शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

कॅन्सरग्रस्तांसाठी औरंगाबादचे शासकीय कर्करोग रुग्णालय ठरले आधार; अर्ध्या राज्यातील रुग्णांना मिळताहेत उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 19:37 IST

शहरातील शासकीय कर्करोग रुग्णालयात मराठवाड्यासह खान्देश, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील रुग्णांवर उपचार केले जात आहेत.

औरंगाबाद : शहरातील शासकीय कर्करोग रुग्णालयात मराठवाड्यासह खान्देश, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील रुग्णांवर उपचार केले जात असून, गत वर्षभरात २२,४८२ विविध प्रकारच्या कर्करुग्णांवर उपचार करण्यात आले. गतवर्षीच्या तुलनेत यंदा कर्करोगाचे ४,२२४ रुग्ण वाढले आहेत. उपचारांती कर्करुग्ण बरा होऊन जगण्याचे प्रमाण वाढल्याचे आढळून आले आहे. 

शासकीय कर्करोग रुग्णालय सुरूझाल्यापासून राज्यभरातून रुग्णांचा ओघ येथे वाढला आहे. इतर राज्यांसह परदेशातील रुग्णही येथे उपचारासाठी येत आहेत. गतवर्षी ९७४ विविध प्रकारच्या कर्करुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. तर यावर्षी १३६९ रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. गतवर्षी २०४८ महिलांवर उपचार केले, तर यंदा २५६९ महिलांना उपचार देण्यात आले. गतवर्षी १२४७ बालरुग्ण होते, ते यंदा १६१७ झाले. १५०३ डोळ्यांचा कर्करोग असलेल्या रुग्णांवर उपचार केले. तर यंदा १५१० रुग्ण झाले आहेत. हेडनेक अर्थात कान, नाक आणि घशाचा कर्करोग असलेले गतवर्षी २५०० रुग्ण होते ते यंदा ३ हजारांवर गेले आहेत.

विशेष म्हणजे शेवटच्या टप्प्यात असलेल्या १०५ रुग्णांना जीवदान मिळाले आहे. गतवर्षी किरणोपचारासाठी ७९९ रुग्ण दाखल झाले होते. ते यंदा ८६६ दाखल झाले आहेत. केमोथेरपीसाठी ७,९८१ रुग्ण होते. यावर्षी २०७४ रुग्ण झाले असून, ही प्रक्रिया सुरूच आहे. रुग्णालयात उपचार घेणाऱ्या एकूण रुग्णांपैकी ३० टक्के रुग्ण हे तंबाखूजन्य पदार्थ सेवनाने होणाऱ्या कर्करोगाचे असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. गतवर्षी १८,२५८ रुग्णांवर उपचार करण्यात आले. तर यंदा आतापर्यंत २२,४८२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. उपचारानंतर कर्करुग्ण साधारणपणे पाच ते दहा वर्षे जगला तर त्याच्यावरील उपचार यशस्वी झाल्याचे म्हटले जाते, असे शासकीय कर्करोग रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ.अरविंद गायकवाड यांनी सांगितले. 

दक्षतेसाठी जनजागृती अभियानराज्याच्या विविध जिल्ह्यांत आणि तालुकास्तरांवर जनजागृती व प्रबोधनात्मक कार्यक्रम घेतले जात आहेत. कर्करोग उद्भवू नये, यासाठी दक्षता घेण्याचे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे. पथनाट्य, पोस्टर्स प्रदर्शन, घोषवाक्य स्पर्धा, महाविद्यालयांमध्ये व्याख्यानाचे आयोजन, या आजारातून बरा झालेल्या कर्करुग्णाची मुलाखत आदींच्या माध्यमातून जनजागृती केली आहे. 

कर्करोग उद्भवण्याची कारणेलठ्ठपणा, व्यायामाचा अभाव, आनुवंशिकता, प्रदूषित आहाराचे सेवन, जंक फूड, बदलती जीवनशैली, तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन, कीटकनाशक फवारणी केलेले पदार्थ आदींमुळे समाजात कर्करुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे अभ्यासातून आढळून आले आहे. 

ही आहे धोक्याची घंटाशरीरात कुठेही गाठ असणे, शौचाच्या सवयी व वेळा बदलणे, शरीराच्या कोणत्याही छिद्रातून रक्तस्राव होणे, आवाज घोगरा होणे, स्त्रियांमध्ये मासिक पाळीत अतिरक्तस्राव होणे, शरीरावरील तिळाचा आकार वाढणे ही प्राथमिक लक्षणे आहेत. याचे वेळीच निदान झाले तर तात्काळ डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यावी. 

अर्ध्या राज्याला उपचार शासकीय कर्करोग रुग्णालयाच्या माध्यमातून अर्ध्या राज्यातील रुग्णांना उपचार व सेवा दिली जात आहे. कर्करोगावरील उपचार आणि दक्षता या बाबींवर अधिक लक्ष केंद्रित केले जात आहे. - डॉ. कानन येळीकर, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, औरंगाबाद. 

टॅग्स :govermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटीcancerकर्करोगhospitalहॉस्पिटलAurangabadऔरंगाबादState Governmentराज्य सरकार