितीही उपायोजना केल्या तरी

उस्मानाबाद : दुष्काळ हा काही नवीन नसून सध्या उद्भवलेली चारा, पाणी टंचाई ही सरकारचे पाप आहे. वरवरच्या कितीही उपायोजना केल्या तरी शेतकरी आत्महत्या थांबणार नाहीत. शेतकऱ्याच्या शेतीमालाला जोपर्यंत किफायतशीर दर मिळणार नाही, तोपर्यंत हे चित्र बदलणे शक्य नाही. मात्र, दुर्दैवाने या शासनाला शेतीमालाचे दर वाढविण्यात रस नसल्याचे मत शेतकरी संघटनेचे रघुनाथदादा पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. पाटील म्हणाले की, सध्याचे सरकार उद्योगपती धार्जिने आहे. त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी काहीही दणेघेणे नाही. निवडणुकीच्या काळात सध्याच्या भाजप सरकारने जाहीरनाम्यात शेतीमालाला उत्पादनखर्च वगळता ५० टक्के अधिक नफा होईल, असा दर देऊ असे वचन दिले होते. परंतु, त्यांनी हे वचन पाळलेले नाही. शेतीमालाल जे काही दर मिळत आहे, त्यातून साधा उत्पादन खर्चही निघणे कठीण झाल्याचे ते म्हणाले. शासन ८० रूपये किलो दराने तूरदाळ आणि ४५ रूपेय किलो दराने कांद्याची आयात करीत आहे. हा दर स्थानिक शेतकऱ्यांना का दिला जात नाही, असा सवालही त्यांनी केला. सध्या सिनेअभिनेते शेतकऱ्यांना आर्थिक मदत करीत आहेत. ही बाब चांगली असली तरी अशा स्वरूपाच्या मदतीमुळे शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण कमी होणार नाही. कर्जबाजारी शेतकऱ्यांचे मनोबल उंचाविण्यासाठी जनजागृतीपर उपक्रम हाती घ्यावेत, असे आवाहनही त्यांनी केले.