शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
3
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
4
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
5
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
6
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
7
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
8
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
9
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
10
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
11
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
12
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
13
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
14
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
15
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
16
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
17
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
18
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
19
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
20
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार

कॅन्सरग्रस्तांसाठी औरंगाबादचे शासकीय कर्करोग रुग्णालय ठरले आधार; अर्ध्या राज्यातील रुग्णांना मिळताहेत उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 19:37 IST

शहरातील शासकीय कर्करोग रुग्णालयात मराठवाड्यासह खान्देश, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील रुग्णांवर उपचार केले जात आहेत.

औरंगाबाद : शहरातील शासकीय कर्करोग रुग्णालयात मराठवाड्यासह खान्देश, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील रुग्णांवर उपचार केले जात असून, गत वर्षभरात २२,४८२ विविध प्रकारच्या कर्करुग्णांवर उपचार करण्यात आले. गतवर्षीच्या तुलनेत यंदा कर्करोगाचे ४,२२४ रुग्ण वाढले आहेत. उपचारांती कर्करुग्ण बरा होऊन जगण्याचे प्रमाण वाढल्याचे आढळून आले आहे. 

शासकीय कर्करोग रुग्णालय सुरूझाल्यापासून राज्यभरातून रुग्णांचा ओघ येथे वाढला आहे. इतर राज्यांसह परदेशातील रुग्णही येथे उपचारासाठी येत आहेत. गतवर्षी ९७४ विविध प्रकारच्या कर्करुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. तर यावर्षी १३६९ रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. गतवर्षी २०४८ महिलांवर उपचार केले, तर यंदा २५६९ महिलांना उपचार देण्यात आले. गतवर्षी १२४७ बालरुग्ण होते, ते यंदा १६१७ झाले. १५०३ डोळ्यांचा कर्करोग असलेल्या रुग्णांवर उपचार केले. तर यंदा १५१० रुग्ण झाले आहेत. हेडनेक अर्थात कान, नाक आणि घशाचा कर्करोग असलेले गतवर्षी २५०० रुग्ण होते ते यंदा ३ हजारांवर गेले आहेत.

विशेष म्हणजे शेवटच्या टप्प्यात असलेल्या १०५ रुग्णांना जीवदान मिळाले आहे. गतवर्षी किरणोपचारासाठी ७९९ रुग्ण दाखल झाले होते. ते यंदा ८६६ दाखल झाले आहेत. केमोथेरपीसाठी ७,९८१ रुग्ण होते. यावर्षी २०७४ रुग्ण झाले असून, ही प्रक्रिया सुरूच आहे. रुग्णालयात उपचार घेणाऱ्या एकूण रुग्णांपैकी ३० टक्के रुग्ण हे तंबाखूजन्य पदार्थ सेवनाने होणाऱ्या कर्करोगाचे असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. गतवर्षी १८,२५८ रुग्णांवर उपचार करण्यात आले. तर यंदा आतापर्यंत २२,४८२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. उपचारानंतर कर्करुग्ण साधारणपणे पाच ते दहा वर्षे जगला तर त्याच्यावरील उपचार यशस्वी झाल्याचे म्हटले जाते, असे शासकीय कर्करोग रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ.अरविंद गायकवाड यांनी सांगितले. 

दक्षतेसाठी जनजागृती अभियानराज्याच्या विविध जिल्ह्यांत आणि तालुकास्तरांवर जनजागृती व प्रबोधनात्मक कार्यक्रम घेतले जात आहेत. कर्करोग उद्भवू नये, यासाठी दक्षता घेण्याचे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे. पथनाट्य, पोस्टर्स प्रदर्शन, घोषवाक्य स्पर्धा, महाविद्यालयांमध्ये व्याख्यानाचे आयोजन, या आजारातून बरा झालेल्या कर्करुग्णाची मुलाखत आदींच्या माध्यमातून जनजागृती केली आहे. 

कर्करोग उद्भवण्याची कारणेलठ्ठपणा, व्यायामाचा अभाव, आनुवंशिकता, प्रदूषित आहाराचे सेवन, जंक फूड, बदलती जीवनशैली, तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन, कीटकनाशक फवारणी केलेले पदार्थ आदींमुळे समाजात कर्करुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे अभ्यासातून आढळून आले आहे. 

ही आहे धोक्याची घंटाशरीरात कुठेही गाठ असणे, शौचाच्या सवयी व वेळा बदलणे, शरीराच्या कोणत्याही छिद्रातून रक्तस्राव होणे, आवाज घोगरा होणे, स्त्रियांमध्ये मासिक पाळीत अतिरक्तस्राव होणे, शरीरावरील तिळाचा आकार वाढणे ही प्राथमिक लक्षणे आहेत. याचे वेळीच निदान झाले तर तात्काळ डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यावी. 

अर्ध्या राज्याला उपचार शासकीय कर्करोग रुग्णालयाच्या माध्यमातून अर्ध्या राज्यातील रुग्णांना उपचार व सेवा दिली जात आहे. कर्करोगावरील उपचार आणि दक्षता या बाबींवर अधिक लक्ष केंद्रित केले जात आहे. - डॉ. कानन येळीकर, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, औरंगाबाद. 

टॅग्स :govermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटीcancerकर्करोगhospitalहॉस्पिटलAurangabadऔरंगाबादState Governmentराज्य सरकार