शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हमाले उमर अब्दुल्ला?
3
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
4
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
5
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
6
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
7
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
8
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
9
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
10
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
11
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
12
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
13
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
14
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
15
Jara Hatke: टक्कल पडू नये म्हणून 'या' मंदिरात देवाला अर्पण करतात केसांची बट
16
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
17
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
18
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
19
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
20
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
Daily Top 2Weekly Top 5

दोन आठवड्यांत शासकीय समित्यांचे गठन करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:04 IST

औरंगाबाद : येत्या दोन आठवड्यांत शासकीय समित्यांचे गठन होईल. महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस हा घटक पक्ष आहे. त्यामुळे २५ ...

औरंगाबाद : येत्या दोन आठवड्यांत शासकीय समित्यांचे गठन होईल. महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस हा घटक पक्ष आहे. त्यामुळे २५ ते ३० टक्के जागांवर समाधान मानावे लागेल आणि त्यावर चांगल्या कार्यकर्त्यांची वर्णी लावावी लागेल, असे रविवारी येथे राज्याचे आरोग्यमंत्री व औरंगाबाद जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे संपर्कमंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केले.

ते संपर्क मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच राष्ट्रवादी भवनात आले होते. आढावा बैठक असे स्वरूप होते; परंतु बघता बघता या बैठकीचे स्वरूप मेळाव्यात झाले. सुरुवातीला मंचावर मोठी गर्दी झाली. राजेश टोपे यांना निवेदने देण्यासाठी झुंबड उडाली. शिवाय राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नव्याने प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी टोपे यांच्यासोबत फोटो काढण्याची जणू स्पर्धाच केली.

राजेश टोपे यांचा आज वाढदिवस होता, तसेच संपर्क मंत्री म्हणून नियुक्ती झाल्यानंतर ते पहिल्यांदाच राष्ट्रवादी भवनात आले होते. त्यामुळे जो तो त्यांच्या सत्कारासाठी पुढे सरसावत होता; परंतु भंडारा येथे जी निष्पाप बालके जळून दगावली, त्या पार्श्वभूमीवर राजेश टोपे कुठलाही सत्कार घेणार नाही, असे जाहीर करून दगावलेल्या त्या बालकांना दोन मिनिटे स्तब्धता पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

ज्योती अभंग, आशा निकाळजे, विजया बनकर, राहुल सोनवणे, गुड्डू निकाळजे आदी माजी नगरसेवकांना टोपे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश देण्यात आला. नंतर पत्रकारांशी बोलताना टोपे यांनी, शहराच्या नामांतरापेक्षाही इतर अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत, असे सांगत याबाबतीत राष्ट्रवादी काँग्रेसची वेगळी कोणतीही भूमिका नाही. वादग्रस्त प्रश्नांचा निर्णय घेण्यासाठी तीनही पक्षांच्या प्रमुख नेत्यांची मिळून कोअर कमिटी बनली आहे. ही कमिटी औरंगाबाद शहराच्या नामांतराबद्दल जो निर्णय घेईल, तो आम्हाला मान्य राहील, असे स्पष्ट केले.

प्रारंभी, जिल्हा अध्यक्ष कैलास पाटील यांनी प्रास्ताविक केले. कदीर मौलाना, दत्ता भांगे, जयमलसिंग रंधवा, अमोल दांडगे, महेश उबाळे, सूरजितसिंग खुंगर, बादशहा पटेल, जफर बिल्डर, सय्यद मतीन, कैसर कुरेशी, भाऊसाहेब तरमळे, शहराध्यक्ष विजय साळवे, कार्याध्यक्ष अभिषेक देशमुख आदींनी मनोगत व्यक्त केले. मंचावर द्वारकाभाऊ पाथ्रीकर, रंगनाथ काळे, भाऊसाहेब चिकटगावकर, मुश्ताक अहमद, छाया जंगले पाटील, मेहराज पटेल, वीणा खरे, सुधाकर सोनवणे आदींची उपस्थिती होती.