शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

कॅन्सरग्रस्तांसाठी औरंगाबादचे शासकीय कर्करोग रुग्णालय ठरले आधार; अर्ध्या राज्यातील रुग्णांना मिळताहेत उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 19:37 IST

शहरातील शासकीय कर्करोग रुग्णालयात मराठवाड्यासह खान्देश, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील रुग्णांवर उपचार केले जात आहेत.

औरंगाबाद : शहरातील शासकीय कर्करोग रुग्णालयात मराठवाड्यासह खान्देश, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील रुग्णांवर उपचार केले जात असून, गत वर्षभरात २२,४८२ विविध प्रकारच्या कर्करुग्णांवर उपचार करण्यात आले. गतवर्षीच्या तुलनेत यंदा कर्करोगाचे ४,२२४ रुग्ण वाढले आहेत. उपचारांती कर्करुग्ण बरा होऊन जगण्याचे प्रमाण वाढल्याचे आढळून आले आहे. 

शासकीय कर्करोग रुग्णालय सुरूझाल्यापासून राज्यभरातून रुग्णांचा ओघ येथे वाढला आहे. इतर राज्यांसह परदेशातील रुग्णही येथे उपचारासाठी येत आहेत. गतवर्षी ९७४ विविध प्रकारच्या कर्करुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. तर यावर्षी १३६९ रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. गतवर्षी २०४८ महिलांवर उपचार केले, तर यंदा २५६९ महिलांना उपचार देण्यात आले. गतवर्षी १२४७ बालरुग्ण होते, ते यंदा १६१७ झाले. १५०३ डोळ्यांचा कर्करोग असलेल्या रुग्णांवर उपचार केले. तर यंदा १५१० रुग्ण झाले आहेत. हेडनेक अर्थात कान, नाक आणि घशाचा कर्करोग असलेले गतवर्षी २५०० रुग्ण होते ते यंदा ३ हजारांवर गेले आहेत.

विशेष म्हणजे शेवटच्या टप्प्यात असलेल्या १०५ रुग्णांना जीवदान मिळाले आहे. गतवर्षी किरणोपचारासाठी ७९९ रुग्ण दाखल झाले होते. ते यंदा ८६६ दाखल झाले आहेत. केमोथेरपीसाठी ७,९८१ रुग्ण होते. यावर्षी २०७४ रुग्ण झाले असून, ही प्रक्रिया सुरूच आहे. रुग्णालयात उपचार घेणाऱ्या एकूण रुग्णांपैकी ३० टक्के रुग्ण हे तंबाखूजन्य पदार्थ सेवनाने होणाऱ्या कर्करोगाचे असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. गतवर्षी १८,२५८ रुग्णांवर उपचार करण्यात आले. तर यंदा आतापर्यंत २२,४८२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. उपचारानंतर कर्करुग्ण साधारणपणे पाच ते दहा वर्षे जगला तर त्याच्यावरील उपचार यशस्वी झाल्याचे म्हटले जाते, असे शासकीय कर्करोग रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ.अरविंद गायकवाड यांनी सांगितले. 

दक्षतेसाठी जनजागृती अभियानराज्याच्या विविध जिल्ह्यांत आणि तालुकास्तरांवर जनजागृती व प्रबोधनात्मक कार्यक्रम घेतले जात आहेत. कर्करोग उद्भवू नये, यासाठी दक्षता घेण्याचे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे. पथनाट्य, पोस्टर्स प्रदर्शन, घोषवाक्य स्पर्धा, महाविद्यालयांमध्ये व्याख्यानाचे आयोजन, या आजारातून बरा झालेल्या कर्करुग्णाची मुलाखत आदींच्या माध्यमातून जनजागृती केली आहे. 

कर्करोग उद्भवण्याची कारणेलठ्ठपणा, व्यायामाचा अभाव, आनुवंशिकता, प्रदूषित आहाराचे सेवन, जंक फूड, बदलती जीवनशैली, तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन, कीटकनाशक फवारणी केलेले पदार्थ आदींमुळे समाजात कर्करुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे अभ्यासातून आढळून आले आहे. 

ही आहे धोक्याची घंटाशरीरात कुठेही गाठ असणे, शौचाच्या सवयी व वेळा बदलणे, शरीराच्या कोणत्याही छिद्रातून रक्तस्राव होणे, आवाज घोगरा होणे, स्त्रियांमध्ये मासिक पाळीत अतिरक्तस्राव होणे, शरीरावरील तिळाचा आकार वाढणे ही प्राथमिक लक्षणे आहेत. याचे वेळीच निदान झाले तर तात्काळ डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यावी. 

अर्ध्या राज्याला उपचार शासकीय कर्करोग रुग्णालयाच्या माध्यमातून अर्ध्या राज्यातील रुग्णांना उपचार व सेवा दिली जात आहे. कर्करोगावरील उपचार आणि दक्षता या बाबींवर अधिक लक्ष केंद्रित केले जात आहे. - डॉ. कानन येळीकर, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, औरंगाबाद. 

टॅग्स :govermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटीcancerकर्करोगhospitalहॉस्पिटलAurangabadऔरंगाबादState Governmentराज्य सरकार